शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
4
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
5
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
6
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
7
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
8
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
9
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
10
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
11
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
12
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
13
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
14
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
15
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
16
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
17
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
18
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
19
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
Daily Top 2Weekly Top 5

वाकलेल्या विद्युत खांबांमुळे जीवितहानीचा धोका

By admin | Updated: June 24, 2017 00:55 IST

वायगाव(नि.) गाव वर्धा तालुक्यात येत असले तरी विद्युत पुरवठा सुरळीत नसल्यास तक्रार मात्र देवळी

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेण्याची गरज लोकमत न्यूज नेटवर्क वायगाव(नि.) : वायगाव(नि.) गाव वर्धा तालुक्यात येत असले तरी विद्युत पुरवठा सुरळीत नसल्यास तक्रार मात्र देवळी येथील वीज वितरण केंद्रात किंवा वायगाव (नि.)च्या वीज वितरण उपकेंद्रात सादर करावी लागते. या भागातील अनेक विद्युत खांब वाकलेले असून त्याच्या दुरूस्तीकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, मोठ्या अनुचित घटनेला आमंत्रण मिळत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे. वायगाव (नि.) परिसरताील या उपकेंद्रात येणाऱ्या गावात वीज वितरण व्यवस्था दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीलाच कोलमडल्याचे चित्र आहे. त्याचा त्रास शेतकऱ्यांना करावा लागत आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी विहिरींच्या पाण्यावर सध्या कसेबसे उगवलेले पीक जगवत आहेत. मात्र, विविध कारणे पुढे करून या भागातील विद्युत पुरवठा वेळोवेळी खंडीत केल्या जात आहे. विजेच्या लपंडावाने शेतकरी त्रस्त झाले आहेत. या उपकेंद्रांतर्गत २० हजाराच्या जवळ कृषीपंप आहेत. तर १० हजाराच्या वरील घरगुती मीटर आणि व्यावसायिक विद्युत जोडणी आहे. गावातील काही वॉर्डात विद्युत तारांवर वृक्षाच्या फांद्या गेल्या आहेत. त्यामुळे वारा आला की विद्युत पुरवठा खंडीत होतो. त्याच प्रमाणे कुरझडी जामठा, वायगाव (नि.) शेत शिवारातील बहुतांश विद्युत खांब वाकलेले आहेत. त्यामुळे मोठ्या अपघाताला निमंत्रण मिळत आहे. याकडे लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.