शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
2
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
3
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
4
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
5
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
6
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
7
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
8
HI हर्षा, माझ्याशी लग्न करशील?; असलमच्या प्रपोजलला कुंभमधील व्हायरल गर्लचं बेधडक उत्तर
9
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
10
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
11
आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'चं पहिलं पोस्टर आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा
12
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
13
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
14
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
15
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
16
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
17
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
18
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
19
घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!
20
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल

महाबीजच्या नावावर बाजारात लूट

By admin | Updated: June 10, 2016 02:04 IST

खरीप हंगाम तोंडावर आला आहे. जिल्ह्यात पावसाचे आगमणही झाले आहे. यामुळे बळीराजा बियाण्यांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहे.

बळीराजावर आघात : सोयाबीन ४०० तर तुरीच्या बियाण्यांकरिता २०० रुपयांची जादा मागणी वर्धा : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. जिल्ह्यात पावसाचे आगमणही झाले आहे. यामुळे बळीराजा बियाण्यांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहे. यात शेतकरी महाबिजच्या बियाण्यांची मागणी करण्याकरिता गेले असता बाजारात त्यांना जादा पैशाची मागणी करण्यात येत असल्याची ओरड आहे. महाबीजच्यावतीने बियाण्यांची दरवाढ केल्याचे त्यांना सांगितले जात आहे. मात्र महाबिजकडून कुठलीही दरवाढ झाली नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. शेतकरी हंगामाच्या तयारीत असताना जिल्ह्यात त्याची लूट होत असल्याचे दिसून आले आहे.महाबीज कंपनीच्या बियाण्यांच्या नावावर होत असलेल्या लुटीचे बळी जिल्ह्यातील शेतकरी ठरत आहेत. यामुळे या प्रकरणाची चौकशी महाबिजच्यावतीने किंवा कृषी विभागाच्यावतीने करून जिल्ह्यातील अशा व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आहे. दुष्काळाच्या छायेत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची होत असलेली परवड थांबविण्याकरिता शासनाने प्रयत्न करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्यात यंदाच्या खरीपात सुमारे ४ लाख हेक्टरवर पेऱ्याचे नियोजन केले आहे. यात सोयाबीन व तुरीचा पेरा वाढणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यांचे नियोजन आजच्या स्थितीत जिल्ह्यात खरे ठरत आहे. बाजारात शेतकरी सोयाबीन व तुरीचे बियाणे खरेदी करण्याकरिता जात आहेत. त्यांच्याकडून कृषी केंद्र संचालकाला महाबिजचे सोयाबीन किंवा तुरीची मागणी करण्यात आल्यास त्यांना महाबिजने बियाण्यांचे दर वाढविल्याचे सांगण्यात येते. त्यांच्याकडून सोयाबीनच्या विविध वाणाच्या एका ३० किलो बॅगच्या मागे सरासरी ४०० रुपये जादा घेण्यात येत आहे. तर तुरीच्या दोन किलोच्या बॅगच्यामागे सरासरी २०० रुपये जादा घेण्यात येत असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे. ही वाढ केवळ तूर व सोयाबीनच्या बियाण्यांवरच नाही तर मुंग उडद व इतर बियाण्यांवर असल्याचीही ओरड आहे. ऐन हंगामाच्या तोंडावर झालेली बियाण्यांची दरवाढ व त्यात मदत म्हणून वाढलेले खतांचे दर यामुळे बळीराजा अडचणीत आला आहे. याचा विचार शासनाने करून यावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)अनेक कृषी केंद्रसंचालकांकडे महाबिजच्या बियाण्यांचा जुना स्टॉक आहे. मात्र त्यांच्याकडून तो विकण्याकरिता टाळाटाळ करण्यात येत आहे. महाबिजच्या बियाण्यांची मागणी वाढल्यास त्याचा काळा बाजार करण्याची त्याची तयारी असावी अशी चर्चा बाजारात आहे. महाबिजचे बियाणे महागल्याचे सांगत अनेकांकडून दुसऱ्या कंपनीचे बियाणे विकण्याचा सपाटा सुरू झाला आहे. यात अव्वाच्या सव्वा दर लावून ऐन हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. याकडे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देत कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. महाबीजच्यावतीने बियाण्यांची कोणतीही दरवाढ करण्यात आली नाही. शेतकऱ्यांना देण्यात येणारे बियाणे अनुदानावरील आहे. शिवाय जिल्ह्यात मागणीनुसार पुरवठा झाला आहे. यात कोणी काळाबाजार करीत असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल. - एन.पी. खांडेकर, जिल्हा व्यवस्थापक, महाबिज