शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
7
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
8
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
9
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
10
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
11
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
12
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
13
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
14
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
15
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
16
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
17
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
20
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा

तीन टप्प्यात धामची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 23:13 IST

वर्धा जिल्ह्याच्या मध्यातून वाहत असलेल्या धाम नदीचे पात्र झाडे, पाणगवत, विविध प्रकारच्या जलपर्णींमुळे धोक्यात आले आहे. यामुळे तिचे पात्र अरुंद झाले आहे. या पात्राची स्वच्छता करण्याकरिता व जलस्त्रोताचे बळकटीकरण करण्याकरिता या नदीची तीन टप्प्यात स्वच्छता करण्यात येत आहे.

ठळक मुद्देजलस्त्रोताचे बळकटीकरण : नाम फाऊंडेशन व जिल्हा प्रशासनाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा जिल्ह्याच्या मध्यातून वाहत असलेल्या धाम नदीचे पात्र झाडे, पाणगवत, विविध प्रकारच्या जलपर्णींमुळे धोक्यात आले आहे. यामुळे तिचे पात्र अरुंद झाले आहे. या पात्राची स्वच्छता करण्याकरिता व जलस्त्रोताचे बळकटीकरण करण्याकरिता या नदीची तीन टप्प्यात स्वच्छता करण्यात येत आहे. हा उपक्रम नाम फाऊंडेशन आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येत आहे. ही मोहीम उद्या शनिवारपासून सुरू होणार असून त्याला ‘धाम नदी स्वच्छता अभियान’ असे नाव देण्यात आले आहे.या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, नाम फाऊंडेशनचे विदर्भ-खानदेश प्रमुख हरिश इथापे यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी करुणा जुईकर, महिला व बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट, जि.प.सदस्य राजश्री राठी यांची उपस्थिती होती.शिवाय याच नदीतून वर्धा शहराला आणि आसपासच्या गावांना पिण्याचे पाणी पुरविण्यात येते. या नदीपात्रात असलेल्या जलपर्णीमुळे पाणी दूषित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, शिवाय नदीचे पात्र अरुंद झाले आहे. या सर्व प्रकारामुळे नदीपात्रात पाणी राहत नसल्याचे समोर आले आहे. ही नदी जिल्हयातील काचनूर ते आंजी(मोठी) त.वर्धा ते येळाकेळी,त.सेलु या भागातून धाम नदी वाहते.या नदीमधुन वर्धा व परिसरातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. नदीपात्रात असलेल्या अस्वच्छतेमुळे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत अत्यंत कमकुवत झाले आहेत. येत्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत आताच दिसत आहे. ही भीषण समस्या, या भागातील लोकांची व लोकप्रतिनिधींची मागणी पाहता जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय आणि नाम फाऊंडेशनच्यावतीने या नदीच्या स्वच्छतेचा निर्णय घेतला आहे. ही स्वच्छता मोहीम उद्यापासून प्रारंभ होणार आहे.या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मेश्राम, कार्यकारी अभियंता नरेश शेनवार, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग काळे, आंजी (मोठी) येथील सरपंच जगदीश संचारिया, सामाजिक कार्यकर्ते अशोक कलोडे, सुनील गफाट प्रामुख्याने उपस्थित होते.नाम फाऊंडेशन आणि लोकसहभागातून मोहीमधाम नदीपात्राच्या स्वच्छतेची मोहीम शासनाच्या सहकार्याने लोकसहभागातून नाम फाऊंडेशन राबविणार आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा पहिला आर्वी तालुक्यातील काचनुर, वर्धा तालुक्यातील आंजी (मोठी) येथे दुसरा टप्पा तर तिसरा टप्पा सेलू तालुक्यातील येळाकेळी येथे राबविण्यात आला.

टॅग्स :riverनदी