शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सेलू शहराला होतोय क्षारयुक्त पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

सेलू ग्रामपंचायतीचे नगर पंचायतमध्ये रूपांतर होताच नवी पाणी पुरवठा योजना सेलू शहरासाठी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. बोरधरणाच्या पात्राशेजारी भव्य अशी विहीर खोदुन तेथील पाणी पाईपलाईनद्वारे सेलू शहरातील खोडके ले-आउटपर्यंत आणण्याचे प्रयोजन होते. त्या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याचे प्रस्तावित होते.

ठळक मुद्देआरोग्य धोक्यात : बोरधरणवरून पाणीपुरवठा योजना गेली कुठे?

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात क्षारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे शरीराची हाडे ठिसूळ होणे, अन्न पचन प्रक्रियेत बिघाड, लघवीचा आजार याचे अरुग्ण शहरात झपाट्याने वाढत आहे. शरीरास अत्यंत धोकादायक असलेले दूषित पाणी शहरवासी कित्येक वर्षापासून पीत आहेत.बोरधरणवरून सेलूसाठी पाणी पुरवठा करणारी योजना नगर पंचायतीची स्थापना होताच मंजूर झाली. मग घोडे अडले कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.सेलू शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या स्रोतात क्षारांचे प्रमाण मोठे असून ते आरोग्यास घातक असल्याचे वैद्यकीय सूत्र सांगते. येथील पाण्यात ६५० ते ७०० टीडीएस आहे. ज्यांची आर्थिक ऐपत आहे, त्यांनी घरी आर.ओ. मशीन लावून त्यातील पाण्याचा पिण्यासाठी वापर केला जातो, तर काही जण पाण्याच्या कॅन विकत घेऊन पिण्यासाठी वापरतात. मात्र, ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, त्यांना नळातून थेट येते तेच पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. यामुळे सर्वसामान्यांचे व लहान मुलांचे आरोग्य धोकादायक वळणावर आहे. या गंभीर बाबीकडे शासनाचे, पाठपुरावा करणाºया नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे.सेलू ग्रामपंचायतीचे नगर पंचायतमध्ये रूपांतर होताच नवी पाणी पुरवठा योजना सेलू शहरासाठी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. बोरधरणाच्या पात्राशेजारी भव्य अशी विहीर खोदुन तेथील पाणी पाईपलाईनद्वारे सेलू शहरातील खोडके ले-आउटपर्यंत आणण्याचे प्रयोजन होते. त्या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याचे प्रस्तावित होते. शासनाकडून बोरधरण ते सेलू अशी पाईपलाईन टाकण्याकरिता मोजमापही अभियंत्यांकडून करण्यात आले. चांगली योजना कार्यान्वित होण्याची वाट पाहून सेलूकर थकले; मात्र या योजनेला मूर्त रूप देण्यात आले नाही. ही योजना बारगळली की विचाराधीन आहे, याबाबत नगर पंचायतीकडे माहितीच नाही. ग्रामपंचायतीचे नगर पंचायतमध्ये रूपांतर झाल्यावर कोटीने निधी प्राप्त झाला. रस्ते, नाल्या यांचे बांधकाम सुरू आहे. शासनस्तरावरून आमदार डॉ. पंकज भोयर यांनी प्रयत्न करून सेलूला विविध योजनामधून पुरेसा निधी दिला. नगर पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र बोरधरणच्या पाणीपुरवठा योजनेबाबत पाठपुरावा केला नाही. सेलू शहराला जलशुद्धीकरण केंद्राद्वारे पाणीपुरवठा करण्याची आरोग्यासाठी नितांत गरज आहे. त्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, अशी मागणी आहे.लोकप्रतिनिधींकडूनही पाठपुरावा नाहीदहा वर्षांपूर्वी शासनाने बृहत आराखडा तयार करून ११ गावांची बोरधरणवरून पाणी पुरवठा योजना तयार केली होती. त्यात बोरी, हिंगणी, किन्ही, मोही, घोराड, सेलू, धानोली आदी गावांचा समावेश होता. कालांतराने ती योजना पुढे सरकली नाही. त्यानंतर नवीन नगर पंचायत निर्माण होताच बोरधरणवरून थेट सेलूत पाणी आणून जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याची योजना आली. अभियंत्यांकडून सर्व्हे झाला. मात्र, पुढे काय झाले याविषयी नगर पंचायतीला माहिती नाही. एकाही नगरसेवकाने याचा पाठपुरावाही केला नाही, हे सेलूकरांचे दुदैव आहे.पिण्याच्या पाण्यात टीडीएस शंभरपर्यंत असणे व ते पाणी पिणे वैद्यकीयदृष्ट्या सोईचे मानले जाते. मात्र, सेलूत ६५० ते ७०० टीडीएस असलेले पाणी प्यायले जाते. यामुळे शरीराची हाडे कमजोर झाली आहेत. अन्नपचन प्रक्रिया बिघडत असून लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.

टॅग्स :Waterपाणी