शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
4
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
5
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
6
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
7
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
8
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
9
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
10
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
11
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
13
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
14
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
15
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
16
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
17
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
18
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
19
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
20
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य

माहिती अधिकार हाच लोकशाहीचा मूलाधार

By admin | Updated: January 3, 2016 02:38 IST

स्वातंत्र्योत्तर काळातही ब्रिटिशकालीन कायद्यांचे अस्तित्व व प्रभाव दिसतो. देशात संविधानानुसार लोकशाही स्थापन झाली असली तरी....

विजय बोबडे : कायद्याबाबत प्रशिक्षण कार्यक्रमवर्धा : स्वातंत्र्योत्तर काळातही ब्रिटिशकालीन कायद्यांचे अस्तित्व व प्रभाव दिसतो. देशात संविधानानुसार लोकशाही स्थापन झाली असली तरी त्या विरोधी असणारे कायदेही जैसे थे होते. ब्रिटिशकालीन गोपनीयता कायदा १९२३ पासून अलिकडच्या काळापर्यंत होता. यामुळे खऱ्या अर्थाने शासन कारभारात पारदर्शकता येऊ शकत नव्हती. अरुणा रॉय व त्यांच्या सहकाऱ्यांनी जनआंदोलन करून माहितीचा अधिकार देणारा कायदा करण्यास केंद्र सरकारला प्रवृत्त केले. परिणामी, लोकशाहीला एक नवी दिशा मिळाली. माहितीचा अधिकार हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा मूलाधार आहे, असे मत डॉ. विजय बोबडे यांनी व्यक्त केले. यशवंत महाविद्यालयात माहिती अधिकार प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विलास देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. एकनाथ मुरकुटे उपस्थित होेते. डॉ. बोबडे पूढे म्हणाले की, माहितीच्या शोधासाठी पत्रकारांना फार कष्ट सहन करावे लागत होते. यामुळे त्यांनी या अधिकाराबाबत फार मोठा संघर्ष केला. हिंद किसान मजदूर शक्ती संघटन या संस्थेने सातत्याने जनआंदोलनाद्वारे संघर्ष केल्यामुळे राजस्थानमध्ये हा कायदा आधी झाला. महाराष्ट्रामध्ये अण्णा हजारे यांच्या सातत्यपूर्ण आंदोलनामुळे शासनाला हा कायदा करावा लागला. पूढे केंद्र शासनानेच २००५ मध्ये हा कायदा केला. यामुळे खऱ्या अर्थाने हे शासन जनतेप्रती उत्तरदायी झाले आहे. माहिती अधिकार कायद्यामुळे बऱ्याच बाबी सहज, सोप्या झाल्या असून अधिकारी, कर्मचाऱ्यांवर वचक निर्माण झाला आहे. माहितीचा अधिकार कायद्यामधील महत्त्वपूर्ण तरतुदींबाबत सविस्तर माहिती देताना प्रारंभी डॉ. बोबडे यांनी अधिकाराचा प्रभाविपणे वापर करावा, असे आवाहन केले. प्राचार्य डॉ. देशमुख यांनीही माहिती अधिकार कायद्याबाबत माहिती दिली. कायद्याच्या सर्व पैलुंचा सविस्तर अभ्यास करून शासन, प्रशासनात अधिक पारदर्शकता, कार्यक्षमता आणण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचा वापर करावा. केवळ इतरांना त्रास देण्यासाठी शस्त्र म्हणून या कायद्याचा कदापि दुरूपयोग केला जाऊ नये, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एकनाथ मुरकुटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. रवींद्र बेले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता भाऊ बोंदाडे, रिंयाज शेख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (कार्यालय प्रतिनिधी)