शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
3
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
4
आ. विजयकुमार देशमुख यांचा असंतोष ३० तासात मावळला; मुंबईच्या बैठकीत उमेदवार निश्चित
5
Video: "पापाराझींना वाटलं सलमान खान कारमध्ये, पण...", चक्क ई-बाईकवरुन घेतली भाईजानने एन्ट्री
6
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
7
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
8
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
9
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
11
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
12
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
13
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
14
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
16
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांची टीका
17
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
18
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
19
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
20
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
Daily Top 2Weekly Top 5

‘वाळू’च्या किंमती हायफाय; ‘घाट’धारकांकडून बायबाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2022 05:00 IST

तालुका सनियंत्रण समितीने ३९ घाट लिलावाकरिता पात्र ठरविले. त्यातील ३६ घाटांकरिता लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. या घाटांची किंमतही दीड ते दोन कोटींच्या घरात आहे. पहिल्या लिलाव फेरीमध्ये आर्वी तालुक्यातील सालफळ, समुद्रपूर तालुक्यातील उमरा-औरंगपूर रिठ, हिंगणघाट तालुक्यातील सावंगी रिठ व ढिवरी (पिपरी) या चारच घाटांचा लिलाव झाला. त्यानंतर पुन्हा ३२ घाटांकरिता दुसरी लिलाव फेरी घेण्यात आली असता त्यामध्ये समुद्रपूर तालुक्यातील चाकूर आणि शिवणी या दोन घाटांचा लिलाव झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाच्या नवीन वाळू निर्गती धोरणानुसार यावर्षी जिल्ह्यातील ३६ वाळूघाटांच्या लिलावाकरिता प्रक्रिया राबविण्यात आली. आतापर्यंत तीन फेऱ्या झाल्या असून केवळ सहाच वाळू घाटांचा लिलाव झाला असून अद्याप ३० वाळूघाटांचा लिलाव बाकी आहे. त्यामुळे घाटांच्या किंमती हायफाय असल्याने घाटधारकांनी घाट घेण्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा खनिकर्म विभागाकडून नियमानुसार घाटांच्या किंमती २५ टक्के कमी करण्याकरिता विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला आहे.जिल्ह्यातील देवळी, आर्वी, समुद्रपूर व हिंगणघाट या चार तालुक्यातील ७७ वाळू घाटांचा प्रस्ताव खनिकर्म विभागाला प्राप्त झाल्यानंतर तालुका सनियंत्रण समितीने ३९ घाट लिलावाकरिता पात्र ठरविले. त्यातील ३६ घाटांकरिता लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. या घाटांची किंमतही दीड ते दोन कोटींच्या घरात आहे. पहिल्या लिलाव फेरीमध्ये आर्वी तालुक्यातील सालफळ, समुद्रपूर तालुक्यातील उमरा-औरंगपूर रिठ, हिंगणघाट तालुक्यातील सावंगी रिठ व ढिवरी (पिपरी) या चारच घाटांचा लिलाव झाला. त्यानंतर पुन्हा ३२ घाटांकरिता दुसरी लिलाव फेरी घेण्यात आली असता त्यामध्ये समुद्रपूर तालुक्यातील चाकूर आणि शिवणी या दोन घाटांचा लिलाव झाला. पुन्हा उर्वरित ३० घाटांकरिता १५ फेब्रुवारीला तिसऱ्यांदा लिलाव घेण्यात आला. परंतू यामध्ये एकही घाट लिलावात गेला नसल्यामुळे शासकीय नियमानुसार जिल्हा खनिकर्म विभागाकडून ३० घाटांच्या किंमतीमध्ये २५ टक्के कपात करण्यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला आहे. आता विभागीय आयुक्तांकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पुन्हा लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 

अनामत रक्कम होणार शासन जमा-  जिल्हा खनिकर्म विभागाकडून तिनदा लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये सालफळ, उमरा-औरंगपूर रिठ, सावंगी रिठ, ढिवरी (पिपरी), चाकूर व शिवणी या सहा घाटांचा लिलाव झाला आहे. -  लिलावादरम्यान २५ टक्के अनामत रक्कम भरावी लागते. ही रक्कम भरल्यानंतर वाळूघाटांची पूर्ण रक्कम भरल्यावर खनिकर्म विभागाकडून वाळू घाटांचा ताबा दिला जातो. 

ताबा मिळताच यंत्राद्वारे अवैध वाळू उपसालिलावातील सहा वाळू घाटापैंकी सालफळ, सावंगी रिठ, ढिवरी (पिपरी) व शिवणी या चार वाळू घाटधारकांनी घाटाची रक्कमच भरली नाही. तर समुद्रपूर तालुक्यातील उमरा-औरंगपूर रिठ व चाकूर या घाटधारकांनी पूर्ण रक्कम जमा केली आहे. त्यामुळे उमरा-औरंगपूर रिठ या घाटाचा ताबा देण्यात आला असून चाकूर या घाटधारकाला ताबा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. औरंगपूर रिठ या घाटधारकाला ताबा मिळताच त्याने अवैधरित्या यंत्रांच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू केल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. तसेच चाकूर घाटधारकही ताबा मिळण्याच्या प्रतीक्षेत असून त्यानेही आपली यंत्रे घाटाच्या काठावर उभी केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे स्थानिक तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी या अवैध उत्खननाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

घाटधारकांचे ‘वेट ॲण्ड वॉच’जिल्ह्यातील वाळू घाटांच्या किंमती दोन कोटींच्यावर आहेत. येथे ४ हजार १६७ रुपये प्रतिब्रास या शासकीय दरानुसार घाटांचा लिलाव होत आहे. परंतू आता शासनाने वाळूची रॉयल्टी केवळ ६०० रुपये केली आहे. याची अंमलबजावणी लगतच्या अमरावती व यवतमाळ जिल्ह्यामध्ये झाली आहे. काहींना आपल्या जिल्ह्यातही रॉयल्टी कमी होण्याची शक्यता असल्याने घाट घेण्यासंदर्भात ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. 

 

टॅग्स :sandवाळू