शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

लोकप्रतिनिधी आणि सामान्य श्रोत्यांची साहित्य संमेलनाकडे पाठ; कवी, गझलकरांचा उत्साह पाहण्यासारखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2023 19:13 IST

Wardha News मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांच्या मागोमाग घोषणेच्या स्वरूपात खोकेही पोहोचल्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या परिसराचा नूर बदलला आहे. या घडामोडीपासून लोकप्रतिनिधींनी आणि सामान्य श्रोत्यांनी या संमेलनाकडे पाठ फिरविल्याची प्रकर्षाने जाणीव होत आहे.

नरेश डोंगरे!

राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरी (वर्धा) : मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांच्या मागोमाग घोषणेच्या स्वरूपात खोकेही पोहोचल्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या परिसराचा नूर बदलला आहे. या घडामोडीपासून लोकप्रतिनिधींनी आणि सामान्य श्रोत्यांनी या संमेलनाकडे पाठ फिरविल्याची प्रकर्षाने जाणीव होत आहे.

५३ वर्षांनंतर बापू विनोबाच्या कर्मभूमीत साहित्यनगरी पुन्हा एकदा सजली आहे. साहित्य संमेलनाचे आयोजन भव्य दिव्यच आहे आणि त्यामुळे हा एकूणच परिसर कमालीचा देखणा झाला आहे. मात्र उद्घाटनाच्या कार्यक्रमात ५० खोक्यांच्या घोषणाबाजीने गालबोट लावल्याने संमेलनाला काही वेळेसाठी अस्वस्थ केले होते. जवळपास प्रत्येकच डोममधील खाली खुर्च्यांची संख्या श्रुती पृष्ठ झाल्याची चुगली करत होती.

जत्रा फुलली, मात्र...

सायंकाळी साहित्यिकांची, कवी आणि गझलकारांची गर्दी वाढल्याने परिसरात उत्साह ओसंडून वाहू लागला, परंतु साहित्यिक, कवी, गझलकारांच्या जत्रेत श्रोत्यांची कमतरता प्रकर्षाने जाणवत होती. अध्यक्षीय भाषणाच्या वेळीचे आचार्य विनोबा भावे सभामंडपातील चित्र खूपच बोलके होते.

 

निधी दिला, जबाबदारी संपली

वर्धा जिल्ह्यात चार आमदार आणि एक खासदार आहेत. देवळीचे आमदार वगळता तीनही आमदार आणि खासदार भाजपचेच आहेत. त्यातील वर्धेचे आमदार पंकज भोयर हे उद्घाटन कार्यक्रमापुरतेच मंचावर दिसले. त्यांच्या व्यतिरिक्त कोणताही आमदार आणि खासदार तर सोडा, विविध पक्षांचा कोणताही मोठा नेता या परिसरात फिरताना दिसला नाही. संमेलनाला प्रत्येक आमदार, खासदारांनी दहा-दहा लाख रुपये आपल्या निधीतून दिल्याचे सांगितले जाते. मात्र, निधी दिला आणि आपली जबाबदारी संपली, अशीच भूमिका या लोकप्रतिनिधींनी घेतल्याचे शनिवारी सायंकाळपर्यंत चित्र होते.

कशाचा इफेक्ट?

लोकप्रतिनिधीने सारस्वतांच्या मेळ्यापासून राखलेले अंतर कशाचा इफेक्ट आहे, ते स्पष्ट झाले नाही. मात्र, त्या संबंधाने वेगवेगळी चर्चा ऐकायला मिळत आहे. काहींनी आपले नेते आले नसल्याने इकडे येण्याचे टाळले असावे, तर काहींचा विधानपरिषद निवडणुकांनी भ्रमनिरास केल्यामुळे ते इकडे येऊ शकले नसावे, असा अंदाज वर्तविला जात आहे.

सूर्य, चंद्र, आकाश, तारे सारे सारे!

या साहित्य संमेलनात सूर्य, चंद्र, आकाश, तारे असे सारे सारे अवतरले. शेतकऱ्यांच्या बेरोजगारांच्या अवस्थेचीही चर्चा झाली. मात्र, केवळ कवी संमेलन आणि गझल कट्ट्यावर!

-----

टॅग्स :literatureसाहित्यMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन