शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

रस्ता खोदकामात नळजोडणीची नासधूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 22:06 IST

आर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाकापर्यंतच्या एकेरी रस्त्याचे सिमेंटीकरण सुरू आहे. याकरिता केल्या जात असलेल्या खोदकामामुळे नळजोडणीचे पाइप तोडले जात असून पाणीटंचाईच्या काळात दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईच्या काळात हजारो लिटर पाण्याचा अपव्यय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाकापर्यंतच्या एकेरी रस्त्याचे सिमेंटीकरण सुरू आहे. याकरिता केल्या जात असलेल्या खोदकामामुळे नळजोडणीचे पाइप तोडले जात असून पाणीटंचाईच्या काळात दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. सोबतच या बाजूने टेलिफोन लाईन, केबल लाईनसुद्धा आहे. असे असताना सर्व्हिसिंगकरिता जागा सोडण्यात आलेली नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी अत्याचार निर्मूलन समितीने नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाका जुना पाणी रस्ता बांधकामाकरिता तब्बल ३५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. आर्वी नाका ते जुना पाणी चौकापर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम अडथळ्यांची शर्यत पूर्ण करीत पूर्णत्वास गेले आहे. शिवाजी चौक ते आर्वी नाका चौकापर्यंत भुयारी गटार योजनेचे काम करण्यात आले. आता एकेरी रस्त्याच्या सिमेंटीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, कामात नियोजनाचा प्रचंड अभाव आहे.खोदकाम करताना नळजोडणीची नासधूस केली जात आहे. याशिवाय भविष्यात टेलिफोन व केबल लाइनच्या दुरुस्तीच्या दृष्टीने जागा सोडण्यात आलेली नसून काम सुरू आहे. यामुळे कालांतराने परत रस्ता फोडण्याची नामुष्की ओढवू शकते. जिल्ह्यात यंदा अत्यल्प पर्जन्यमानामुळे पाणीटंचाईसदृश परिस्थिती आहे. यातच शहरात विविध भागांत बांधकामाचा सपाटा सुरू आहे. खोदकामादरम्यान नळजोडणी तोडली जात असल्याने पाणीटंचाईच्या काळात हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. मात्र याचा कुठेही विचार केला जात नसल्याचे दिसून येते. टेलिफोन लाईन, केबल लाइन दुरुस्तीकरिता जागा सोडण्यासोबतच पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या अनुषंगाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अत्याचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष सुधीर दंदे यांच्यासह नागरिकांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.कामाचा दर्जाही सुमारशहरात अनेक ठिकाणी रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले. मात्र, वर्षा लोटत नाही तोच अनेक रस्त्यांना शेकडो भेगा गेल्या आहेत. आर्वी नाका ते बॅचलर रोड, आर्वी नाका ते जुना पाणी चौकापर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा गेल्या आहेत. अल्पावधीतच रस्त्यांची डागडुजीही करावी लागली. त्यामुळे बांधकामे करताना ती दर्जेदारच करावी, अशी मागणीही नागरिकांतून होत आहे.पाणीटंचाई लक्षात घेता बांधकामे थांबवावीअल्प पर्जन्यमानामुळे यंदा जिल्ह्यातील मध्यम आणि लघु जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा नाही. याचाच परिणाम म्हणून शहरात सहा ते सात दिवसांनंतर तर लगतच्या ग्रामीण भागांत पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. कुठे ना कुठे दररोज २०० ते २५० फूट बोअरवेल केल्या जात असतानाही पाणी लागेनासे झाले आहे. एप्रिल महिन्यातच ही परिस्थिती आहे. असे असताना नियोजनाच्या अभावात विकासकामांचा सपाटा सुरू आहे. पिण्यासही पाणी मिळेनासे झाले असताना बांधकामांवर पाण्याची उधळपट्टी केली जात आहे. बांधकामे थांबविण्यात यावी, अशीही मागणी वर्धेकर नागरिकांतून होत आहे.एलईडी दिव्याचा खांब कोसळलाकामाचा दर्जा राखला जात नसल्याने अल्पावधीतच पितळ उघडे पडत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत एलईडी दिवे लावण्यात आले. यातील एक खांब वाºयाच्या झोताने कोसळला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. यावेळी कामाच्या दर्जाविषयी नागरिकांनी मात्र प्रश्न उपस्थित केला.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई