शहरं
Join us  
Trending Stories
1
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
2
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
3
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
4
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
5
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
6
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
7
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
8
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
9
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
10
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
11
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
12
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
13
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
14
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
15
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
16
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
17
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ
18
प्रेमासाठी मोलकरीण बनली चोर, ज्या घरात करायची धुणीभांडी तिथेच मारला डल्ला, त्यानंतर...  
19
गौहर खाननं लग्नासाठी धर्मांतराची अट घातली, अभिनेत्यानं संपवलं नात; कुशाल टंडनचा खुलासा

उगमपत्र नसल्याने रोखली आठ लाखांच्या बियाण्यांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:00 IST

खरीप हंगाम सुरू झाला असून बियाणे व खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रांवर गर्दी होत आहे. अशात बाजारपेठेत बोगस बियाण्यांचा शिरकाव होण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाच्यावतीने एकूण नऊ भरारी पथक तयार करण्यात आले आहे. याच पथकांनी मागील तीन दिवसांत विशेष मोहीम हाती घेऊन १५ ते २० कृषी सेवा केंद्र व गोदामांची तपासणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाचे आगमन होताच बियाणे खरेदीसाठी शेतकरी कृषी केंद्रांमध्ये गर्दी करतात. याच दरम्यान बोगस बियाणेही बाजारपेठेत येत त्याची विक्री होते. बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये या हेतूने कृषी विभागाकडून सध्या धडक कृषी केंद्र तपासणी मोहीम राबविली जात आहे. याच मोहिमेदरम्यान ११ कृषी केंद्रांमध्ये उगमपत्र नसलेले आठ लाख रुपये किंमतीचे बियाणे आढळून आल्याने त्या बियाण्यांच्या विक्रीला ब्रेक लावण्यात आला आहे. शिवाय सदर कृषी केंद्र व्यावसायिकांना त्या बियाण्यांबाबतचे आवश्यक कागदपत्र दहा दिवसांत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.खरीप हंगाम सुरू झाला असून बियाणे व खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रांवर गर्दी होत आहे. अशात बाजारपेठेत बोगस बियाण्यांचा शिरकाव होण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाच्यावतीने एकूण नऊ भरारी पथक तयार करण्यात आले आहे. याच पथकांनी मागील तीन दिवसांत विशेष मोहीम हाती घेऊन १५ ते २० कृषी सेवा केंद्र व गोदामांची तपासणी केली. या मोहिमेदरम्यान दुकानदाराचे बियाणे, खत, किटकनाशके परवाना, साठा नोंदवही, बिल बुक, विक्री करीत असलेले बियाणे, खताचे उगमपत्राची तपासणी करण्यात आली.कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पाहणीत जिल्ह्यातील अकरा कृषी केंद्रांमध्ये उगमपत्र नसलेले आठ लाख रुपये किंमतीचे बियाणे आढळून आल्याने त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. शिवाय सदर कृषी केंद्र व्यावसायिकांना त्यांची बाजू मांडण्यासह आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी दहा दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांच्या मार्गदर्शनात कृषी उपसंचालक अजय राऊत, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक पी. ए. घायतिडक यांनी केली असून सदर मोहीम आणखी काही दिवस सुरू राहणार आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र