शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

१३१ पैकी ८५ व्यक्तींचे स्त्राव नमुने ‘निगेटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 05:00 IST

कंटेनरमध्ये दाटून बसून भिवंडी येथून अलाहाबाद येथे जात असलेल्या चालकासह एकूण ४५ व्यक्तींना तळेगाव श्या.पंत शिवारात असलेल्या बॉर्डर सील पॉर्इंटवर कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर या व्यक्तींची आरोग्य तपासणी करून त्यांना इन्स्ट्रट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर त्यांचे स्त्राव तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.

ठळक मुद्दे४६ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा : ४५ व्यक्ती इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नसला तरी कोविड-१९ पासून दक्षता म्हणून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना बाधित देश तसेच जिल्ह्यांमधून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले. याच होम क्वारंटाईनच्या कालावधीत काहींची प्रकृती बिघडल्याने त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. प्रकृती बिघडलेल्या या व्यक्तींसह आणखी काही व्यक्तींचे असे एकूण १३१ व्यक्तींचे स्त्राव नमुने आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यापैकी ८५ व्यक्तींचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून या कोरोनामुक्त असल्याचे पुढे आले आहे. तर उर्वरित ४६ व्यक्तींच्या स्त्राव नमुन्यांच्या अहवालाची जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला प्रतीक्षा आहे.कंटेनरमध्ये दाटून बसून भिवंडी येथून अलाहाबाद येथे जात असलेल्या चालकासह एकूण ४५ व्यक्तींना तळेगाव श्या.पंत शिवारात असलेल्या बॉर्डर सील पॉर्इंटवर कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर या व्यक्तींची आरोग्य तपासणी करून त्यांना इन्स्ट्रट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर त्यांचे स्त्राव तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. याच ४५ व्यक्तींसह आणखी एका व्यक्तीचा स्त्राव नमुन्याचा अहवाल जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला प्राप्त झालेला नाही. बुधवारी हे प्रलंबित अहवाल प्राप्त होतील असा विश्वास आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.सध्यास्थितीत एक व्यक्ती आयसोलेशनमध्ये असला तरी वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण अद्याप आढळलेला नाही. कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आणि इतरांनाही निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तींने घरातच थांबण्याचे आवाहन आरोग्य विभागासह समाजातील विविध स्तरातून करण्यात येत आहे.१,९२६ व्यक्ती गृह विलगीकरणातकोरोना बाधित राज्यांसह जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात १५ हजार ६४९ व्यक्ती आल्याची नोंद घेण्यात आली आहे. या संपूर्ण व्यक्तींच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारून त्यांना गृहविलगिकरणात ठेवण्यात आले आहे. त्यापैकी १३ हजार ७२३ व्यक्तींचा गृहविलगीकरणाचा कालावधी संपल्याने तसेच त्यांच्यात कोरोनाची कुठलीही लक्षणे न आढळल्याने या व्यक्तींना गृहविलगीकरणातून मुक्त करण्यात आले आहे. तर सध्यास्थितीत १ हजार ९२६ व्यक्ती गृहविलगिकरणात आहेत.आर्वीत आणखी चौघांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्काआर्वीत आणखी चार व्यक्तींच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला आहे. शिवाय त्यांना आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. आर्वी येथे खडकपुरा वॉर्डात नागपूर (मनंसर) येथून दुचाकीने एक व्यक्ती आल्याची तर अमरावती येथून दोघे व्यक्ती पाहूण पणासाठी आल्याची शिवाय वाघोली पुणे येथून एक व्यक्ती असे एकूण चार व्यक्ती आर्वी शहरात आल्याची माहिती पालिकेच्या पथकाला मिळाली. त्यानंतर या चारही व्यक्तींची आरोग्य तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस