शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

दिंदोडा प्रकल्पग्रस्तांना जमिनी परत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 22:42 IST

दिंदोडा प्रकल्पात शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरूद्ध प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहे.

ठळक मुद्देअधिवेशनावर धडकणार : आश्रमातून मोर्चा रवाना

आॅनलाईन लोकमतवर्धा : दिंदोडा प्रकल्पात शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरूद्ध प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहे. या मोर्चाची सुरूवात सेवाग्राम आश्रम येथून करण्यात आली. या मध्यमातून प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या जमिनी परत करण्याची मागणी करण्यात येणार आहे.दिंदोडा प्रकल्पासाठी शासनाने वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील ३२ गावाच्या १९९९-२००० मध्ये जमिनी संपादीत केल्या. परंतु त्या जमिनी शासनाने ताब्यात घेतल्या नाही. बहुसंख्य शेतकºयांना जमिनीचा पैसा देखील मिळाला नाही. जमिनीचा सातबारा शेतकऱ्यांच्या नावावर असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शासकीय योजनेपासून ते वंचित राहतात. शिवाय जमिनीचा मोबदला न दिल्याने आर्थिक अडचण येत आहे. यात काही शेतकरी भूमिहीन झाले. त्यामुळे त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. शासनाने अल्पदराने जमिनी खरेदी केल्या आहे. यामुळे शेतकऱ्यांपुढे जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यानिमित्त मोर्चाची सुरूवात आश्रम येथून करण्यात आली.तिन्ही जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी व शेतमजूर सेवाग्राम आश्रम येते आले होते. यानंतर सर्वधर्म प्रार्थना व भजन झाले. समितीचे अध्यक्ष पुंडलीक तिजारे यांनी माहिती दिली. प्रकल्पासाठी १४५० हेक्टर जमीन संपादीत केली असून या प्रकल्पाला २८०० हेक्टर जमीन पाहिजे. १९९९ मध्ये शासनाने जमीन संपादीत केली मात्र प्रकल्प निर्मिती झालीच नाही. यात सर्व प्रकल्पग्रस्तांचे अतोनात नुकसान झाले आहे. ऐवढेच नाही तर बहुसंख्य शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. त्यामुळे नवीन भूमी अधिग्रहण कायदा २०१३-१४ कलम २४ (२) नुसार ते अधिग्रहण रद्द करण्यात यावे. जमिनी सुपीक असून शेतकरी, शेतमजूर या प्रकल्पाला विरोध करीत आहे. कारण त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या गलथान कारभाराचा निषेध करण्यात येणार आहे. समितीचे उपाध्यक्ष अभिजीत माडेकर, सचिव चंपत साळवे, कोषाध्यक्ष पी. भिडकर, मार्गदर्शक विलास भोंगाडे, समीक्षा गणवीर, पगार, इंगोले व प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले आहे.