शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

रिकंडिशनिंग बसगाड्यांतून सुरक्षित वाहतुकीचा प्रयत्न

By admin | Updated: January 3, 2015 23:06 IST

जिल्ह्यात कालमर्यादा व रिकंडिशनिंग झालेल्या बसगाड्यांतून सुरक्षित वाहतूक करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात वर्षभरापासून एकही नवी गाडी आली नसल्याने उपलब्ध

वर्षभरापासून नवी गाडी नाही : जिल्ह्यात ३०४ गाड्यांतून चालते वाहतूक रूपेश खैरी - वर्धा जिल्ह्यात कालमर्यादा व रिकंडिशनिंग झालेल्या बसगाड्यांतून सुरक्षित वाहतूक करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात वर्षभरापासून एकही नवी गाडी आली नसल्याने उपलब्ध असलेल्या गाड्यांच्या माध्यमातून नागरिकांना गावी पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात पाच आगारातून परिवहन महामंडळाचे काम सुरू आहे. यात एकूण ३०४ गाड्या प्रवाशांच्या दिमतीला आहेत. यातील बऱ्याच गाड्यांची मर्यादा संपली असतानाही त्या रस्त्याने धावत आहेत. गाड्यांची मर्यादा संपल्याने त्या रस्त्याने धावताना कुठे बंद पडतील याचा नेम नाही. तसे अुनभव प्रवाशांना आलेही आहेत. बसगाड्या रस्त्यात प्रवासादरम्यान बंद पडत असल्याने प्रवाशांना त्या मार्गाने जाणाऱ्या इतर गाड्या वा बसस्थानकावरून दुसरी गाडी पाठवून गावी पोहोचविण्याची वेळ महामंडळावर अनेकदा आली आहे. आशा सर्व प्रकारातून जिल्ह्यात परिहवन महामंडळ सुरक्षा सप्ताह साजरा करीत असल्याचे दिसते. जिल्ह्यातकरिता २० नवीन बसगाड्या मागविण्यात आल्याची माहिती आहे.४० मुदतबाह्य गाड्या प्रवाशांच्या दिमतीला मोटर वाहन कायद्यानुसार साधारणत: एका बसगाडीचा कालावधी आठ वर्षे देण्यात आला आहे. याकालावधीत बसगाडी प्रवासायोग्य असल्याचे समजल्या जाते. वर्धेत मात्र हा कालावधी झालेल्या जवळपास ४० गाड्या रस्त्याने धावत असल्याची माहिती आहे. यामुळे प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.तब्बल २५ गाड्या स्क्रॅपमध्ये जाणार कालमर्यादा संपून वाहतूक करणाऱ्या सुमारे २५ गाड्या स्क्रॅपमध्ये जाणार असल्याची माहिती आहे. या गाड्या अजूनही रस्त्यावर धावत असून नवीन गाड्या येईपर्यंत या गाड्या रस्त्यावर धावतच राहणार आहेत. अशातच या बसगाड्या कुठे बंद पडतील याचा मात्र नेम नाही. मात्र नाईलाज असल्यामुळे परिवहन महामंडळाचा हा खटाटोप करावा लागत आहे. जिल्ह्याकरिता २० नवीन गाड्यांचा प्रस्ताव नवीन बसगाड्यांची निर्मिती काही दिवसांपासून बंद होती. या कारणाने नव्या गाड्याच उपलब्ध झाल्या नाहीत. वर्षभरापासून गाड्यांची निर्मिती सुरू झाली. वर्धा आगाराकडून २० गाड्यांचा प्रस्ताव आहे, परंतु एकही नवी गाडी मिळालेली नाही. इतरत्र वापरलेल्या गाड्याच या विभागाच्या माथी मारल्या जात असल्याचे वास्तव आहे. या गाड्यांना रिकंडीशनिंग करूनच सेवा देणे सुरू आहे.