शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

गांधी जिल्ह्यात रस्ता अपघाताने घेतले १८७ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 06:00 IST

दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर न करणे, वाहन चालविताना सिट बेल्टचा वापर न करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहनात बसवून वाहतूक करणे, सुसाट वाहन पळविणे, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे आदी गोष्टी रस्ता अपघाताला निमंत्रण देणारे ठरतात. त्यामुळे सदर बाबींकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून दंडात्मक कारवाई केली जाते.

ठळक मुद्दे१७६ गंभीर जखमी : मृतांमध्ये पुरुषांची संख्या जास्त

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सुरक्षित प्रवासासाठी वाहतूक नियमांचे पालन करा असे आवाहन सर्वच स्तरातून केले जात असले तरी जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत गांधी जिल्ह्यात झालेल्या ४८८ रस्ते अपघातांमध्ये १८७ व्यक्ती ठार झाल्याचे वास्तव आहे. इतकेच नव्हे तर १७६ व्यक्ती गंभीर जखमी झाले. दिवसेंदिवस वाढत असलेले अपघात लक्षात घेऊन यंदाच्या ३१ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहादरम्यान वाहतूक नियमांचे पालन कसे गरजेचे आहे याविषयी प्रभावी जनजागृती होण्याची गरज आहे.दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर न करणे, वाहन चालविताना सिट बेल्टचा वापर न करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहनात बसवून वाहतूक करणे, सुसाट वाहन पळविणे, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे आदी गोष्टी रस्ता अपघाताला निमंत्रण देणारे ठरतात. त्यामुळे सदर बाबींकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून दंडात्मक कारवाई केली जाते. वाहतूक नियमांकडे पाठ दाखविणाऱ्या अनेकांवर वर्षभऱ्यात दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे. परंतु, तरुण मंडळी वाहतूक नियमांना फाटाच देत असल्याचे चित्र बघावयास मिळते. परिणामी, तरुणांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. वर्षभºयात जिल्ह्यात एकूण ४८८ रस्ते अपघात झाले असून यात १८७ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. १७१ पुरूष तर १६ महिलांचा यात समावेश असल्याचे सांगण्यात आले.५७ अपघातात सुदैवाने दुखापत टळलीजिल्ह्यातील ९२ अपघातांमध्ये १७६ व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. तर ५७ अपघातांमध्ये सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही. असे असले तरी वाहनांचे नुकसान झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.पोलिसी कारवाईबाबत गैरसमज कायमअपघात झाल्याचे निदर्शनास आल्यावर काही व्यक्ती सामाजिक बांधिलकी जोपासत जखमींना मदत करतात. तर काही व्यक्ती तेथून पळ काढण्यातच धन्यता मानतात. अपघातातील जखमींना मदत केल्यास आपणही पोलिसांच्या कार्यवाहीत अडकू असा गैरसमज अजूनही कायम असल्याने तो कसा दूर करता येईल याविषयी रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून प्रभावी काम होणे गरजेचे आहे.एकाचाही गौरव नाहीअपघात झाल्याचे लक्षात येताच अनेक नागरिक घटनास्थळी गर्दी करतात. नागरिकांच्या या गर्दीतील काहीच व्यक्ती सामाजिक बांधिलकी जोपासत जखमींना रुग्णालयात दाखल करतात. परंतु, पोलीस विभाग असो वा उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून जखमीला रुग्णालयापर्यंत नेणाºया अशा एकाही व्यक्तीला आतापर्यंत गौरविण्यात आले नसल्याची शोकांतीका आहे.

टॅग्स :Accidentअपघात