शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

बोथली-पांजरा रस्ता मरणाला झाला सस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:21 IST

नजीकच्या बोथली-पांजरा या रस्त्याचे मागील कित्येक वर्षापासून खस्ताहाल आहे. दुरुस्तीकडे कुणाचेही लक्ष गेले नसल्याने जंगलव्याप्त भागातील दगडांच्या या रस्त्यावर वहिवाट करावी लागत असल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.

ठळक मुद्देजीवघेणा प्रवास : जंगलव्याप्त परिसर असल्याने धोका

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : नजीकच्या बोथली-पांजरा या रस्त्याचे मागील कित्येक वर्षापासून खस्ताहाल आहे. दुरुस्तीकडे कुणाचेही लक्ष गेले नसल्याने जंगलव्याप्त भागातील दगडांच्या या रस्त्यावर वहिवाट करावी लागत असल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे हा उखडलेला रस्ता मरणासाठी सस्ता झाल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त होत आहे.बोथली-पांजरा हा दोन किलो मीटर अंतरचा रस्ता जंगलव्याप्त व चढणी-उतरणीचा आहे. मागील अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने या रस्त्याची पुर्णत: वाट लागली आहे. जंगलव्याप्त परिसरातील या रस्त्याच्या दोन्ही बाजूने खोल दऱ्या आहे. तसेच दुर्लक्षामुळे या रस्त्यावरची दगड उघडी पडली आहे. त्यामुळे या रस्त्यावर दगडच दिसून येते. हा रस्ता चढणी उतरणीचा असल्याने यावरून वाहन चालविणे जोखमीचे झाले आहे. या दगडी रस्त्यामुळे अपघाताच्या प्रमाणातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. या परिसरातील अनेक रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली.पण, या मार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरीक करीत आहे. या रस्त्याने पांजरा, बोथली येथील शेतकरी- शेतमजूर व शाळकरी विद्यार्थी ये-जा करतात. रस्ता दुरुस्तीसाठी पंचायत समिती सदस्या माया नायसे यांनी प्रयत्न चालविले आहे. पण, त्यांच्या प्रयत्नाला कोणती राजकीय परिस्थिती आडवी येते, हे कळायला मार्ग नाही. या मार्गावरुन अवागमण करणाºयांनी वारंवार रस्त्याच्या दुुरुस्तीची मागणी केली. पण, या मागणीकडे लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केल्याने परिणामी संबंधित विभागानेही पाठ फिरविली आहे. त्यामुळे नागरिकांना या दगडमय रस्त्यावरुनच प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याने पायदळ चालनेच कठीण झाले आहे. पायदळ चालताना दगडावरुन कधी पाय वाकडा पडेल याचा नेम नाही. वाहनचालकाला तर या दगडावरुन सुरक्षीत वाहन काढताना कसरत करावी लागत आहे. यातच वाहने घसरुन अपघातही होत आहे.त्यामुळे वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.रोज मरे त्याला कोण रडे!बोथली-पांजरा हा रस्ता आर्वी तालुक्यात येत असून आर्वीला काँग्रेसचे आमदार अमर काळे व भाजपाचे माजी आमदार दादाराव केचे हे दोन्ही लोकप्रतिनिधी विकासाच्या दृष्टीकोणातून सक्षम असल्याचे बोलेले जाते. असे असतानाही या मार्गाची ही दुरावस्था का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केल्या जात आहे. त्यांच्या या मतदार संघातील रस्त्यापेक्षा जिल्ह्यात दुसरा खराब रस्ताच नसल्याची ओरडही नागरीक करीत आहे. या रस्त्यामुळे वाहन चालकांच्या वाहनाचे आणि शरिराचेही नुकसान होत आहे. वाहनचालकांना पाठीचा व मानक्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वारंवार तक्रार करुनही लक्ष दिले जात नसल्याने ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी अवस्था येथील नागरिकांची करुन ठेवली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा