शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

रिकंडिशनिंग बसगाड्यांतून सुरक्षित वाहतुकीचा प्रयत्न

By admin | Updated: January 3, 2015 23:06 IST

जिल्ह्यात कालमर्यादा व रिकंडिशनिंग झालेल्या बसगाड्यांतून सुरक्षित वाहतूक करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात वर्षभरापासून एकही नवी गाडी आली नसल्याने उपलब्ध

वर्षभरापासून नवी गाडी नाही : जिल्ह्यात ३०४ गाड्यांतून चालते वाहतूक रूपेश खैरी - वर्धा जिल्ह्यात कालमर्यादा व रिकंडिशनिंग झालेल्या बसगाड्यांतून सुरक्षित वाहतूक करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात वर्षभरापासून एकही नवी गाडी आली नसल्याने उपलब्ध असलेल्या गाड्यांच्या माध्यमातून नागरिकांना गावी पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात पाच आगारातून परिवहन महामंडळाचे काम सुरू आहे. यात एकूण ३०४ गाड्या प्रवाशांच्या दिमतीला आहेत. यातील बऱ्याच गाड्यांची मर्यादा संपली असतानाही त्या रस्त्याने धावत आहेत. गाड्यांची मर्यादा संपल्याने त्या रस्त्याने धावताना कुठे बंद पडतील याचा नेम नाही. तसे अुनभव प्रवाशांना आलेही आहेत. बसगाड्या रस्त्यात प्रवासादरम्यान बंद पडत असल्याने प्रवाशांना त्या मार्गाने जाणाऱ्या इतर गाड्या वा बसस्थानकावरून दुसरी गाडी पाठवून गावी पोहोचविण्याची वेळ महामंडळावर अनेकदा आली आहे. आशा सर्व प्रकारातून जिल्ह्यात परिहवन महामंडळ सुरक्षा सप्ताह साजरा करीत असल्याचे दिसते. जिल्ह्यातकरिता २० नवीन बसगाड्या मागविण्यात आल्याची माहिती आहे.४० मुदतबाह्य गाड्या प्रवाशांच्या दिमतीला मोटर वाहन कायद्यानुसार साधारणत: एका बसगाडीचा कालावधी आठ वर्षे देण्यात आला आहे. याकालावधीत बसगाडी प्रवासायोग्य असल्याचे समजल्या जाते. वर्धेत मात्र हा कालावधी झालेल्या जवळपास ४० गाड्या रस्त्याने धावत असल्याची माहिती आहे. यामुळे प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.तब्बल २५ गाड्या स्क्रॅपमध्ये जाणार कालमर्यादा संपून वाहतूक करणाऱ्या सुमारे २५ गाड्या स्क्रॅपमध्ये जाणार असल्याची माहिती आहे. या गाड्या अजूनही रस्त्यावर धावत असून नवीन गाड्या येईपर्यंत या गाड्या रस्त्यावर धावतच राहणार आहेत. अशातच या बसगाड्या कुठे बंद पडतील याचा मात्र नेम नाही. मात्र नाईलाज असल्यामुळे परिवहन महामंडळाचा हा खटाटोप करावा लागत आहे. जिल्ह्याकरिता २० नवीन गाड्यांचा प्रस्ताव नवीन बसगाड्यांची निर्मिती काही दिवसांपासून बंद होती. या कारणाने नव्या गाड्याच उपलब्ध झाल्या नाहीत. वर्षभरापासून गाड्यांची निर्मिती सुरू झाली. वर्धा आगाराकडून २० गाड्यांचा प्रस्ताव आहे, परंतु एकही नवी गाडी मिळालेली नाही. इतरत्र वापरलेल्या गाड्याच या विभागाच्या माथी मारल्या जात असल्याचे वास्तव आहे. या गाड्यांना रिकंडीशनिंग करूनच सेवा देणे सुरू आहे.