शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

सहा घाटातील वाळूउपशाची मुदत संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 23:29 IST

यावर्षी सुरुवातीला आठ घाटांचा लिलाव होऊन ६ कोटी ७४ लाख ४१ हजार रुपयाचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला. या आठ वाळूघाटांपैकी सहा वाळू घाटांना जुलैपर्यंत वाळूउपशाची परवानगी देण्यात आली होती. आता या सर्व घाटांची मुदत संपली आहे.

ठळक मुद्देघाटधारकांना स्थगितीचा फटका : शासनाकडे पाठविला प्रस्ताव, अवैध उपशाचा जोर कायमच

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यावर्षी सुरुवातीला आठ घाटांचा लिलाव होऊन ६ कोटी ७४ लाख ४१ हजार रुपयाचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला. या आठ वाळूघाटांपैकी सहा वाळू घाटांना जुलैपर्यंत वाळूउपशाची परवानगी देण्यात आली होती. आता या सर्व घाटांची मुदत संपली आहे. पण, लिलावानंतर जवळपास ३७ दिवस न्यायालयाच्या आदेशाने वाळू उपसा बंद ठेवण्यात आल्याने त्याचा फटका घाटधारकांना बसला. यासंदर्भात शासनाला प्रस्ताव पाठविला असून मुदत वाढवून मिळणार का? याकडे लक्ष लागले आहे.पहिल्या टप्प्यात आष्टी तालुक्यातील इस्माईपूर, हिंगणघाट तालुक्यातील सोनेगाव (रिठ), नांदगाव (बोरगाव)-२, पारडी (नगाजी), धोची तर समुद्रपूर तालुक्यातील शिवणी-१, शिवणी-२ व मांडगांव अशा आठ वाळूघाटांचा लिलाव झाला होता. यापैकी इस्माईलपूरचा घाट वगळता सर्वांनीच एप्रिल महिन्यापासून ताबा घेऊन उपसा सुरु केला. त्यामुळे त्यांना जूलैपर्यंतच मुदत देण्यात आली होती. आता या घाटातून वाळू उपस्याची मुदत संपली आहे. इस्माईलपूर घाटधारकाला स्थगितीनंतर मे महिन्यापासून ताबा दिल्याने या घाटाला १२ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. लिलावानंतरच्या तीन महिन्याच्या कालावधीत जवळपास ३७ दिवस वाळूउपशावर स्थगिती दिली होती. त्यामुळे यात घाटधारकांचे नुकसान झाल्याची ओरड होत असल्याने हे दिवस वाढवून देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. परंतु, अद्यापही याबाबत कोणताही विचार झाला नाही. सप्टेंबरनंतर वाळूघाट बंद होत असल्याने काही ठिकाणी मुदत संपल्यावरही अवैध वाळूउपसा सुरूच आहे.दुसऱ्या टप्प्यात आठपैकी दोन घाटांचाच झाला लिलावदुसऱ्या टप्प्यातील प्रक्रियेत आठ घाटांचा लिलाव ठेवण्यात आला होता. यामध्ये पहिल्या टप्प्यात शिल्लक राहिलेल्या नवाबपूर व बिड लाकडी घाटासह देवळी तालुक्यातील हिवरा (कावरे)-१, सोनेगाव (बाई), टाकळी (चनाजी), हिंगणघाट तालुक्यातील घाटसावली, कुरण रिठ व भगवा-२ या घाटांचा समावेश होता. यापैकी हिवरा (कावरे) हा घाट ४२ लाख २३ हजार ५०० रुपयाच्या बोलीत प्रिन्स एंटरप्रायजेसने घेतला आहे. भगवा-२ हा घाट राज ट्रेडर्सने ९ लाख १० हजार ७५० रुपयात घेतला असून त्यांनी अद्याप पैसे भरले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सध्या हिवरा (कावरे)-१ या एकाच घाटाचा मार्ग मोकळा झाला आहे. या घाटातून ३० सप्टेंबरपर्यंतच उपसा करता येणार आहे.धोची घाट बंद करण्याचा प्रस्तावहिंगणघाट तालुक्यातील धोची हा घाट आरपीपी इंन्फ्र ा प्रोजेक्ट कंपनीने तब्बल २ कोटी ३५ लाख ५० हजार रुपयाच्या ऐतिहासिक बोलीत घेतला होता. या घाटातून वाळू उपसाकरण्याकरिता ३० सप्टेंंबरपर्यंत मुदत होती. मात्र वाळू उपसा करण्याचा कंत्राट घेणाऱ्याने गावकऱ्यावर चाकूहल्ला केल्यामुळे या घाटावर कारवाई करुन घाटाची परवानगी रद्द करण्याचा प्रस्ताव तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला. येत्या दोन ते तीन दिवसात ही परवानगी रद्द होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.शिवणी-१ मुदतीपूर्वीच बंदसमुद्रपूर तालुक्यातील शिवणी-१ वाळू घाट ५९ लाख १६ हजार ७०० रुपयात घेतला होता. या घाटातून अवैध उत्खनन होत असल्याची माहिती मिळताच कारवाईकरिता गेलेल्या उपविभागीय अधिकाºयांच्या पथकावर नवरंगे नामक वाळू माफियाने पिस्तुल रोखली होती. त्यामुळे हा घाट बंद करण्यात आला. या एकाच्या चुकीमुळे अनेक भागधारकांना चांगलाच फटका बसला आहे.आष्टी तालुक्यातील ईस्माईलपूर आणि देवळी तालुक्यातील हिवरा (कावरे)-१ या दोनच वाळू घाटातून सप्टेंबरपर्यंत वाळू उपसा करता येणार आहे. बाकी घाटांची मुदत संपली आहे. स्थगितीच्या कालावधीत ३७ दिवस घाट बंद असल्याने त्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.डॉ.इम्रान शेख,जिल्हा खनिकर्म अधिकारी वर्धा

टॅग्स :sandवाळू