शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

राहुल गांधी पाळणार सेवाग्राम आश्रमाचे नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 22:40 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी नेहमीच ‘साधे जीवन, उच्च विचार’ यांची शिकवण दिली. त्यांच्या कार्याने पावन झालेल्या सेवाग्राम आश्रमात ही परंपरा काटेकोरपणे पाळण्यात येते व आश्रमात येणाऱ्यांना तेथील नियम पाळणे अनिवार्य आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमेटीच्या कार्यकारी समितीच्या बैठकीला येत असलेले ‘यूपीए’ अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग हेदेखील आश्रमाचे नियम पाळणार आहेत. हे तिन्ही नेते पंक्तीत चटईवर बसून जेवणार आहेत. तसेच स्वत:चे ताटदेखील धुणार आहेत. प्रत्यक्ष कृतीतूनच हे नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनादेखील हाच संदेश देणार आहेत, अशी माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देचटईवर जेवणार, स्वत:चे ताटदेखील धुणार : सर्व नेते पंक्तीत घेणार जेवण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी नेहमीच ‘साधे जीवन, उच्च विचार’ यांची शिकवण दिली. त्यांच्या कार्याने पावन झालेल्या सेवाग्राम आश्रमात ही परंपरा काटेकोरपणे पाळण्यात येते व आश्रमात येणाऱ्यांना तेथील नियम पाळणे अनिवार्य आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमेटीच्या कार्यकारी समितीच्या बैठकीला येत असलेले ‘यूपीए’ अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग हेदेखील आश्रमाचे नियम पाळणार आहेत. हे तिन्ही नेते पंक्तीत चटईवर बसून जेवणार आहेत. तसेच स्वत:चे ताटदेखील धुणार आहेत. प्रत्यक्ष कृतीतूनच हे नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनादेखील हाच संदेश देणार आहेत, अशी माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली.सेवाग्राम आश्रम परिसरात अखिल भारतीय काँग्रेस कमेटीच्या कार्यकारी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यास आश्रमाच्या पदाधिकाºयांनी नियमांचा हवाला देत नकार दिला. मात्र सर्व नेत्यांच्या भोजनाची परवानगी मात्र दिली आहे. आश्रमातील परंपरेनुसार येथे साधे जेवण तयार करण्यात येणार आहे. येथेच सर्व नेत्यांचे व पदाधिकाºयांचे जेवण होईल अशी राहुल गांधी यांची सूचना होती. आश्रमाच्या नियमावलीनुसार येथे जेवणाºयांची व्यवस्था शांतीभवनच्या मागे असलेल्या ‘रसोडा’ येथे करण्यात येते. प्रत्येकाला पंक्तीत चटईवर बसून जेवणे, ताटातील पूर्ण अन्न संपविणे, स्वत:चे ताट धुणे या गोष्टी अनिवार्य असतात. गांधी आश्रमात येत असताना आम्ही महात्मा गांधी यांचे अनुयायीच आहोत. त्यामुळे येथील नियमांचे पालन आम्ही स्वत:पासून सुरू करू, असे राहुल गांधी यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यानुसार ते स्वत:पासूनच ही सुरुवात करणार आहेत. अगदी रांगेत उभे राहून जेवण घेण्यापासून ते ताट, वाटी, पेला धुवून जागच्या जागी करण्याचे काम ते स्वत: करणार आहेत.नियमांचे पालन करासूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांनी याबाबत पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. गांधी आश्रमातील प्रत्येक नियमाचे पालन झालेच पाहिजे. समाजातील आपले ‘स्टेटस’ बाजूला ठेवून केवळ गांधी विचारांवर चालणारे कार्यकर्ते या भावनेतूनच प्रत्येकाने येथे आले पाहिजे आणि नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSewagramसेवाग्राम