शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

पावसाळ्याच्या तोंडावर नाल्या तुुंबलेल्याच

By admin | Updated: May 18, 2015 01:56 IST

पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील नाल्यांचा उपसा करून पाणी वाहून जाण्याकरिता त्या मोकळ्या करण्यात येतात.

प्रशांत हेलोंडे/ पराग मगर वर्धा पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील नाल्यांचा उपसा करून पाणी वाहून जाण्याकरिता त्या मोकळ्या करण्यात येतात. त्या साफ करण्याची जबाबदारी पालिकेची आहे. असे असताना त्यांच्याकडून या संदर्भात अद्याप कुठलीही कार्यवाही करण्यात आली नसल्याची माहिती आहे. नाल्या स्वच्छ करण्यासंदर्भात पालिकेत अद्याप कुठलीही सभा झाली नाही वा या विषयावर चर्चाही करण्यात आली नाही. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली आहे. वर्धा शहरातून तीन मोठे नाले वाहत आहेत. शहरातील छोट्या नालीतील पाणी या मोठ्या नाल्यात येते. यामुळे या नाल्यातील कचरा उपसण्याची गरज आहे. यंदा जून महिन्याच्या प्रारंभीलाच मान्सून धडकणार असल्याचे संकेत वेध शाळेने दिले आहे. त्या अनुशंगाने पालिकेच्यावतीने शहरातील नाल्यांची स्वच्छता करणे क्रमाप्राप्त ठरते; मात्र वर्धा पालिकेच्यावतीने या संदर्भात साधी चर्चा करण्याचीही तसदी घेतली नाही. शहराच्या मध्यभागातून वाहत असलेल्या या नाल्याच्या बाजूला एक नव्हे दोन शाळा आहे. सध्या या नाल्यांमध्ये झुडपे वाढली असून प्लास्टिकचाही खच पहावयास मिळतो. या नाल्यातील पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाल्यास ते शाळेत शिरण्याची शक्यता आहे. शिवाय याच नाल्याच्या शेजारी राणी दुर्गावतीनगर आहे. या नाल्यात पाणी अडल्यास ते परिसरातील घरांमध्ये शिरण्याची भीती वर्तविली जात आहे. यापूर्वी असा प्रकार शहरात घडला आहे. येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांना रात्र उघड्यावर काढण्याची वेळ यापूर्वी आली आहे. या व्यतिरिक्त शहरात असलेल्या छोट्या नाल्याही तेवढ्याच धोक्याच्या आहेत. नागरिकांच्या घरांपासून वाहत असलेल्या या नाल्यांची पालिकेच्यावतीने स्वच्छता करण्यात येत नसल्याने त्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. यामुळे नालीतील पाणी रस्त्यावर वाहत असल्याचे वास्तव आहे. या नाल्या तुंबल्या असल्याने रस्त्याने वाहत असलेले पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो. यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे. याचा त्रास रहदारीस होवून पर्यायी वाहतूक ठप्प होण्याची भीती आहे. यामुळे शहरातील नाल्यांचा उपसा पावसाळ्यापूर्वी होणे अत्यावश्यक आहे. असे असताना पालिकेच्यावतीने अद्यापपर्यंत कुठल्याही उपाययोजना आखण्यात आल्या नाही याचेच आश्चर्य. पालिकेत या विषयावर चर्चा करण्यासंदर्भात साध्या बैठकीचे आयोजनही करण्यात आले नसल्याची माहिती आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार पावसाचे दिवस जवळच आले आहे. यामुळे शहरातील नाल्यांचा उपसा करण्याची मागणी वर्धेकर करीत आहेत. नाल्यात औषधीचा कचरा; बऱ्याच ठिकाणी झाले अतिक्रमणशहरातील पाणी वाहून जाण्याकरिता तयार करण्यात आलेल्या नाल्यात येथील व्यवसायिक त्यांच्या दुकानातील कचरा टाकत आहेत. अदिती मेडिकल स्टोअर्सच्या शेजारी असलेल्या नालीत मोठ्या प्रमाणात औषधीचे रिकामे खोके टाकण्यात आले आहेत. ते नालीत तसेच पडून असल्याने नालीतून पाणी वाहण्याकरिता अडथळा होण्याची शक्यता आहे. शहरातील मालगुजारीपुरा येथून गेलेल्या नाल्यावर नागरिकांनी व व्यवसायिकांनी ठिकठिकाणी अतिक्रमण केल्याने त्याचे रूपांतर नालीत झाले आहे. शिवाय यात कचरा टाकण्यात येत असल्याने पाणी तिथेच अडत असल्याचे दिसते आहे. यामुळे अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांसह व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण काढण्याची कारवाई करीत नाल्यांची स्वच्छता करण्याची मागणी आहे.