शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

अवजड वाहतुकीचा धोका

By admin | Updated: October 6, 2016 00:37 IST

शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे म्हणून जड वाहतूक शहराबाहेरील बायपासद्वारे वळविण्यात आली आहे.

नवरात्रौत्सवातही वाहने शहरात : भाविकांना अपघाताची भीतीवर्धा : शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे म्हणून जड वाहतूक शहराबाहेरील बायपासद्वारे वळविण्यात आली आहे. सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत जड वाहनांना शहरात बंदी आहे. असे असले तरी नवरात्रोत्सवामध्ये शहरात रात्रीही भाविकांची मोठी गर्दी असते. यामुळे या दहा दिवसांसाठी शहरातील जड वाहतुकीला कायम बंदी घालणे गरजेचे झाले आहे. रात्री अवजड वाहने शहरातील मुख्य रस्त्याने भरधाव जात असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. वाहतूक पोलिसांनी दहा दिवस तरी यावर निर्बंध लादणे गरजेचे आहे.नागपूर ते औरंगाबाद एक्स्प्रेस वे या रस्त्याच्या निर्मितीसोबतच शहरात बायपास मार्गाची निर्मिती करण्यात आली. या एक्स्प्रेस वे मुळे जड वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नागपूर ते मुंबई दरम्यान चालणारे ट्रक, ट्रेलर, टँकर यासह विविध कंपन्यांना लागणाऱ्या अवजड साहित्याचे ट्रेलरही या मार्गाने धावू लागले आहेत. ही संपूर्ण जड वाहतूक शहरातून होऊ नये, अपघातांचा धोका निर्माण होऊ नये, वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी वाहतूक विभागाद्वारे जड वाहनांना शहरात सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. ही सर्व वाहने शहराच्या बाहेरून काढण्यात आलेल्या बायपास मार्गाने वळविण्यात आली आहेत. यामुळे शहरातील अपघातांचे प्रमाण कमी झाले. शिवाय वाहतुकीतही बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. सध्या नवरात्रोत्सवाची धूम आहे. वर्धा शहरात मोठ्या उत्साहाने मातेची आराधना केली जाते. दुर्गोत्सव काळात जिल्ह्यासह अन्य गावांतील भाविक शहरात दाखल होतात. सायंकाळी ६ वाजतानंतर सुरू झालेली भाविकांची रेलचेल रात्री ११ ते १२ वाजेपर्यंत सुरू असते. शहरातील बहुतांश दुर्गा उत्सव मंडळ मुख्य रस्त्याच्या आजू-बाजूला बाजारओळीमध्येच आहे. यामुळे मुख्य रस्त्यावरच भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. रात्री उशिरापर्यंत गर्दी राहत असल्याने जड वाहनांची वर्दळ अपघातास कारण ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दिवसभर शहरात न भटकणारी जड वाहने रात्री ९ वाजतानंतर शहरातून जात असल्याने वाहतूक विस्कळीत होते. यामुळे किमान नवरात्रोत्सवाच्या दहा दिवसांत जड वाहनांना शहरात येण्यास पूर्णपणे मज्जाव करणेच गरजेचे झाले आहे. नवरात्रोत्सवाचे पाच दिवस दिवस पार पडले आहेत. शहरातील भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. मुख्य रस्त्यावर यात्रा असल्यागत भाविकांच्या रांगा लागतात. शिवाय अनेक ठिकाणी अन्नदान कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परिणामी, रस्त्यावर भाविकांच्या रांगा असतात. अशावेळी भरधाव चालणारी जड वाहने अपघातास कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील आर्वी नाका, शिवाजी चौक ते बजाज चौक या मुख्य मार्गावर रात्री भाविकांची प्रचंड गर्दी उसळते. ही गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी जागोजागी पोलिसांना कर्तव्यावर ठेवण्यात आले आहे; पण रात्री शहरातून होणारी जड वाहतूक अडविण्यात आलेली नाही. यामुळे धोका वाढला आहे. शहरातील रस्ते आधीच निमूळते झालेले आहेत. यातच रात्री दहा वाजेपर्यंत विविध वाहनांची रस्त्यावर वर्दळ असते. नवरात्रोत्सवात होत असलेली भाविकांची गर्दी, वाहनांची रहदारी आणि जड वाहतूक यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोठा अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलीस यंत्रणेने नवरात्रोत्सव काळात शहरातील जड वाहतूक कायम बंदच करणे अगत्याचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करणे गरजेचे