शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

पावसाने लावली रस्त्यांची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 23:55 IST

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उन्हाळ्यात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना खड्डेमुक्त महाराष्ट्र करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या कामावर मोठ्या प्रमाणावर निधी जिल्ह्यांना मंजूर झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेक मार्गावरचे खड्डे बुजविण्याचे काम केले.

ठळक मुद्देशहरी व ग्रामीण भागात खड्डेच खड्डे : बांधकाम विभागाचा खड्डेमुक्त महाराष्ट्र कार्यक्रम फेल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उन्हाळ्यात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना खड्डेमुक्त महाराष्ट्र करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या कामावर मोठ्या प्रमाणावर निधी जिल्ह्यांना मंजूर झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेक मार्गावरचे खड्डे बुजविण्याचे काम केले. आता मात्र पहिल्याच पावसात ग्रामीण भागात व शहरी भागात रस्त्यांना मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. या खड्ड्यांतून नागरिकांना वाट काढणे कठीण झाले आहे. वर्धा शहरालगतच्या यवतमाळ मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे रस्त्यावर पडले आहेत. या मार्गावरून जड वाहनांची वाहतूक होत आहे. तसेच अनेक दुचाकीस्वारांना अपघातही झालेले आहेत. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. सेवाग्राम ते खरांगणा गोडे या मार्गावरही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहन चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच व्हीआयपी रोडपासून म्हसाळा वरूड कडे जाणाऱ्यावर रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. या मार्गावरून दररोज शाळकरी मुलांना घेऊन जाणारे शेकडो वाहने जातात. मध्यंतरी अग्रगामी शाळेच्या पालकांनी या खड्ड्यांबाबत स्थानिक आमदारांकडे तक्रार केली होती. त्यानंतर म्हसाळा ते वरूड या रस्त्यासाठी निधी मंजूर झाल्याचे फलक लावण्यात आले अजूनही या रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. भर पावसाळ्यात अ‍ॅटो चालकांना कसरत करावी लागत आहे. पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांत चिखल पाणी जमा होते व अनेकदा नागरिकांच्या अंगावरही ते पाणी उडते. पावसाळ्याच्या दिवसात रस्त्याची अतिशय दशनिय अवस्था झाली आहे.पांदण रस्त्यांचेही हालजिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून जिल्ह्यात अनेक पांदन रस्त्यांचा विकास करण्यात आला. मात्र पावसाळ्याच्या दिवसात या पांदन रस्त्यांमध्ये चिखल निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना शेतीसाहित्य शेतात नेताना पायी न्यावे लागत आहे. पादंन रस्त्यातून बैलबंडी जाणे कठीण झाले आहे. शासनाने पांदन रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सेलू तालुक्यातील जाखाळा शिवारात शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच वर्धा शहरातही विकास कामे मोठ्या प्रमाणावर झालीत. तरीही अनेक रस्त्यांवर खड्डे कायम आहेत. या रस्त्यांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :Rainपाऊसpwdसार्वजनिक बांधकाम विभाग