शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
3
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
4
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
5
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
6
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
7
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
8
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
9
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
10
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
11
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
12
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
14
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
15
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
16
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
17
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
18
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
19
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
20
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा

बोटींद्वारे रेती उपसा; प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: July 20, 2015 02:11 IST

रेती घाटांचे लिलाव करताना काही अटी लादल्या जातात. शिवाय रेतीमाफीयांवर नियंत्रणासाठी अनेक उपाययोजनाही केल्या जातात; पण त्या निरर्थक ठरत असल्याचेच दिसते.

परवानगीचे केवळ प्रस्तावच : मंत्रालयातून हिरवा कंदील मिळण्यापूर्वीच रेतीची उचलवर्धा : रेती घाटांचे लिलाव करताना काही अटी लादल्या जातात. शिवाय रेतीमाफीयांवर नियंत्रणासाठी अनेक उपाययोजनाही केल्या जातात; पण त्या निरर्थक ठरत असल्याचेच दिसते. नदी पात्रातून बोटींद्वारे रेती काढण्यासाठी मंत्रालयातून परवानगी घ्यावी लागते; पण जिल्ह्यातील घाटधारक केवळ प्रस्ताव पाठवून रेतीचा बोटींद्वारे उपसा सुरू करतात. हा प्रकार जिल्ह्यातील सबंध घाटांवर दिसून येत असताना कारवाई होत नाही, हे वास्तव आहे.आष्टी तालुक्यातील गोदावरी या लिलाव न झालेल्या घाटातून सर्रास रेतीचा उपसा केला जात आहे. जेसीबी, पोकलॅण्डसह बोटींनी रेतीचा उपसा केला जात असल्याचेही समोर आले आहे. असे असले तरी अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. इस्माईलपूर रेती घाटधारक कंत्राटदारच गोदावरी रेती घाटातूनही मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करीत आहे. या प्रकारामुळे नदी पात्र धोक्यात आले आहे. गोदावरी गावाचा विकास साध्य होत नाही, तेथील रस्त्यांची दुरूस्ती होत नाही म्हणून ग्रामस्थांनी रेतीघाटाचा लिलाव करू नये, असा पवित्रा घेतला होता. ग्रा.पं. ने हरकत घेतली होती. यामुळे या घाटाचा लिलाव झाला नाही; पण इस्माईलपूर घाटधारकच गोदावरी घाटातून अतिरेकी रेतीचा उपसा करीत असल्याची तक्रार भाजप पदाधिकारी नानकसिंग बावरी यांनी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्याकडे केली. तत्पूर्वी ग्रामस्थांनीही तक्रारी केल्या; पण कुठलीही कारवाई झाली नाही. एकाच वेळी रेतीचा उपसा करून ठिय्या करायचा व मग रेतीची विल्हेवाट लावायची, असा प्रकार सुरू आहे. याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)नदीपात्रामध्ये वाहतुकीसाठी केला रस्ताआष्टी तालुक्यात नदीपात्र पोखरण्याचेच काम सुरू आहे. लिलावात एक घाट घ्यायचा आणि लगतचे घाटही पोखरून काढायचे, असा प्रकार सर्रास सुरू आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचे चित्र आहे. याबाबत परिसरातील ग्रामस्थ तक्रारी करतात; पण अर्थपूर्ण संबंधांमुळे त्याकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसते. गोदावरी घाटातील रेती उपस्याचाही तसाच प्रकार दिसतो. या घाटातून जेसीबी, पोकलॅण्ड, बोटींसह मजुरांकडूनही रेतीचा अव्याहत उपसा केला जातो. ही रेती ठिय्यावर साठवून नंतर विल्हेवाट लावली जाते. या प्रकारामुळे शासनाला महसुलच मिळत नसल्याचे दिसते. मोबाईल मॅसेज प्रणाली ठरली कुचकामीरेतीच्या अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता मोबाईल मॅसेजची नवीन युक्ती शासनाने शोधून काढली. यात रेती घेऊन निघालेल्या वाहनाच्या चालकाने मोबाईलद्वारे दिलेल्या क्रमांकावर मॅसेज करणे अनिवार्य होते; पण तीन-चार वाहने गेल्यानंतर एक मॅसेज केला जात असल्याचे समोर आले. यामुळे प्रशासन रेती चोरीला आळा घालण्यात अपयशी ठरले आहे. यावर कारवाई हाच पर्याय शिल्लक राहिला आहे.