शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
“प्रशांत जगतापांनी अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेस मार्ग पत्करला”: वडेट्टीवार
4
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
5
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
6
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
7
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
8
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
9
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
10
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
11
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
12
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
13
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
14
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
15
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
16
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
17
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
18
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
19
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
20
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
Daily Top 2Weekly Top 5

परवान्यांतून १.९२ कोटींचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 23:23 IST

वाहन दुचाकी असो वा चारचाकी ते चालविण्याकरिता कायद्याने दिलेला परवाना आवश्यक आहे. हा परवाना देण्याकरिता शासनाच्यावतीने उपप्रादेशिक परिवहन विभागाला अधिकार देण्यात आले आहेत. हा परवाना मिळविण्याकरिता काही कर भरणे अनिवार्य आहे.

ठळक मुद्देआरटीओची कामगिरी : वर्षभरात २०,०४७ नवीन तर ८,३१० जुन्यांचे नूतनीकरण

रूपेश खैरी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाहन दुचाकी असो वा चारचाकी ते चालविण्याकरिता कायद्याने दिलेला परवाना आवश्यक आहे. हा परवाना देण्याकरिता शासनाच्यावतीने उपप्रादेशिक परिवहन विभागाला अधिकार देण्यात आले आहेत. हा परवाना मिळविण्याकरिता काही कर भरणे अनिवार्य आहे. हाच कर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या तिजोरीचे वजन वाढविणारा ठरत आहे. जिल्ह्यात एप्रिल २०१७ ते २०१८ या बारा महिन्यांच्या काळात तब्बल २० हजार ४७ नवे चालक परवाने वितरित करण्यात आले आहे. या परवान्यांतून उपप्रादेशिक परिवहन विभागाला १ कोटी ९२ लाख २८ हजार ४६२ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.रस्त्याने वाहन चालविताना त्या वाहनाच्या चालकाकडे परवाना आवश्यक आहे. विनापरवाना वाहन चालविणे कायद्याने गुन्हा ठरते. यामुळे तो काढण्याकरिता उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने एक वेगळी शाखाच देण्यात आलेली आहे. या शाखेमार्फत वाहन चालकांना शिकाऊ आणि स्थायी स्वरूपाचा परवाना देण्यात येतो. सध्या हा परवाना देण्याची पद्धत आॅनलाईन करण्यात आलेली आहे. परवाना देण्याच्या या आॅनलाईन पद्धतीला सारथी, असे नाव देण्यात आले आहे. या सारथीमध्ये असलेल्या अनेक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून एक आॅनलाईन परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरच वाहन चालविण्याचा परवाना दिला जातो. हा परवाना प्राप्त झाल्यानंतरच कायद्यानुसार वाहन चालविणे ग्राह्य धरले जाते.आॅटोरिक्षाच्या परवान्यांतून २०.६२ लाखजिल्ह्यात ५ हजार ४३१ आॅटोरिक्षा रस्त्याने धावत आहे. यापैकी २ हजार ९०० आॅटो चालकांकडे प्रवासी वाहतुकीचा परवाना आहे तर २ हजार ५३१ आॅटो खासगी असताना त्यांच्याकडून प्रवासी वाहतूक होत आहे. अशा खासगी आॅटोंना प्रवासी परवाना देण्याकरिता उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने मोहीम राबविण्यात आली. या माहिमेतून १५५ खासगी आॅटोचे परिवर्तन प्रवासी आॅटोमध्ये करण्यात आले आहे. या नूतनीकरणाच्या मोहिमेतून ७७ हजार ५०० रुपये परिवहन विभागाच्या तिजोरीत जमा झाले आहेत.मागील आर्थिक वर्षात जिल्ह्यात १८९ नवीन आॅटो रस्त्यावर आले आहे. त्यांच्याकडून प्रवासी परवाने काढण्यात आले असून या माध्यमातून १९ लाख ८४ हजार ५०० रुपयांची कमाई झाली आहे.नूतनीकरणातून ३८.७२ लाखांची कमाईएका वाहन चालकाच्या परवान्याची मुदत साधारणत: २० वर्षांची असते. या परवान्याचे पुन्हा नुतनीकरण करण्याची मुभा वाहतूक कायद्यानुसार देण्यात आलेली आहे. या आर्थिक वर्षात जिल्ह्यात ८ हजार ३१० चालकांनी त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण केले असून यातून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या तिजोरीत ३८ लाख ७२ हजार ४६० रुपयांचा महसूल जमा झाला आहे.शहरात अनेकांकडे वाहतूक परवाने नाहीशहरातील असो वा जिल्ह्यातील रस्ते तेवढेच असले तरी वाहन चालकांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यांवर दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांची संख्या दररोजच वाढत आहे. वाहने वाढत असली तरी कित्येक वाहन चालकांकडे वाहतूक परवाना नसल्याचे वास्तव आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने या संदर्भात चालकांचा परवाना तपासण्याची एक मोहीम राबविण्याची गरज आहे.