शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

परतीच्या पावसाचा २०३ हेक्टरवरील पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 00:05 IST

यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने दगा दिला. परंतु, त्यानंतर झालेला पाऊस उभ्या पिकांसाठी नवसंजीवनीच ठरला. शेतकऱ्यांनीही पिकांची योग्य निगा राखल्याने पिकांची वाढही बºयापैकी झाली. सध्या सोयाबीन मळणीच्या कामाला शेतकºयांकडून प्राधान्य दिले जात आहे.

ठळक मुद्देसोयाबीनचे सर्वाधिक नुकसान : अहवाल शासन दरबारी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चांगलीच अडचण वाढविली आहे. मागील दहा दिवसांत थांबून थांबून झालेल्या पावसाचा २०३.१५ हेक्टरवरील पिकांना चांगलाच फटका बसला आहे. तशी नोंदही जिल्हा प्रशासनाने घेतली असून झालेल्या नुकसानीबाबतचा प्राथमिक अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे.यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने दगा दिला. परंतु, त्यानंतर झालेला पाऊस उभ्या पिकांसाठी नवसंजीवनीच ठरला. शेतकऱ्यांनीही पिकांची योग्य निगा राखल्याने पिकांची वाढही बºयापैकी झाली. सध्या सोयाबीन मळणीच्या कामाला शेतकºयांकडून प्राधान्य दिले जात आहे. असे असले तरी मागील दहा दिवसांत वर्धा जिल्ह्यात थांबून थांबून झालेल्या परतीच्या पावसामुळे तूर, कापूस व सोयाबीन या पिकांचे चांगलेच नुकसान झाले आहे. सदर परतीच्या पावसामुळे २७.६५ हेक्टर वरील कपाशी, २ हेक्टरवरील तूर तर १२८.५० हेक्टरवरील सोयाबीन पिकाचे ३३ टक्केच्या आत नुकसान झाले आहे. तर १७ हेक्टरवरील कपाशी, २५.८० हेक्टरवरील सोयाबीन पिकाचे ३३ टक्केच्यावर नुकसान झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. एकूणच परतीच्या पावसाने वर्धा जिल्ह्यातील शेतकºयांचे कंबर्डे मोडले असून हवालदील झालेल्या शेतकºयांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे.सेलू तालुक्यात सर्वाधिक शेतकºयांचे नुकसानजिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविलेल्या प्राथमिक अहवालानुसार परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील एकूण ३१० शेतकºयांचे नुकसान झाले आहे. इतकेच नव्हे तर वर्धा तालुक्यातील ७१, सेलू तालुक्यातील १८०, देवळी तालुक्यातील १०, आर्वी व हिंगणघाट तालुक्यातील प्रत्येकी एक तर समुद्रपूर तालुक्यातील ४७ शेतकºयांचे नुकसान झाल्याचेही या अहवालात नमुद करण्यात आले आहे.एकूण ४३ गावे बाधितपरतीच्या पावसाचा जिल्ह्यातील एकूण ४३ गावांना फटका बसला आहे. यात वर्धा तालुक्यातील सात, सेलू तालुक्यातील सात, देवळी तालुक्यातील चार, आर्वी तालुक्यातील एक, हिंगणघाट तालुक्यातील एक तर समुद्रपूर तालुक्यातील २३ गावांचा समावेश आहे.