शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

वाकलेल्या विद्युत खांबांमुळे जीवितहानीचा धोका

By admin | Updated: June 24, 2017 00:55 IST

वायगाव(नि.) गाव वर्धा तालुक्यात येत असले तरी विद्युत पुरवठा सुरळीत नसल्यास तक्रार मात्र देवळी

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेण्याची गरज लोकमत न्यूज नेटवर्क वायगाव(नि.) : वायगाव(नि.) गाव वर्धा तालुक्यात येत असले तरी विद्युत पुरवठा सुरळीत नसल्यास तक्रार मात्र देवळी येथील वीज वितरण केंद्रात किंवा वायगाव (नि.)च्या वीज वितरण उपकेंद्रात सादर करावी लागते. या भागातील अनेक विद्युत खांब वाकलेले असून त्याच्या दुरूस्तीकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, मोठ्या अनुचित घटनेला आमंत्रण मिळत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे. वायगाव (नि.) परिसरताील या उपकेंद्रात येणाऱ्या गावात वीज वितरण व्यवस्था दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीलाच कोलमडल्याचे चित्र आहे. त्याचा त्रास शेतकऱ्यांना करावा लागत आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी विहिरींच्या पाण्यावर सध्या कसेबसे उगवलेले पीक जगवत आहेत. मात्र, विविध कारणे पुढे करून या भागातील विद्युत पुरवठा वेळोवेळी खंडीत केल्या जात आहे. विजेच्या लपंडावाने शेतकरी त्रस्त झाले आहेत. या उपकेंद्रांतर्गत २० हजाराच्या जवळ कृषीपंप आहेत. तर १० हजाराच्या वरील घरगुती मीटर आणि व्यावसायिक विद्युत जोडणी आहे. गावातील काही वॉर्डात विद्युत तारांवर वृक्षाच्या फांद्या गेल्या आहेत. त्यामुळे वारा आला की विद्युत पुरवठा खंडीत होतो. त्याच प्रमाणे कुरझडी जामठा, वायगाव (नि.) शेत शिवारातील बहुतांश विद्युत खांब वाकलेले आहेत. त्यामुळे मोठ्या अपघाताला निमंत्रण मिळत आहे. याकडे लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.