शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

वाकलेल्या विद्युत खांबांमुळे जीवितहानीचा धोका

By admin | Updated: June 24, 2017 00:55 IST

वायगाव(नि.) गाव वर्धा तालुक्यात येत असले तरी विद्युत पुरवठा सुरळीत नसल्यास तक्रार मात्र देवळी

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेण्याची गरज लोकमत न्यूज नेटवर्क वायगाव(नि.) : वायगाव(नि.) गाव वर्धा तालुक्यात येत असले तरी विद्युत पुरवठा सुरळीत नसल्यास तक्रार मात्र देवळी येथील वीज वितरण केंद्रात किंवा वायगाव (नि.)च्या वीज वितरण उपकेंद्रात सादर करावी लागते. या भागातील अनेक विद्युत खांब वाकलेले असून त्याच्या दुरूस्तीकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, मोठ्या अनुचित घटनेला आमंत्रण मिळत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे. वायगाव (नि.) परिसरताील या उपकेंद्रात येणाऱ्या गावात वीज वितरण व्यवस्था दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीलाच कोलमडल्याचे चित्र आहे. त्याचा त्रास शेतकऱ्यांना करावा लागत आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी विहिरींच्या पाण्यावर सध्या कसेबसे उगवलेले पीक जगवत आहेत. मात्र, विविध कारणे पुढे करून या भागातील विद्युत पुरवठा वेळोवेळी खंडीत केल्या जात आहे. विजेच्या लपंडावाने शेतकरी त्रस्त झाले आहेत. या उपकेंद्रांतर्गत २० हजाराच्या जवळ कृषीपंप आहेत. तर १० हजाराच्या वरील घरगुती मीटर आणि व्यावसायिक विद्युत जोडणी आहे. गावातील काही वॉर्डात विद्युत तारांवर वृक्षाच्या फांद्या गेल्या आहेत. त्यामुळे वारा आला की विद्युत पुरवठा खंडीत होतो. त्याच प्रमाणे कुरझडी जामठा, वायगाव (नि.) शेत शिवारातील बहुतांश विद्युत खांब वाकलेले आहेत. त्यामुळे मोठ्या अपघाताला निमंत्रण मिळत आहे. याकडे लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.