शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

मदन उन्नई धरणावरील पथदिवे बंदच

By admin | Updated: July 9, 2017 00:44 IST

मोठा गाजावाजा करीत मदन उन्नई धरणाच्या भिंतीवर पथदिवे लावण्यात आले. परंतु, नंतर त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल्याने सध्या हे पथदिवे बंद आहेत.

दुरूस्तीकडे दुर्लक्ष : परिसरात असतो काळोख लोकमत न्यूज नेटवर्क आकोली : मोठा गाजावाजा करीत मदन उन्नई धरणाच्या भिंतीवर पथदिवे लावण्यात आले. परंतु, नंतर त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल्याने सध्या हे पथदिवे बंद आहेत. परिणामी, या धरणावर काळोख असतो. संभाव्य धोका लक्षात घेता बंद पथदिव्यांच्या दुरूस्तीची मागणी आहे. आकोली-आंजी (मोठी) मार्गावरील मदन उन्नई धरणाच्या भिंतीवर पथदिवे बसविण्यात आल्याने रात्रीला धरणाचे सौदर्य खुलून दिसायचे. रस्त्याने ये-जा करणारा रात्री दोन मिनीट थांबून ते दृष्य न्याहारीत. पण, ते नेत्र सुख अल्पावधीचे ठरले. काही तांत्रिक बिघाडामुळे हे पथदिवे बंद पडले. परंतु, बंद पथदिवे सुरू करण्याची तसदी घेतली जात नाही. त्याकडे संबंधी विभागाचे कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याची परिसरात ओरड आहे. धरण परिसराची शोभा वाढावी, धरण क्षेत्रातून होणारी मुरूम, मातीची चोरी व अवैध मासेमारी थांबावी या हेतूने पाटबंधारे विभागाने धरणाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पथदिवे बसविले होते. त्यामुळे अवैध चोरी व अवैध कृत्यांना आळा बसला होता. मात्र, रात्रीला येथे काळोख राहत असल्याने गैर कृत्यांना उत आले आहे. या गलथान कारभाराचा परिसरातील शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे शेतकरी विलास डंभारे सांगतात. संभाव्य धोका लक्षात घेता तात्काळ बंद पथदिवे दुरूस्तीची मागणी आहे.