शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

रस्त्यालगतची लाकडे ठरताहेत जीवघेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:49 IST

वर्धा-वायगाव-हिंगणघाट रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. बांधकामात ही झाडे अडसर ठरत असल्याने महिनाभरापूर्वी कत्तल करण्यात आली. ही तोडलेली झाडे वाहनचालक, पादचाऱ्यांकरिता जीवघेणी ठरताना दिसून येत आहे.

ठळक मुद्देवर्धा-वायगाव, हिंगणघाट मार्ग : अपघातांची मालिका सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (निपाणी) : वर्धा-वायगाव-हिंगणघाट रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. बांधकामात ही झाडे अडसर ठरत असल्याने महिनाभरापूर्वी कत्तल करण्यात आली. ही तोडलेली झाडे वाहनचालक, पादचाऱ्यांकरिता जीवघेणी ठरताना दिसून येत आहे. मोठमोठी झाडे व त्यांच्या फांद्या रस्त्यावर आल्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांमुळे परिसरातील शेतकºयांनासुद्धा आपल्या शेतात जाण्या येण्यास अडचण निर्माण झाली आहे. मागील कित्येक दिवसांपासून ही तोडलेली झाडे जशीच्या तशीच रस्त्याच्या कडेला पडून आहेत. ती तातडीने उचलून विल्हेवाट लावावी, अशी मागणी सेलू काटे येथील शेतकºयांसह प्रवाशांनी केली आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास शेतातून येत असलेली बैलबंडी उलटली. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही. रस्त्याच्या कडेला झाडांची खोडं आहे. ही खोडं त्या खड्ड्यांतून काढली, मात्र ते खड्डे जैसे थे ठेवले आहे. या खड्ड्यांमध्ये जनावरे आणि शेतकऱ्यांना अपघात होण्याचीही शक्यता बळावली आहे. याकडे संबंधित विभागाने व कंत्राटदाराने लक्ष देत तोडलेल्या झाडांची विल्हेवाट लावावी, अशी मागणी सेलू काटे येथील शेतकऱ्यांनी केली आहे.सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना नाहीतवर्धा-हिंगणघाट रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम सुरू असून या कामाला गेल्या महिनाभरापासून प्रारंभ झाला आहे. या कामाकरिता रस्त्याची एक बाजू खोदून ठेवली आहे. काही ठिकाणी रिफ्लेक्टर लावले आहे तर काही ठिकाणीचे रिफ्लेक्टर बेपत्ता असल्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. या रिफ्लेक्टरमुळे रात्रीच्या सुमारास चालकाला अंदाज येतो, मात्र, ज्या ठिकाणी रिफ्लेक्टर नाही, त्या ठिकाणी चालकाला काहीच कळत नाही. यामुळे अपघात होऊ शकतो.पुलावरील खड्ड्याने घेतला बळीवर्धा-हिंगणघाट रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम सुरू आहे. रस्ता रूंदीकरणासाठी पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. एका कडेने काम सुरू असल्याने दुसरी बाजू वाहनांकरिता सुरू आहे. ३१ डिसेंबर रोजी सेलूकाटे येथील एका युवकाला याच खड्ड्यामुळे आपली जीव गमवावा लागला. पुन्हा असा अपघात होऊ नये, याची दक्षता घेणे गरजेचे झाले आहे.बांधकाम विभाग, कंत्राटदार कुंभकर्णी झोपेतवर्धा-हिंगणघाट मार्गाच्या रूंदीकरणाच्या काम सुरू आहे. या कामामुळे दररोज किरकोळ व मोठे मोठे अपघात होत आहेत. असे असताना याकडे दुर्लक्ष आहे. बांधकाम विभाग, कंत्राटदार कुंभकर्णी झोपेत असल्याचा आरोप सेलूकाटे येथील शेतकºयांनी केला आहे. एखादी मोठी घटना घडल्यानंतरच या विभागाला जाग येईल, असे ते बोलत आहेत.