शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

महसूल विभाग सर्वाधिक लाचखोर

By admin | Updated: December 4, 2015 02:13 IST

लाचखोरी विरोधात कितीही कायदे झाले, त्याची जनजागृती झाली तरी लाचखोरीचा प्रकार कमी होत नसल्याचे दिसून येते.

२२ महिन्यांत ३७ गुन्हे : पोलीस विभाग दुसऱ्या क्रमांकावरगौरव देशमुख वर्धा लाचखोरी विरोधात कितीही कायदे झाले, त्याची जनजागृती झाली तरी लाचखोरीचा प्रकार कमी होत नसल्याचे दिसून येते. जिल्ह्यात अडीच वर्षांत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ३७ गुन्हे दाखल केले आहेत. यात लाचखोरांना गजाआड करण्यात आले आहे. लाचखोरीत महसूल विभाग जिल्ह्यात अव्वल असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. त्यापाठोपाठ दुसरा क्रमांक पोलीस विभागाचा असल्याचे समोर आले आहे.कुठलेही काम करून घेण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून लाचेची मागणी केली जाते. हे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, २०१४ मध्ये १२ महिन्यांत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने २४ जणांविरूद्ध संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. यात ४ लाख ९९ हजार ८०० रुपयांची माया जप्त केली आहे. २०१५ मध्ये १० महिन्यांत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजू जैन यांच्या मार्गदर्शनात १४ जणांविरूद्ध संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना गजाआड केले आहे.२०१४ मध्ये केलेल्या कारवाईमध्ये महसूल विभाग ९, पोलीस विभाग ३, आरटीओ १, समाज कल्याण १, जिल्हा परिषद बांधकाम विभाग १, ग्रामविकास यंत्रणा अधिकारी १, सरपंच १, ग्रामसेवक २, न्याय विभाग १, कृषी विभाग १, महिला व बाल कल्याण विभाग १, वनविभाग १ आणि नगर विकास मंत्रालय १ असे २४ जणांचा समावेश आहे. या सर्वांना सापळा रचून एसीबीने रंगेहात पकडून गजाआड केले.२०१५ मध्ये १० महिन्यांत १२ जणांना रंगेहात पकडून गजाआड करण्यात आले. यात महसूल विभाग ४, पोलीस विभाग २, न्याय विभाग १, जिल्हा परिषद गटविकास अधिकारी १, बांधकाम विभाग १, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ १, पंचायत समिती १, कृषी विभाग १ आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ १ आदींचा समावेश आहे. २२ महिन्यांमध्ये जिल्ह्यात महसूल विभागाच्या १३ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ३७ प्रकरणांतील १३ जण महसूल विभागाचे असल्याने सर्वाधिक लाचेची मागणी महसूल विभागाकडून केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर पोलीस विभागातील पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे लाच मागण्याच्या प्रकाराला आळा घातला जावा, ही अपेक्षा असते; पण हे प्रकार फार कमी होताना दिसून येत नाही. नागरिकांची कामे सरळ व पारदर्शक होण्याकरिता कर्तव्यतत्परता जपणे गरजेचे झाले आहे. आता प्रत्येक कामाचा निश्चित कालावधी दिल्याने लाच मागण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जनजागृतीची गरजजनसामान्यांशी निगडीत महसूल विभाग लाचखोरीत अव्वल आहे. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारा पोलीस विभाग द्वितीय क्रमांकावर असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या विविध कारवाईतून स्पष्ट झाले आहे.जिल्ह्यासह देशात सर्वत्र लाचखोरीचे प्रमाण वाढले आहे. यावर पायबंद घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सदैव तत्पर आहे. लाच घेण्याचे प्रमाण वाढत असल्याने कामगिरी पार पडणे एक आव्हान ठरत आहे. यासाठी नागरिकांनी समोर येऊन तक्रार करणे गरजेचे आहे.