शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

शेतकऱ्यांसाठी होणार ‘रूरल मॉल’

By admin | Updated: July 6, 2017 01:18 IST

वर्षभर शेतात राबल्यावर शेतकरी जेव्हा शेतमाल विक्रीसाठी बाजारात आणतो त्यावेळीच नेमके शेतमालाचे भाव पडतात.

पुरवठा विभागाच्या गोदामाचा वापर : शेतकरी उत्पादक कंपनीकडे व्यवस्थापन लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वर्षभर शेतात राबल्यावर शेतकरी जेव्हा शेतमाल विक्रीसाठी बाजारात आणतो त्यावेळीच नेमके शेतमालाचे भाव पडतात. व्यापाऱ्यांच्या एकीमुळे शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांना वेगळ्या बाजारपेठेचे पर्याय उपलब्ध करून देण्याची गरज आहे. शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेवर आधारित दि रूरल मॉल शेतकऱ्यांसाठी उभा करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या संकल्पनेतून हा मॉल साकार होणार आहे. यासाठी मुख्य रेल्वे स्थानकासमोरील पुरवठा विभागाचे अनेक दिवसांपासून बंद असलेले ६ हजार चौरस फुट जागेच्या गोदामची जागा यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुरवठा विभाग ही जागा आत्मा प्रकल्प संचालक यांना उपलब्ध करून देणार आहे. शहराच्या मुख्य ठिकाणी हा मॉल उभा राहणार असून ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. हा मॉल शेतकरी उत्पादक कंपनीला चालवायला देण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी अगदी वाजवी भाडे आकारण्यात येईल. यासाठी ६ उत्पादक कंपन्यानी प्रस्ताव दिला असून त्यांना व्यवस्थापनांचे सादरीकरण करण्यास जिल्हाधिकाऱ्यांंनी सांगितले. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत कार्यकारी समिती गठित करण्यात आली. यात आत्मा, केम, माविम, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान, नाबार्ड या विभागातील अधिकारी तसेच बजाज फाऊंडेशनचा समावेश असेल. ही समिती मॉलच्या व्यवस्थापनासाठी येणाऱ्या अडचणींवर विचार विनीमय करून तोडगा काढेल. येत्या १ आॅगस्ट ला सदर मॉल वर्धेकरांच्या सेवेत आणण्यासाठी युद्धस्तरावर काम सुरू आहे. शेतकरी उत्पादक गटाकडून उत्पादित शेतीमाल व प्रक्रियायुक्त पदार्थाना एकाच ठिकाणी व्यासपीठ मिळेल. या माध्यमातून विना पॉलिश डाळ, सेंद्रीय पद्धतीने उत्पादीत शेतमाल अशी गुणवत्तापूर्ण उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात येईल. शेतकरी उत्पादित मालाचे पूरक ब्रॅन्डींगही करण्यात येईल. येथे शेतमाल विक्रीला आणावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.