शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जादा प्रवासी भाडे घेणाऱ्यांवर आरटीओ करेल धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2021 05:00 IST

दिवाळी सणादरम्यान कुठल्याही प्रवाशाची आर्थिक पिळवणूक होऊ नये या हेतूने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात वर्धा येथील उपप्रादेशिक परिवहन विभाग विशेष वाहन तपासणी मोहीम राबविणार आहे. या मोहिमेदरम्यान खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून कुण्या प्रवाशाकडून शासकीय नियम डावलून जास्तीचे प्रवास भाडे तर घेतल्या गेले नाही ना याची शहानिशा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवाळी तसेच भाऊबीजचे औचित्य साधून अनेक व्यक्ती आपल्या मूळगावी परततात. त्यामुळे या दिवसात मेट्रो सिटीतून येणाऱ्या व मेट्रो सिटीत परतणाऱ्यांची ही संख्या मोठी असते. दिवाळी सणादरम्यान कुठल्याही प्रवाशाची आर्थिक पिळवणूक होऊ नये या हेतूने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात वर्धा येथील उपप्रादेशिक परिवहन विभाग विशेष वाहन तपासणी मोहीम राबविणार आहे. या मोहिमेदरम्यान खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून कुण्या प्रवाशाकडून शासकीय नियम डावलून जास्तीचे प्रवास भाडे तर घेतल्या गेले नाही ना याची शहानिशा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. ही मोहीम जिल्ह्यात यशस्वी राबविण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या दाेन चमू सज्ज करण्यात आल्या आहेत. दोषी आढळणाऱ्या ट्रॅव्हल्स चालक व मालकांवर कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीही सदर मोहीम राबविण्यात आली होती. त्यामुळे त्यावेळी वर्धा जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात  तसेच जिल्ह्याबाहेरून वर्धेत येणाऱ्यांची संभाव्य पिळवणुकीला ब्रेक लागला होता.

तीन निरीक्षकांचा राहणार वॉच-    दिवाळी, भाऊबीज व इंग्रजी नवीन वर्षाच्या औचित्याने प्रवाशांची होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीच्या प्रकाराला ब्रेक लावण्यासाठी वर्धा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या दोन चमू सज्ज करण्यात आल्या आहेत. या दोन चमूत तीन निरीक्षकांचा समावेश राहणार असून त्यांच्याकडून प्रत्येक खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाणार आहे.

५०० वाहन तपासण्याचा मानस-    दिवाळीनिमित्त उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने मागील वर्षी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष वाहन तपासणी मोहिमेचा प्रवाशांनाही मोठा फायदा झाला होता. शिवाय दिवाळीनिमित्त होणाऱ्या पिळवणुकीच्या प्रकाराला ब्रेक लागला होता. तर यंदाही ही मोहीम राबविण्याचे निश्चित करण्यात आले असून यंदा किमान ५०० खासगी प्रवासी वाहनांची तपासणी करण्याचा मानस वर्धा उपप्रादेशिक परिवहन विभागाचा आहे.

मागील वर्षी तपासली ३२८ वाहने-    दिवाळीचे औचित्य साधून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होऊ नये म्हणून मागील वर्षी वर्धा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने ३२८ खासगी प्रवासी वाहनांची तपासणी करण्यात आली होती. तर यंदा ५०० वाहनांची तपासणी करण्याचा मानस आहे.

दिवाळीनिमित्त अनेक व्यक्ती आपल्या मूळ गावी येतात. याचाच फायदा घेत प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होण्याची शक्यता असते. याच प्रकाराला आळा घालण्यासाठी यंदाही उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून विशेष वाहन तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी दोन चमू सज्ज करण्यात आली आहेत.- तुषारी बोबडे, प्रभारी सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस