शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जादा प्रवासी भाडे घेणाऱ्यांवर आरटीओ करेल धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2021 05:00 IST

दिवाळी सणादरम्यान कुठल्याही प्रवाशाची आर्थिक पिळवणूक होऊ नये या हेतूने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात वर्धा येथील उपप्रादेशिक परिवहन विभाग विशेष वाहन तपासणी मोहीम राबविणार आहे. या मोहिमेदरम्यान खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून कुण्या प्रवाशाकडून शासकीय नियम डावलून जास्तीचे प्रवास भाडे तर घेतल्या गेले नाही ना याची शहानिशा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवाळी तसेच भाऊबीजचे औचित्य साधून अनेक व्यक्ती आपल्या मूळगावी परततात. त्यामुळे या दिवसात मेट्रो सिटीतून येणाऱ्या व मेट्रो सिटीत परतणाऱ्यांची ही संख्या मोठी असते. दिवाळी सणादरम्यान कुठल्याही प्रवाशाची आर्थिक पिळवणूक होऊ नये या हेतूने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात वर्धा येथील उपप्रादेशिक परिवहन विभाग विशेष वाहन तपासणी मोहीम राबविणार आहे. या मोहिमेदरम्यान खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून कुण्या प्रवाशाकडून शासकीय नियम डावलून जास्तीचे प्रवास भाडे तर घेतल्या गेले नाही ना याची शहानिशा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. ही मोहीम जिल्ह्यात यशस्वी राबविण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या दाेन चमू सज्ज करण्यात आल्या आहेत. दोषी आढळणाऱ्या ट्रॅव्हल्स चालक व मालकांवर कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीही सदर मोहीम राबविण्यात आली होती. त्यामुळे त्यावेळी वर्धा जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात  तसेच जिल्ह्याबाहेरून वर्धेत येणाऱ्यांची संभाव्य पिळवणुकीला ब्रेक लागला होता.

तीन निरीक्षकांचा राहणार वॉच-    दिवाळी, भाऊबीज व इंग्रजी नवीन वर्षाच्या औचित्याने प्रवाशांची होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीच्या प्रकाराला ब्रेक लावण्यासाठी वर्धा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या दोन चमू सज्ज करण्यात आल्या आहेत. या दोन चमूत तीन निरीक्षकांचा समावेश राहणार असून त्यांच्याकडून प्रत्येक खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाणार आहे.

५०० वाहन तपासण्याचा मानस-    दिवाळीनिमित्त उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने मागील वर्षी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष वाहन तपासणी मोहिमेचा प्रवाशांनाही मोठा फायदा झाला होता. शिवाय दिवाळीनिमित्त होणाऱ्या पिळवणुकीच्या प्रकाराला ब्रेक लागला होता. तर यंदाही ही मोहीम राबविण्याचे निश्चित करण्यात आले असून यंदा किमान ५०० खासगी प्रवासी वाहनांची तपासणी करण्याचा मानस वर्धा उपप्रादेशिक परिवहन विभागाचा आहे.

मागील वर्षी तपासली ३२८ वाहने-    दिवाळीचे औचित्य साधून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होऊ नये म्हणून मागील वर्षी वर्धा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने ३२८ खासगी प्रवासी वाहनांची तपासणी करण्यात आली होती. तर यंदा ५०० वाहनांची तपासणी करण्याचा मानस आहे.

दिवाळीनिमित्त अनेक व्यक्ती आपल्या मूळ गावी येतात. याचाच फायदा घेत प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होण्याची शक्यता असते. याच प्रकाराला आळा घालण्यासाठी यंदाही उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून विशेष वाहन तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी दोन चमू सज्ज करण्यात आली आहेत.- तुषारी बोबडे, प्रभारी सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस