शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
4
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
5
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
6
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
7
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
8
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
9
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
10
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
11
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
12
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
13
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
14
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
15
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
16
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
17
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
18
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
19
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी

भवानी तलावात मृत मास्यांचा सडा

By admin | Updated: February 13, 2016 01:27 IST

मासेमारीकरिता लिलावात घेतलेल्या तलावातील मास्यांचा अचानक मृत्यू होत आहे. हा प्रकार कशामुळे याचा अद्याप उलगडा झाला नाही.

कारण गुलदस्त्यात : आठवडाभरापासून मासेमाऱ्यांचे लाखावर नुकसानवर्धा : मासेमारीकरिता लिलावात घेतलेल्या तलावातील मास्यांचा अचानक मृत्यू होत आहे. हा प्रकार कशामुळे याचा अद्याप उलगडा झाला नाही. तळेगाव (टालाटुले) येथील भवानी तलावात सुरू असलेल्या या प्रकारामुळे मासेमाऱ्यांत भीती पसरली आहे. हा तलाव लिलावात घेणाऱ्याचे आतापर्यंत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तळेगाव(टा.) ग्रामपंचायत अंतर्गत असलेला भवानी तलाव हा मासेमारीकरिता लिलावाने देण्यात येतो. हा तलाव मनोहर शिरपूरकर, शेषराव नान्हे, श्रीराम मोरे, मारोती कंडे, भास्कर शिरपूरकर या पाच जणांनी भाडेतत्त्वावर घेतला. त्यांनी लिलावाने तलाव घेतल्यानंतर येथे मत्स्यबीज टाकले. त्याचे उत्पादन येईल या आशेत असताना या तलावातील मासे एकाएकी मृत पावत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तलाव परिसरात मृत मास्यांचा सडा पडलेला असून त्यांच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.हा प्रकार गत आठवड्यापासून सुरू असल्याची माहिती या व्यावसायिकांनी दिली. यामुळे व्यावसायिकांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. मासे मरत असल्याने लिलावाची रक्कम अशी भरावी, असा प्रश्न पडला आहे. संबंधीत विभागाने याची तपासणी करावी अशी मागणी होत आहे. तलावातील मास्यांचा मृत्यू नेमका कशाने होत आहे, याचा खुलासा अद्याप झाला नाही. शुक्रवार बाजाराचा दिवस असल्याने मासेमारांनी हाती आलेले उत्पादन बाजारात नेण्यावर भर दिला. त्यांच्याकडून मत्स्यविभागात तक्रार करण्यात आली नाही. काही मासेमार पशुसंवर्धन विभागात गेल्याची माहिती आहे. तेथून त्यांना तक्रारीकरिता कोणत्या विभागात जावे याची माहिती देण्यात आली नसल्याची ओरड आहे. (तालुका प्रतिनिधी)पशुसंवर्धन विभागाकडून दखल घेण्याची मागणीहा प्रकार एका दिवसाचा नसून तो गत आठ दिवसांपासून सुरू असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले आहे. मास्यांच्या मृत्यू प्रकारात आतापर्यंत सुमारे एक ट्रॉली मास्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. असे असताना या पाचही व्यावसायिकांकडून या प्रकरणी अद्याप कुठलीही तक्रार करण्यात आली नाही. यामुळे मास्यांच्या मृत्यूचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. या प्रकरणी तक्रार झाल्यास चौकशीअंती मासे मरण्याच्या कारणाचा खुलासा होईल. काही मासेमार शुक्रनारी पशुसंवर्धन विभागात तक्रार करण्याकरिता गेल्याची माहिती आहे. नियमानुसार मासेमारांनी त्यांची तक्रार मत्स्यविभागात करणे गरजेचे आहे.