शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

अवजड वाहतुकीचा धोका

By admin | Updated: October 6, 2016 00:37 IST

शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे म्हणून जड वाहतूक शहराबाहेरील बायपासद्वारे वळविण्यात आली आहे.

नवरात्रौत्सवातही वाहने शहरात : भाविकांना अपघाताची भीतीवर्धा : शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे म्हणून जड वाहतूक शहराबाहेरील बायपासद्वारे वळविण्यात आली आहे. सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत जड वाहनांना शहरात बंदी आहे. असे असले तरी नवरात्रोत्सवामध्ये शहरात रात्रीही भाविकांची मोठी गर्दी असते. यामुळे या दहा दिवसांसाठी शहरातील जड वाहतुकीला कायम बंदी घालणे गरजेचे झाले आहे. रात्री अवजड वाहने शहरातील मुख्य रस्त्याने भरधाव जात असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. वाहतूक पोलिसांनी दहा दिवस तरी यावर निर्बंध लादणे गरजेचे आहे.नागपूर ते औरंगाबाद एक्स्प्रेस वे या रस्त्याच्या निर्मितीसोबतच शहरात बायपास मार्गाची निर्मिती करण्यात आली. या एक्स्प्रेस वे मुळे जड वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नागपूर ते मुंबई दरम्यान चालणारे ट्रक, ट्रेलर, टँकर यासह विविध कंपन्यांना लागणाऱ्या अवजड साहित्याचे ट्रेलरही या मार्गाने धावू लागले आहेत. ही संपूर्ण जड वाहतूक शहरातून होऊ नये, अपघातांचा धोका निर्माण होऊ नये, वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी वाहतूक विभागाद्वारे जड वाहनांना शहरात सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. ही सर्व वाहने शहराच्या बाहेरून काढण्यात आलेल्या बायपास मार्गाने वळविण्यात आली आहेत. यामुळे शहरातील अपघातांचे प्रमाण कमी झाले. शिवाय वाहतुकीतही बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. सध्या नवरात्रोत्सवाची धूम आहे. वर्धा शहरात मोठ्या उत्साहाने मातेची आराधना केली जाते. दुर्गोत्सव काळात जिल्ह्यासह अन्य गावांतील भाविक शहरात दाखल होतात. सायंकाळी ६ वाजतानंतर सुरू झालेली भाविकांची रेलचेल रात्री ११ ते १२ वाजेपर्यंत सुरू असते. शहरातील बहुतांश दुर्गा उत्सव मंडळ मुख्य रस्त्याच्या आजू-बाजूला बाजारओळीमध्येच आहे. यामुळे मुख्य रस्त्यावरच भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. रात्री उशिरापर्यंत गर्दी राहत असल्याने जड वाहनांची वर्दळ अपघातास कारण ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दिवसभर शहरात न भटकणारी जड वाहने रात्री ९ वाजतानंतर शहरातून जात असल्याने वाहतूक विस्कळीत होते. यामुळे किमान नवरात्रोत्सवाच्या दहा दिवसांत जड वाहनांना शहरात येण्यास पूर्णपणे मज्जाव करणेच गरजेचे झाले आहे. नवरात्रोत्सवाचे पाच दिवस दिवस पार पडले आहेत. शहरातील भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. मुख्य रस्त्यावर यात्रा असल्यागत भाविकांच्या रांगा लागतात. शिवाय अनेक ठिकाणी अन्नदान कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परिणामी, रस्त्यावर भाविकांच्या रांगा असतात. अशावेळी भरधाव चालणारी जड वाहने अपघातास कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील आर्वी नाका, शिवाजी चौक ते बजाज चौक या मुख्य मार्गावर रात्री भाविकांची प्रचंड गर्दी उसळते. ही गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी जागोजागी पोलिसांना कर्तव्यावर ठेवण्यात आले आहे; पण रात्री शहरातून होणारी जड वाहतूक अडविण्यात आलेली नाही. यामुळे धोका वाढला आहे. शहरातील रस्ते आधीच निमूळते झालेले आहेत. यातच रात्री दहा वाजेपर्यंत विविध वाहनांची रस्त्यावर वर्दळ असते. नवरात्रोत्सवात होत असलेली भाविकांची गर्दी, वाहनांची रहदारी आणि जड वाहतूक यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोठा अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलीस यंत्रणेने नवरात्रोत्सव काळात शहरातील जड वाहतूक कायम बंदच करणे अगत्याचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करणे गरजेचे