शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

परवान्यांतून १.९२ कोटींचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 23:23 IST

वाहन दुचाकी असो वा चारचाकी ते चालविण्याकरिता कायद्याने दिलेला परवाना आवश्यक आहे. हा परवाना देण्याकरिता शासनाच्यावतीने उपप्रादेशिक परिवहन विभागाला अधिकार देण्यात आले आहेत. हा परवाना मिळविण्याकरिता काही कर भरणे अनिवार्य आहे.

ठळक मुद्देआरटीओची कामगिरी : वर्षभरात २०,०४७ नवीन तर ८,३१० जुन्यांचे नूतनीकरण

रूपेश खैरी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाहन दुचाकी असो वा चारचाकी ते चालविण्याकरिता कायद्याने दिलेला परवाना आवश्यक आहे. हा परवाना देण्याकरिता शासनाच्यावतीने उपप्रादेशिक परिवहन विभागाला अधिकार देण्यात आले आहेत. हा परवाना मिळविण्याकरिता काही कर भरणे अनिवार्य आहे. हाच कर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या तिजोरीचे वजन वाढविणारा ठरत आहे. जिल्ह्यात एप्रिल २०१७ ते २०१८ या बारा महिन्यांच्या काळात तब्बल २० हजार ४७ नवे चालक परवाने वितरित करण्यात आले आहे. या परवान्यांतून उपप्रादेशिक परिवहन विभागाला १ कोटी ९२ लाख २८ हजार ४६२ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.रस्त्याने वाहन चालविताना त्या वाहनाच्या चालकाकडे परवाना आवश्यक आहे. विनापरवाना वाहन चालविणे कायद्याने गुन्हा ठरते. यामुळे तो काढण्याकरिता उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने एक वेगळी शाखाच देण्यात आलेली आहे. या शाखेमार्फत वाहन चालकांना शिकाऊ आणि स्थायी स्वरूपाचा परवाना देण्यात येतो. सध्या हा परवाना देण्याची पद्धत आॅनलाईन करण्यात आलेली आहे. परवाना देण्याच्या या आॅनलाईन पद्धतीला सारथी, असे नाव देण्यात आले आहे. या सारथीमध्ये असलेल्या अनेक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून एक आॅनलाईन परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरच वाहन चालविण्याचा परवाना दिला जातो. हा परवाना प्राप्त झाल्यानंतरच कायद्यानुसार वाहन चालविणे ग्राह्य धरले जाते.आॅटोरिक्षाच्या परवान्यांतून २०.६२ लाखजिल्ह्यात ५ हजार ४३१ आॅटोरिक्षा रस्त्याने धावत आहे. यापैकी २ हजार ९०० आॅटो चालकांकडे प्रवासी वाहतुकीचा परवाना आहे तर २ हजार ५३१ आॅटो खासगी असताना त्यांच्याकडून प्रवासी वाहतूक होत आहे. अशा खासगी आॅटोंना प्रवासी परवाना देण्याकरिता उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने मोहीम राबविण्यात आली. या माहिमेतून १५५ खासगी आॅटोचे परिवर्तन प्रवासी आॅटोमध्ये करण्यात आले आहे. या नूतनीकरणाच्या मोहिमेतून ७७ हजार ५०० रुपये परिवहन विभागाच्या तिजोरीत जमा झाले आहेत.मागील आर्थिक वर्षात जिल्ह्यात १८९ नवीन आॅटो रस्त्यावर आले आहे. त्यांच्याकडून प्रवासी परवाने काढण्यात आले असून या माध्यमातून १९ लाख ८४ हजार ५०० रुपयांची कमाई झाली आहे.नूतनीकरणातून ३८.७२ लाखांची कमाईएका वाहन चालकाच्या परवान्याची मुदत साधारणत: २० वर्षांची असते. या परवान्याचे पुन्हा नुतनीकरण करण्याची मुभा वाहतूक कायद्यानुसार देण्यात आलेली आहे. या आर्थिक वर्षात जिल्ह्यात ८ हजार ३१० चालकांनी त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण केले असून यातून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या तिजोरीत ३८ लाख ७२ हजार ४६० रुपयांचा महसूल जमा झाला आहे.शहरात अनेकांकडे वाहतूक परवाने नाहीशहरातील असो वा जिल्ह्यातील रस्ते तेवढेच असले तरी वाहन चालकांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यांवर दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांची संख्या दररोजच वाढत आहे. वाहने वाढत असली तरी कित्येक वाहन चालकांकडे वाहतूक परवाना नसल्याचे वास्तव आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने या संदर्भात चालकांचा परवाना तपासण्याची एक मोहीम राबविण्याची गरज आहे.