शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधी आणि सामान्य श्रोत्यांची साहित्य संमेलनाकडे पाठ; कवी, गझलकरांचा उत्साह पाहण्यासारखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2023 19:13 IST

Wardha News मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांच्या मागोमाग घोषणेच्या स्वरूपात खोकेही पोहोचल्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या परिसराचा नूर बदलला आहे. या घडामोडीपासून लोकप्रतिनिधींनी आणि सामान्य श्रोत्यांनी या संमेलनाकडे पाठ फिरविल्याची प्रकर्षाने जाणीव होत आहे.

नरेश डोंगरे!

राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरी (वर्धा) : मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांच्या मागोमाग घोषणेच्या स्वरूपात खोकेही पोहोचल्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या परिसराचा नूर बदलला आहे. या घडामोडीपासून लोकप्रतिनिधींनी आणि सामान्य श्रोत्यांनी या संमेलनाकडे पाठ फिरविल्याची प्रकर्षाने जाणीव होत आहे.

५३ वर्षांनंतर बापू विनोबाच्या कर्मभूमीत साहित्यनगरी पुन्हा एकदा सजली आहे. साहित्य संमेलनाचे आयोजन भव्य दिव्यच आहे आणि त्यामुळे हा एकूणच परिसर कमालीचा देखणा झाला आहे. मात्र उद्घाटनाच्या कार्यक्रमात ५० खोक्यांच्या घोषणाबाजीने गालबोट लावल्याने संमेलनाला काही वेळेसाठी अस्वस्थ केले होते. जवळपास प्रत्येकच डोममधील खाली खुर्च्यांची संख्या श्रुती पृष्ठ झाल्याची चुगली करत होती.

जत्रा फुलली, मात्र...

सायंकाळी साहित्यिकांची, कवी आणि गझलकारांची गर्दी वाढल्याने परिसरात उत्साह ओसंडून वाहू लागला, परंतु साहित्यिक, कवी, गझलकारांच्या जत्रेत श्रोत्यांची कमतरता प्रकर्षाने जाणवत होती. अध्यक्षीय भाषणाच्या वेळीचे आचार्य विनोबा भावे सभामंडपातील चित्र खूपच बोलके होते.

 

निधी दिला, जबाबदारी संपली

वर्धा जिल्ह्यात चार आमदार आणि एक खासदार आहेत. देवळीचे आमदार वगळता तीनही आमदार आणि खासदार भाजपचेच आहेत. त्यातील वर्धेचे आमदार पंकज भोयर हे उद्घाटन कार्यक्रमापुरतेच मंचावर दिसले. त्यांच्या व्यतिरिक्त कोणताही आमदार आणि खासदार तर सोडा, विविध पक्षांचा कोणताही मोठा नेता या परिसरात फिरताना दिसला नाही. संमेलनाला प्रत्येक आमदार, खासदारांनी दहा-दहा लाख रुपये आपल्या निधीतून दिल्याचे सांगितले जाते. मात्र, निधी दिला आणि आपली जबाबदारी संपली, अशीच भूमिका या लोकप्रतिनिधींनी घेतल्याचे शनिवारी सायंकाळपर्यंत चित्र होते.

कशाचा इफेक्ट?

लोकप्रतिनिधीने सारस्वतांच्या मेळ्यापासून राखलेले अंतर कशाचा इफेक्ट आहे, ते स्पष्ट झाले नाही. मात्र, त्या संबंधाने वेगवेगळी चर्चा ऐकायला मिळत आहे. काहींनी आपले नेते आले नसल्याने इकडे येण्याचे टाळले असावे, तर काहींचा विधानपरिषद निवडणुकांनी भ्रमनिरास केल्यामुळे ते इकडे येऊ शकले नसावे, असा अंदाज वर्तविला जात आहे.

सूर्य, चंद्र, आकाश, तारे सारे सारे!

या साहित्य संमेलनात सूर्य, चंद्र, आकाश, तारे असे सारे सारे अवतरले. शेतकऱ्यांच्या बेरोजगारांच्या अवस्थेचीही चर्चा झाली. मात्र, केवळ कवी संमेलन आणि गझल कट्ट्यावर!

-----

टॅग्स :literatureसाहित्यMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन