शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
3
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
4
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
5
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
6
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
7
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
8
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
9
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
10
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
11
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
12
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
13
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
14
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
15
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
16
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
17
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
18
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
19
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
20
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 

वर्धा जिल्ह्यातील आंजी मोठी येथे धाम नदीने बदलला प्रवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 12:00 PM

वर्धा जिल्ह्यातील धामनदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर झुडपे व शेवाळे वाढले असल्याने पाण्याचा प्रवाहात अडथळे निर्माण झाल्याने नदीचे पात्र गावाकडे सरकले आहे.

ठळक मुद्देवेळीच उपाययोजना करणे आवश्यकगावाला पुराचा होऊ शकतो धोका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: आंजी (मोठी) येथुन वाहणारी धाम नदी ही आंजीकरांसाठी जीवनदायिनी आहे. परंतु काळाच्या ओघात त्यामध्ये बरेच बदल झाले आहेत. धामनदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर झुडपे व शेवाळे वाढले असल्याने पाण्याचा प्रवाहात अडथळे निर्माण झाल्याने नदीचे पात्र गावाकडे सरकले आहे. नदीच्या पाण्याचा ओघ हा अवघडनाथ महाराज मंदीराच्या टेकडीवर आला आहे व यामुळे टेकडीची पाण्याने झीज होऊन टेकडीसुद्धा जमीनदोस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच येथून पाण्याचा प्रवाह नारायण महाराज मठाकडे वळतो त्या मुळे येथेही पावसाळ्यात पुराने नुकसान नाकारता येत नाही. त्यामुळे नदीचे पात्र स्वच्छ करुन नदीचे पुनरुज्जीवन करून पात्र पूर्ववत करावे अशी मागणी होत होती. मागील वर्षी महाकाळी प्रकल्पापासून येळाकेळीपर्यंत नदीपात्राची स्वच्छता जिल्हा प्रशासन व नाम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होत होती चनकापुरपर्यंत झालीसुध्दा होती. त्यानंतर त्या पुढे नदी स्वच्छता अभियान थांबले. तेव्हापासून ते प्रलंबित आहे. धाम नदी ही वर्धा शहरासह ब-याच गावाची तहान भागविते पण तिच्या स्वच्छतेकडे कोणाचेच लक्ष नाही. याकडे वेळीच लक्ष घालणे आवश्यक आहे नाहीतर गावाला पुरामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.ही नदी धाम प्रकल्पाचा येळाकेळीपर्यत मुख्य कालवा असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासनकडे पाठपुरावा केला आहे.जगदीश संचेरीया,सरपंच , आंजी (मोठी)आमच्या बालपणी नदीचे पात्र खुप दुर होते. ते आज गावालगत आले आहे. यावर लवकर उपाय योजना करून नदी पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे.सुनिल भादककरग्रामस्थ तथा अध्यक्षप्रेरणा फाऊंडेशनआंजी मोठी

 

टॅग्स :riverनदी