शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

पावसाने लावली रस्त्यांची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 23:55 IST

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उन्हाळ्यात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना खड्डेमुक्त महाराष्ट्र करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या कामावर मोठ्या प्रमाणावर निधी जिल्ह्यांना मंजूर झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेक मार्गावरचे खड्डे बुजविण्याचे काम केले.

ठळक मुद्देशहरी व ग्रामीण भागात खड्डेच खड्डे : बांधकाम विभागाचा खड्डेमुक्त महाराष्ट्र कार्यक्रम फेल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उन्हाळ्यात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना खड्डेमुक्त महाराष्ट्र करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या कामावर मोठ्या प्रमाणावर निधी जिल्ह्यांना मंजूर झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेक मार्गावरचे खड्डे बुजविण्याचे काम केले. आता मात्र पहिल्याच पावसात ग्रामीण भागात व शहरी भागात रस्त्यांना मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. या खड्ड्यांतून नागरिकांना वाट काढणे कठीण झाले आहे. वर्धा शहरालगतच्या यवतमाळ मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे रस्त्यावर पडले आहेत. या मार्गावरून जड वाहनांची वाहतूक होत आहे. तसेच अनेक दुचाकीस्वारांना अपघातही झालेले आहेत. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. सेवाग्राम ते खरांगणा गोडे या मार्गावरही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहन चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच व्हीआयपी रोडपासून म्हसाळा वरूड कडे जाणाऱ्यावर रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. या मार्गावरून दररोज शाळकरी मुलांना घेऊन जाणारे शेकडो वाहने जातात. मध्यंतरी अग्रगामी शाळेच्या पालकांनी या खड्ड्यांबाबत स्थानिक आमदारांकडे तक्रार केली होती. त्यानंतर म्हसाळा ते वरूड या रस्त्यासाठी निधी मंजूर झाल्याचे फलक लावण्यात आले अजूनही या रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. भर पावसाळ्यात अ‍ॅटो चालकांना कसरत करावी लागत आहे. पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांत चिखल पाणी जमा होते व अनेकदा नागरिकांच्या अंगावरही ते पाणी उडते. पावसाळ्याच्या दिवसात रस्त्याची अतिशय दशनिय अवस्था झाली आहे.पांदण रस्त्यांचेही हालजिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून जिल्ह्यात अनेक पांदन रस्त्यांचा विकास करण्यात आला. मात्र पावसाळ्याच्या दिवसात या पांदन रस्त्यांमध्ये चिखल निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना शेतीसाहित्य शेतात नेताना पायी न्यावे लागत आहे. पादंन रस्त्यातून बैलबंडी जाणे कठीण झाले आहे. शासनाने पांदन रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सेलू तालुक्यातील जाखाळा शिवारात शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच वर्धा शहरातही विकास कामे मोठ्या प्रमाणावर झालीत. तरीही अनेक रस्त्यांवर खड्डे कायम आहेत. या रस्त्यांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :Rainपाऊसpwdसार्वजनिक बांधकाम विभाग