शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरदारांनो, लक्ष द्या! आजपासून पहिली मेट्रो दीड तास उशिराने! मेट्रो २ अ, ७ मार्गिकेसाठी ७ दिवसांचे तात्पुरते वेळापत्रक
2
भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
3
मोठी दुर्घटना! टेकऑफनंतर गोल गोल फिरलं, झाडावर आदळलं; हेलिकॉप्टर क्रॅशचा भयंकर Video
4
मृण्मयी देशपांडेची 'मनाचे श्लोक' चित्रपटाबद्दल मोठी घोषणा; पोस्ट शेअर करत म्हणाली-"अतिशय दु:खद..."
5
भारीच! "सणाच्या दिवशी काम नाही, फक्त आराम करा", 'या' कंपनीने दिवाळीला दिली ९ दिवस सुटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
7
अमेरिका पुन्हा एकदा हादरली! मिसिसिपीमध्ये गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी
8
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
9
चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता
10
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
11
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
12
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
13
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
14
टाटा सन्सचे आयपीओ जारी व्हावे, टाटा ट्रस्टमधील काही विश्वस्तांचे मत; शापुरजी पालनजींकडून लिस्टिंगची पुन्हा मागणी 
15
‘डिजिटल सोने’ घेत नव्या युगात पाऊल टाका 
16
भारताने जगाला स्वतःची कहाणी प्रभावीपणे सांगावी, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे आवाहन
17
सोनाली सेन गुप्ता आरबीआय कार्यकारी संचालकपदी 
18
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
19
मुंबईकरांचे कुटुंबकबिल्यासह सुट्टीच्या दिवशी मेट्रो पर्यटन, तिसऱ्या दिवशीही तुडुंब गर्दी, मुले उत्साही, मोठ्यांना अप्रूप
20
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली

महाबीजच्या नावावर बाजारात लूट

By admin | Updated: June 10, 2016 02:04 IST

खरीप हंगाम तोंडावर आला आहे. जिल्ह्यात पावसाचे आगमणही झाले आहे. यामुळे बळीराजा बियाण्यांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहे.

बळीराजावर आघात : सोयाबीन ४०० तर तुरीच्या बियाण्यांकरिता २०० रुपयांची जादा मागणी वर्धा : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. जिल्ह्यात पावसाचे आगमणही झाले आहे. यामुळे बळीराजा बियाण्यांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहे. यात शेतकरी महाबिजच्या बियाण्यांची मागणी करण्याकरिता गेले असता बाजारात त्यांना जादा पैशाची मागणी करण्यात येत असल्याची ओरड आहे. महाबीजच्यावतीने बियाण्यांची दरवाढ केल्याचे त्यांना सांगितले जात आहे. मात्र महाबिजकडून कुठलीही दरवाढ झाली नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. शेतकरी हंगामाच्या तयारीत असताना जिल्ह्यात त्याची लूट होत असल्याचे दिसून आले आहे.महाबीज कंपनीच्या बियाण्यांच्या नावावर होत असलेल्या लुटीचे बळी जिल्ह्यातील शेतकरी ठरत आहेत. यामुळे या प्रकरणाची चौकशी महाबिजच्यावतीने किंवा कृषी विभागाच्यावतीने करून जिल्ह्यातील अशा व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आहे. दुष्काळाच्या छायेत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची होत असलेली परवड थांबविण्याकरिता शासनाने प्रयत्न करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्यात यंदाच्या खरीपात सुमारे ४ लाख हेक्टरवर पेऱ्याचे नियोजन केले आहे. यात सोयाबीन व तुरीचा पेरा वाढणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यांचे नियोजन आजच्या स्थितीत जिल्ह्यात खरे ठरत आहे. बाजारात शेतकरी सोयाबीन व तुरीचे बियाणे खरेदी करण्याकरिता जात आहेत. त्यांच्याकडून कृषी केंद्र संचालकाला महाबिजचे सोयाबीन किंवा तुरीची मागणी करण्यात आल्यास त्यांना महाबिजने बियाण्यांचे दर वाढविल्याचे सांगण्यात येते. त्यांच्याकडून सोयाबीनच्या विविध वाणाच्या एका ३० किलो बॅगच्या मागे सरासरी ४०० रुपये जादा घेण्यात येत आहे. तर तुरीच्या दोन किलोच्या बॅगच्यामागे सरासरी २०० रुपये जादा घेण्यात येत असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे. ही वाढ केवळ तूर व सोयाबीनच्या बियाण्यांवरच नाही तर मुंग उडद व इतर बियाण्यांवर असल्याचीही ओरड आहे. ऐन हंगामाच्या तोंडावर झालेली बियाण्यांची दरवाढ व त्यात मदत म्हणून वाढलेले खतांचे दर यामुळे बळीराजा अडचणीत आला आहे. याचा विचार शासनाने करून यावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)अनेक कृषी केंद्रसंचालकांकडे महाबिजच्या बियाण्यांचा जुना स्टॉक आहे. मात्र त्यांच्याकडून तो विकण्याकरिता टाळाटाळ करण्यात येत आहे. महाबिजच्या बियाण्यांची मागणी वाढल्यास त्याचा काळा बाजार करण्याची त्याची तयारी असावी अशी चर्चा बाजारात आहे. महाबिजचे बियाणे महागल्याचे सांगत अनेकांकडून दुसऱ्या कंपनीचे बियाणे विकण्याचा सपाटा सुरू झाला आहे. यात अव्वाच्या सव्वा दर लावून ऐन हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. याकडे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देत कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. महाबीजच्यावतीने बियाण्यांची कोणतीही दरवाढ करण्यात आली नाही. शेतकऱ्यांना देण्यात येणारे बियाणे अनुदानावरील आहे. शिवाय जिल्ह्यात मागणीनुसार पुरवठा झाला आहे. यात कोणी काळाबाजार करीत असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल. - एन.पी. खांडेकर, जिल्हा व्यवस्थापक, महाबिज