शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

खऱ्या पे्रमात त्यागाची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 23:20 IST

ज्यांना पे्रमाची खरी व्याख्या कळते, त्यांनाच प्रेम करण्याचा नैतिक अधिकारी असतो. खऱ्या प्रेमामध्ये त्यागाची भूमिका फार मोठी असते. आणि ज्यांना त्याग करायला जमतं त्यांनाच जीवनामध्ये खरं प्रेम लाभते.

ठळक मुद्देप्रकाश घोडके : यशवंत महाविद्यालयात रंगली काव्य मैफील

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ज्यांना पे्रमाची खरी व्याख्या कळते, त्यांनाच प्रेम करण्याचा नैतिक अधिकारी असतो. खऱ्या प्रेमामध्ये त्यागाची भूमिका फार मोठी असते. आणि ज्यांना त्याग करायला जमतं त्यांनाच जीवनामध्ये खरं प्रेम लाभते. आपल्याला जगातील सर्व विचारवंतानी, महापुरूषांनी, तत्ववेत्यांनी एकमेकांवर प्रेम करावयाची शिकवण दिली. पण प्रेम करत असताना त्या प्रेमाचा अर्थही नीट कळायला हवा, असे प्रतिपादन कवी प्रकाश घोडके यांनी केले.यशवंत महाविद्यालयात आयोजित काव्य मैफीलीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. त्यांनी ‘प्रेम’ या आशयावर सरस आणि दर्जेदार कविता सादर करून विद्यार्थ्यांना प्रेमाचा खरा अर्थ समजावून सांगितला. मराठी विभागाच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. वीरेंद्र बैस होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. न. ह. खोडे, प्रा. प्रमोद नारायणे यांची उपस्थिती होती. ‘तुझ्या येण्याला वेळ नसते’, ‘असा बावळा सावळा’, ‘उभा जन्म झाला उन्हाळ उन्हाळ’, ‘तुझे ओठ ताजे जसा पावसाळा’ या सारख्या कसदार अशा कविता सादर करून कवी प्रकाश घोडके यांनी उपस्थितांची मने जिंकली.शिवाय ‘तुझ्या दाराहून जाता, डोळे अडले दारात, अनं तुझ्या डोईचा पदर, नीट राहिना वाºयात’, ‘गढुळल्या दाही दिशा, कडू झाली सारी वाणी, अरे आता धुवून वापरा, घरी पावसाचे पाणी’ या कविता सादर करून कवी प्रकाश घोडके यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. न.ह. खोडे यांनी प्रास्ताविकातनू विद्यार्थ्यांना कवितेचे महत्व पटवून दिले. शिवाय त्यांनी व्यासपीठावर उपस्थित पाहुण्यांना परिचय करून दिला. कार्यक्रमाचे संचालन गौरव तामगाडगे यांनी केले तर आभार प्रा. उमा खनाडे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.‘खुळा जीव माझा तुला साद घाली’ ला मिळाला भरभरून प्रतिसादखुळा जीव माझा तुला साद घाली, उभा कृष्ण मेघांचा नेत्र भार झेली. तुला पाठमोरी किती वेळ पाहू, नको आज वेडे अशी दूर राहू, या सरस कवितेला उपस्थित विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी टाळ्यांची साथ देऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी कवीने एकापेक्षा एक सरस कविता सादर करून उपस्थितांचे मने जिंकली.