शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

आगरगावात रखडले आठ महिन्यांपासून रस्त्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

भूजमपूजनानंतर रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. आठ महिन्यांच्या कालावधीत ठेकेदाराने पंचवीस टक्केही रस्त्याचे काम केले नाही. केवळ मुरुम आणि चुरी अंथरण्याचे काम झाले असून तेही अर्धवट अवस्थेत आहे. कंत्राटदाराचा मनमर्जी कारभार सुरू आहे. असे असताना जि. प. बांधकाम विभागाचे अधिकारीही मौन बाळगून आहेत. अडचणी सहन कराव्या लागत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देजि. प. बांधकाम विभागाची अनागोंदी : ग्रामस्थ त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कआगरगाव : येथे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत १० लाख रुपयांच्या रस्ता बांधकामाचे फेब्रुवारीमध्ये भूमिपूजन झाले. आठ महिन्याचा कालावधी लोटूनही अद्याप या रस्त्याचे काम पंचवीस टक्केही पूर्ण झालेले नाही. यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे कंत्राटदारासह जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.भूजमपूजनानंतर रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. आठ महिन्यांच्या कालावधीत ठेकेदाराने पंचवीस टक्केही रस्त्याचे काम केले नाही. केवळ मुरुम आणि चुरी अंथरण्याचे काम झाले असून तेही अर्धवट अवस्थेत आहे. कंत्राटदाराचा मनमर्जी कारभार सुरू आहे. असे असताना जि. प. बांधकाम विभागाचे अधिकारीही मौन बाळगून आहेत. अडचणी सहन कराव्या लागत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.आगरगाव बस थांबा ते बाजार चौक या डांबरीकरण रस्त्याचे काम गेल्या आठ महिन्यांपासून बंद आहे. परिणामी, ग्रामस्थांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्ता बांधकामाचा दर्जा सुमार असल्याचीही ओरड होत आहे. रस्त्यावर केवळ मुरूम आणि चुरी अंथरल्यामुळे वाहने घसरून दररोज अपघात होत आहेत. मात्र, कंत्राटदार आणि बांधकाम विभागाला सोयरसुतक नाही.पावसामुळे रस्त्यांची लागली वाटआष्टी (शहीद) : अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे. तळेगाव- आष्टी- साहूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. यामुळे अपघात होत आहेत. हीच परिस्थिती इतरही रस्त्यांची झाली आहे. तळेगाववरून आष्टीला येण्यासाठी हाच मुख्य मार्ग आहे. या मार्गावर मुरूम टाकण्यात आला. २५ टक्के सिमेंट काँक्रिटचे काम झाले आहे. मात्र, कामाची गती मंद आहे. आष्टी-मोर्शी, आष्टी-थार, पार्डी, टेकोडा, गोदावरी, देलवाडी, अंबिकापूर या रस्त्यांचीही वाईट अवस्था झाली आहे. गावातील अंतर्गत रस्तेही दुर्दशित आहेत. शासनाच्या सोयीसुविधा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी रस्त्यांची समस्या मार्गी लावणे गरजेचे आहे. तालुक्यात आष्टी-किन्हाळा, गोदावरी या रस्त्याने जाताना नरकयातना सहन कराव्या लागत आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कामे मंजूर झाली; अद्याप सुरू झाली नाही. परिणामी नागरिकांना माती तुडवत ४ कि़मी. जावे लागत आहे. खडकी खंबीत-बेलोरा या रस्त्यासाठी वर्षभरापासून निधी आला आहे. मात्र, कंत्राटदार कामच करीत नसल्याने नागरिकांत रोष आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा