शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दिंदोडा प्रकल्पग्रस्तांना जमिनी परत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 22:42 IST

दिंदोडा प्रकल्पात शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरूद्ध प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहे.

ठळक मुद्देअधिवेशनावर धडकणार : आश्रमातून मोर्चा रवाना

आॅनलाईन लोकमतवर्धा : दिंदोडा प्रकल्पात शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरूद्ध प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहे. या मोर्चाची सुरूवात सेवाग्राम आश्रम येथून करण्यात आली. या मध्यमातून प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या जमिनी परत करण्याची मागणी करण्यात येणार आहे.दिंदोडा प्रकल्पासाठी शासनाने वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील ३२ गावाच्या १९९९-२००० मध्ये जमिनी संपादीत केल्या. परंतु त्या जमिनी शासनाने ताब्यात घेतल्या नाही. बहुसंख्य शेतकºयांना जमिनीचा पैसा देखील मिळाला नाही. जमिनीचा सातबारा शेतकऱ्यांच्या नावावर असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शासकीय योजनेपासून ते वंचित राहतात. शिवाय जमिनीचा मोबदला न दिल्याने आर्थिक अडचण येत आहे. यात काही शेतकरी भूमिहीन झाले. त्यामुळे त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. शासनाने अल्पदराने जमिनी खरेदी केल्या आहे. यामुळे शेतकऱ्यांपुढे जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यानिमित्त मोर्चाची सुरूवात आश्रम येथून करण्यात आली.तिन्ही जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी व शेतमजूर सेवाग्राम आश्रम येते आले होते. यानंतर सर्वधर्म प्रार्थना व भजन झाले. समितीचे अध्यक्ष पुंडलीक तिजारे यांनी माहिती दिली. प्रकल्पासाठी १४५० हेक्टर जमीन संपादीत केली असून या प्रकल्पाला २८०० हेक्टर जमीन पाहिजे. १९९९ मध्ये शासनाने जमीन संपादीत केली मात्र प्रकल्प निर्मिती झालीच नाही. यात सर्व प्रकल्पग्रस्तांचे अतोनात नुकसान झाले आहे. ऐवढेच नाही तर बहुसंख्य शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. त्यामुळे नवीन भूमी अधिग्रहण कायदा २०१३-१४ कलम २४ (२) नुसार ते अधिग्रहण रद्द करण्यात यावे. जमिनी सुपीक असून शेतकरी, शेतमजूर या प्रकल्पाला विरोध करीत आहे. कारण त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या गलथान कारभाराचा निषेध करण्यात येणार आहे. समितीचे उपाध्यक्ष अभिजीत माडेकर, सचिव चंपत साळवे, कोषाध्यक्ष पी. भिडकर, मार्गदर्शक विलास भोंगाडे, समीक्षा गणवीर, पगार, इंगोले व प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले आहे.