शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

रस्ता खोदकामात नळजोडणीची नासधूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 22:06 IST

आर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाकापर्यंतच्या एकेरी रस्त्याचे सिमेंटीकरण सुरू आहे. याकरिता केल्या जात असलेल्या खोदकामामुळे नळजोडणीचे पाइप तोडले जात असून पाणीटंचाईच्या काळात दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईच्या काळात हजारो लिटर पाण्याचा अपव्यय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाकापर्यंतच्या एकेरी रस्त्याचे सिमेंटीकरण सुरू आहे. याकरिता केल्या जात असलेल्या खोदकामामुळे नळजोडणीचे पाइप तोडले जात असून पाणीटंचाईच्या काळात दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. सोबतच या बाजूने टेलिफोन लाईन, केबल लाईनसुद्धा आहे. असे असताना सर्व्हिसिंगकरिता जागा सोडण्यात आलेली नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी अत्याचार निर्मूलन समितीने नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाका जुना पाणी रस्ता बांधकामाकरिता तब्बल ३५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. आर्वी नाका ते जुना पाणी चौकापर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम अडथळ्यांची शर्यत पूर्ण करीत पूर्णत्वास गेले आहे. शिवाजी चौक ते आर्वी नाका चौकापर्यंत भुयारी गटार योजनेचे काम करण्यात आले. आता एकेरी रस्त्याच्या सिमेंटीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, कामात नियोजनाचा प्रचंड अभाव आहे.खोदकाम करताना नळजोडणीची नासधूस केली जात आहे. याशिवाय भविष्यात टेलिफोन व केबल लाइनच्या दुरुस्तीच्या दृष्टीने जागा सोडण्यात आलेली नसून काम सुरू आहे. यामुळे कालांतराने परत रस्ता फोडण्याची नामुष्की ओढवू शकते. जिल्ह्यात यंदा अत्यल्प पर्जन्यमानामुळे पाणीटंचाईसदृश परिस्थिती आहे. यातच शहरात विविध भागांत बांधकामाचा सपाटा सुरू आहे. खोदकामादरम्यान नळजोडणी तोडली जात असल्याने पाणीटंचाईच्या काळात हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. मात्र याचा कुठेही विचार केला जात नसल्याचे दिसून येते. टेलिफोन लाईन, केबल लाइन दुरुस्तीकरिता जागा सोडण्यासोबतच पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या अनुषंगाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अत्याचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष सुधीर दंदे यांच्यासह नागरिकांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.कामाचा दर्जाही सुमारशहरात अनेक ठिकाणी रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले. मात्र, वर्षा लोटत नाही तोच अनेक रस्त्यांना शेकडो भेगा गेल्या आहेत. आर्वी नाका ते बॅचलर रोड, आर्वी नाका ते जुना पाणी चौकापर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा गेल्या आहेत. अल्पावधीतच रस्त्यांची डागडुजीही करावी लागली. त्यामुळे बांधकामे करताना ती दर्जेदारच करावी, अशी मागणीही नागरिकांतून होत आहे.पाणीटंचाई लक्षात घेता बांधकामे थांबवावीअल्प पर्जन्यमानामुळे यंदा जिल्ह्यातील मध्यम आणि लघु जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा नाही. याचाच परिणाम म्हणून शहरात सहा ते सात दिवसांनंतर तर लगतच्या ग्रामीण भागांत पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. कुठे ना कुठे दररोज २०० ते २५० फूट बोअरवेल केल्या जात असतानाही पाणी लागेनासे झाले आहे. एप्रिल महिन्यातच ही परिस्थिती आहे. असे असताना नियोजनाच्या अभावात विकासकामांचा सपाटा सुरू आहे. पिण्यासही पाणी मिळेनासे झाले असताना बांधकामांवर पाण्याची उधळपट्टी केली जात आहे. बांधकामे थांबविण्यात यावी, अशीही मागणी वर्धेकर नागरिकांतून होत आहे.एलईडी दिव्याचा खांब कोसळलाकामाचा दर्जा राखला जात नसल्याने अल्पावधीतच पितळ उघडे पडत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत एलईडी दिवे लावण्यात आले. यातील एक खांब वाºयाच्या झोताने कोसळला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. यावेळी कामाच्या दर्जाविषयी नागरिकांनी मात्र प्रश्न उपस्थित केला.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई