शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
3
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
4
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
5
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, चंद्रकांतदादांच्या 'त्या' व्हिडीओवर म्हणाली..
6
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
7
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
8
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
9
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
10
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
11
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
12
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
13
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
14
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
15
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
16
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
17
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
18
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
19
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
20
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स

माहिती अधिकार हाच लोकशाहीचा मूलाधार

By admin | Updated: January 3, 2016 02:38 IST

स्वातंत्र्योत्तर काळातही ब्रिटिशकालीन कायद्यांचे अस्तित्व व प्रभाव दिसतो. देशात संविधानानुसार लोकशाही स्थापन झाली असली तरी....

विजय बोबडे : कायद्याबाबत प्रशिक्षण कार्यक्रमवर्धा : स्वातंत्र्योत्तर काळातही ब्रिटिशकालीन कायद्यांचे अस्तित्व व प्रभाव दिसतो. देशात संविधानानुसार लोकशाही स्थापन झाली असली तरी त्या विरोधी असणारे कायदेही जैसे थे होते. ब्रिटिशकालीन गोपनीयता कायदा १९२३ पासून अलिकडच्या काळापर्यंत होता. यामुळे खऱ्या अर्थाने शासन कारभारात पारदर्शकता येऊ शकत नव्हती. अरुणा रॉय व त्यांच्या सहकाऱ्यांनी जनआंदोलन करून माहितीचा अधिकार देणारा कायदा करण्यास केंद्र सरकारला प्रवृत्त केले. परिणामी, लोकशाहीला एक नवी दिशा मिळाली. माहितीचा अधिकार हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा मूलाधार आहे, असे मत डॉ. विजय बोबडे यांनी व्यक्त केले. यशवंत महाविद्यालयात माहिती अधिकार प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विलास देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. एकनाथ मुरकुटे उपस्थित होेते. डॉ. बोबडे पूढे म्हणाले की, माहितीच्या शोधासाठी पत्रकारांना फार कष्ट सहन करावे लागत होते. यामुळे त्यांनी या अधिकाराबाबत फार मोठा संघर्ष केला. हिंद किसान मजदूर शक्ती संघटन या संस्थेने सातत्याने जनआंदोलनाद्वारे संघर्ष केल्यामुळे राजस्थानमध्ये हा कायदा आधी झाला. महाराष्ट्रामध्ये अण्णा हजारे यांच्या सातत्यपूर्ण आंदोलनामुळे शासनाला हा कायदा करावा लागला. पूढे केंद्र शासनानेच २००५ मध्ये हा कायदा केला. यामुळे खऱ्या अर्थाने हे शासन जनतेप्रती उत्तरदायी झाले आहे. माहिती अधिकार कायद्यामुळे बऱ्याच बाबी सहज, सोप्या झाल्या असून अधिकारी, कर्मचाऱ्यांवर वचक निर्माण झाला आहे. माहितीचा अधिकार कायद्यामधील महत्त्वपूर्ण तरतुदींबाबत सविस्तर माहिती देताना प्रारंभी डॉ. बोबडे यांनी अधिकाराचा प्रभाविपणे वापर करावा, असे आवाहन केले. प्राचार्य डॉ. देशमुख यांनीही माहिती अधिकार कायद्याबाबत माहिती दिली. कायद्याच्या सर्व पैलुंचा सविस्तर अभ्यास करून शासन, प्रशासनात अधिक पारदर्शकता, कार्यक्षमता आणण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचा वापर करावा. केवळ इतरांना त्रास देण्यासाठी शस्त्र म्हणून या कायद्याचा कदापि दुरूपयोग केला जाऊ नये, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एकनाथ मुरकुटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. रवींद्र बेले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता भाऊ बोंदाडे, रिंयाज शेख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (कार्यालय प्रतिनिधी)