शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाचा २०३ हेक्टरवरील पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 00:05 IST

यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने दगा दिला. परंतु, त्यानंतर झालेला पाऊस उभ्या पिकांसाठी नवसंजीवनीच ठरला. शेतकऱ्यांनीही पिकांची योग्य निगा राखल्याने पिकांची वाढही बºयापैकी झाली. सध्या सोयाबीन मळणीच्या कामाला शेतकºयांकडून प्राधान्य दिले जात आहे.

ठळक मुद्देसोयाबीनचे सर्वाधिक नुकसान : अहवाल शासन दरबारी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चांगलीच अडचण वाढविली आहे. मागील दहा दिवसांत थांबून थांबून झालेल्या पावसाचा २०३.१५ हेक्टरवरील पिकांना चांगलाच फटका बसला आहे. तशी नोंदही जिल्हा प्रशासनाने घेतली असून झालेल्या नुकसानीबाबतचा प्राथमिक अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे.यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने दगा दिला. परंतु, त्यानंतर झालेला पाऊस उभ्या पिकांसाठी नवसंजीवनीच ठरला. शेतकऱ्यांनीही पिकांची योग्य निगा राखल्याने पिकांची वाढही बºयापैकी झाली. सध्या सोयाबीन मळणीच्या कामाला शेतकºयांकडून प्राधान्य दिले जात आहे. असे असले तरी मागील दहा दिवसांत वर्धा जिल्ह्यात थांबून थांबून झालेल्या परतीच्या पावसामुळे तूर, कापूस व सोयाबीन या पिकांचे चांगलेच नुकसान झाले आहे. सदर परतीच्या पावसामुळे २७.६५ हेक्टर वरील कपाशी, २ हेक्टरवरील तूर तर १२८.५० हेक्टरवरील सोयाबीन पिकाचे ३३ टक्केच्या आत नुकसान झाले आहे. तर १७ हेक्टरवरील कपाशी, २५.८० हेक्टरवरील सोयाबीन पिकाचे ३३ टक्केच्यावर नुकसान झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. एकूणच परतीच्या पावसाने वर्धा जिल्ह्यातील शेतकºयांचे कंबर्डे मोडले असून हवालदील झालेल्या शेतकºयांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे.सेलू तालुक्यात सर्वाधिक शेतकºयांचे नुकसानजिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविलेल्या प्राथमिक अहवालानुसार परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील एकूण ३१० शेतकºयांचे नुकसान झाले आहे. इतकेच नव्हे तर वर्धा तालुक्यातील ७१, सेलू तालुक्यातील १८०, देवळी तालुक्यातील १०, आर्वी व हिंगणघाट तालुक्यातील प्रत्येकी एक तर समुद्रपूर तालुक्यातील ४७ शेतकºयांचे नुकसान झाल्याचेही या अहवालात नमुद करण्यात आले आहे.एकूण ४३ गावे बाधितपरतीच्या पावसाचा जिल्ह्यातील एकूण ४३ गावांना फटका बसला आहे. यात वर्धा तालुक्यातील सात, सेलू तालुक्यातील सात, देवळी तालुक्यातील चार, आर्वी तालुक्यातील एक, हिंगणघाट तालुक्यातील एक तर समुद्रपूर तालुक्यातील २३ गावांचा समावेश आहे.