शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
3
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
4
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
5
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
6
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
7
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
8
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
9
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
10
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
11
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
12
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
13
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
14
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
15
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
16
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
17
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
18
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
19
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
20
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर

परतीच्या पावसाचा २०३ हेक्टरवरील पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 00:05 IST

यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने दगा दिला. परंतु, त्यानंतर झालेला पाऊस उभ्या पिकांसाठी नवसंजीवनीच ठरला. शेतकऱ्यांनीही पिकांची योग्य निगा राखल्याने पिकांची वाढही बºयापैकी झाली. सध्या सोयाबीन मळणीच्या कामाला शेतकºयांकडून प्राधान्य दिले जात आहे.

ठळक मुद्देसोयाबीनचे सर्वाधिक नुकसान : अहवाल शासन दरबारी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चांगलीच अडचण वाढविली आहे. मागील दहा दिवसांत थांबून थांबून झालेल्या पावसाचा २०३.१५ हेक्टरवरील पिकांना चांगलाच फटका बसला आहे. तशी नोंदही जिल्हा प्रशासनाने घेतली असून झालेल्या नुकसानीबाबतचा प्राथमिक अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे.यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने दगा दिला. परंतु, त्यानंतर झालेला पाऊस उभ्या पिकांसाठी नवसंजीवनीच ठरला. शेतकऱ्यांनीही पिकांची योग्य निगा राखल्याने पिकांची वाढही बºयापैकी झाली. सध्या सोयाबीन मळणीच्या कामाला शेतकºयांकडून प्राधान्य दिले जात आहे. असे असले तरी मागील दहा दिवसांत वर्धा जिल्ह्यात थांबून थांबून झालेल्या परतीच्या पावसामुळे तूर, कापूस व सोयाबीन या पिकांचे चांगलेच नुकसान झाले आहे. सदर परतीच्या पावसामुळे २७.६५ हेक्टर वरील कपाशी, २ हेक्टरवरील तूर तर १२८.५० हेक्टरवरील सोयाबीन पिकाचे ३३ टक्केच्या आत नुकसान झाले आहे. तर १७ हेक्टरवरील कपाशी, २५.८० हेक्टरवरील सोयाबीन पिकाचे ३३ टक्केच्यावर नुकसान झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. एकूणच परतीच्या पावसाने वर्धा जिल्ह्यातील शेतकºयांचे कंबर्डे मोडले असून हवालदील झालेल्या शेतकºयांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे.सेलू तालुक्यात सर्वाधिक शेतकºयांचे नुकसानजिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविलेल्या प्राथमिक अहवालानुसार परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील एकूण ३१० शेतकºयांचे नुकसान झाले आहे. इतकेच नव्हे तर वर्धा तालुक्यातील ७१, सेलू तालुक्यातील १८०, देवळी तालुक्यातील १०, आर्वी व हिंगणघाट तालुक्यातील प्रत्येकी एक तर समुद्रपूर तालुक्यातील ४७ शेतकºयांचे नुकसान झाल्याचेही या अहवालात नमुद करण्यात आले आहे.एकूण ४३ गावे बाधितपरतीच्या पावसाचा जिल्ह्यातील एकूण ४३ गावांना फटका बसला आहे. यात वर्धा तालुक्यातील सात, सेलू तालुक्यातील सात, देवळी तालुक्यातील चार, आर्वी तालुक्यातील एक, हिंगणघाट तालुक्यातील एक तर समुद्रपूर तालुक्यातील २३ गावांचा समावेश आहे.