शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

राज्यात वाळूघाटांचा लिलाव अशक्यच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 17:08 IST

Wardha News Sand वर्धा जिल्ह्यातील प्रस्तावित वाळू घाटांसंदर्भात जनसुनावणी घेऊन पर्यावरण अनुमतीकरिता प्रस्ताव सादर केले मात्र, राज्यस्तरीय समितीच्या बैठकीला अद्याप मुहूर्तच सापडला नसल्याने प्रस्ताव धुळखात पडले आहे.

ठळक मुद्देआता नव्याने मोजमाप होण्याची शक्यतापर्यावरण अनुमती पेंडींग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नवीन वाळू निर्गती धोरणानुसार यावर्षी पहिल्यांदाच राज्यभरातील वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया राबविली जात आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रस्तावित वाळू घाटांसंदर्भात जनसुनावणी घेऊन पर्यावरण अनुमतीकरिता प्रस्ताव सादर केले मात्र, राज्यस्तरीय समितीच्या बैठकीला अद्याप मुहूर्तच सापडला नसल्याने प्रस्ताव धुळखात पडले आहे. परिणामी राज्यभरातील वाळूघाटांचे लिलाव रखडल्याने विनापरवानगी वारेमाप वाळू उपसा सुरु आहे. यात शासनाचा कोट्यवधीचा बुडत असला तरी शासनासह लोकप्रतिनिधीही गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात तालुका तांत्रिक समितीव्दारे ‘ओपन कास्ट’ पद्धतीने उत्खनन करण्याकरिता वाळू घाट प्रस्तावित केले. त्यानंतर जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाकडून महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे प्रस्ताव सादर केले. त्यानंतर पर्यावरण अनुमतीकरिता जनसुनावणी घेणे बंधनकारक केल्याने ऐरवी मार्च-एप्रिलमध्ये होणारे लिलाव रखडले. जूलैमध्ये जनसुनावणी घेऊन पुन्हा प्रस्ताव सादर केलेत. मात्र अद्यापही अनुमती मिळाली नसल्याने लिलाव प्रक्रिया पेंडींग आहेत.

पावसामुळे आता वाळू घाटामध्ये नवीन वाळू आल्याने पुन्हा नव्याने मोजमाप करण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाले तर पाठविलेल्या प्रस्तावानुसार वाळू घाटांचे लिलाव होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे शासनासह लोकप्रतिनिधी आता याबाबत काय भूमिका घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

शासकीय कामांनाही ब्रेकशासकीय इमारती, रस्ते व नाल्यांचे बांधकाम सुरूच असून बरेच कामे वाळू अभावी रखडलेली आहे. कंत्राटदाराला दामदुप्पट दरात वाळू घेणे परवडणारे नसल्याने काहींनी काम बंद केले आहे. वाळू घाट लिलावाच्या प्रतीक्षेत काहींच्या कामांची मुदत संपली. तर काहींनी काम आटोपण्याच्या नादात चुरीचा किंवा माती मिश्रित वाळूचा वापर चालविला आहे.

लिलाव नसला तरी उपसा सुरुचवाळूच्या माध्यमातून शासनाला दरवर्षी कोट्यवधीचा निधी मिळतो. पण, वर्षभरापासून लिलाव प्रक्रिया रखडल्याने शासनाचा महसूल बुडाला. विशेषत: लिलाव झाला नसला तरीही वाळू माफियांकडून अवैधरित्या उपसा सुरुच आहे. यामध्ये शासनाच्या तिजोरीत ठणठणाट असला तरीही काही अधिकारी, कर्मचारी व माफीयांचे गल्ले भरले जात आहे.

घराचे स्वप्नही अधुरेचआवास योजनेतून अनेकांना घरे मंजूर झाली असून त्याचे बांधकामही वाळू अभावी रखडले आहे. सर्व सामान्यांनाही घराचे बांधकाम करायचे आहे पण, गेल्या वर्षभरापासून त्यांना वाळूघाट लिलावाची प्रतीक्षा आहे. चार ते पाच हजार रुपयात मिळणारी एक ट्रॅक्टर वाळू आता आठ हजार रुपयात विकल्या जात आहे. तसेच मोठ्या डंपरकरिता ४० ते ४५ हजार रुपये मोजावे लागत आहे.

टॅग्स :sandवाळू