शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

निर्बंध हटविले; मात्र मास्क काढला तर मी पुन्हा येईन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2022 05:00 IST

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे नागरिक दहशतीत आले होते. तसेच तिसऱ्या लाटेचीही शक्यता निर्माण झाली होती. मात्र, आता कोरोना नियंत्रणात आल्याने राज्यातील सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर वर्धा शहरातील नागरिक बिनधास्त झाले असून विनामास्क वावरताना दिसून येत आहेत. इतकेच नव्हे तर सोशल डिस्टन्सिंग काय आहे, हे देखील नागरिक विसरल्याचे दिसते. त्यामुळे गाफील न राहता सतर्क राहा, अन्यथा पुन्हा कोरोना आपले पाय पसरविण्यास सुरुवात करण्याची भीती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एक एप्रिल रोजीपासून राज्यात कोरोना निर्बंध हटविण्यात आलेले आहेत. मात्र, नागरिक बिनधास्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे. अजूनही कोरोनाचे रुग्ण मिळून येत असल्याने कोरोना अद्याप पूर्णपणे गेला नसल्याने विनामास्क फिरल्यास लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र, आता पोलीस तसेच पालिका व महसूल प्रशासनाकडून होणारी कारवाई थंडावल्याचे दिसून येत आहे.     कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे नागरिक दहशतीत आले होते. तसेच तिसऱ्या लाटेचीही शक्यता निर्माण झाली होती. मात्र, आता कोरोना नियंत्रणात आल्याने राज्यातील सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर वर्धा शहरातील नागरिक बिनधास्त झाले असून विनामास्क वावरताना दिसून येत आहेत. इतकेच नव्हे तर सोशल डिस्टन्सिंग काय आहे, हे देखील नागरिक विसरल्याचे दिसते. त्यामुळे गाफील न राहता सतर्क राहा, अन्यथा पुन्हा कोरोना आपले पाय पसरविण्यास सुरुवात करण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध आणि सतर्क राहण्याची गरज आहे हे विशेष.

जिल्ह्यात सध्या ३ रुग्ण 

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रण आणण्यात आरोग्य विभागासह विविध विभागांना यश आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात रुग्णसंख्येतही घट आली आहे. सध्या जिल्ह्यात केवळ ३ ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

सण, उत्सव धडाक्यात पण मास्क वापरून

आगामी काळात सण, उत्सवांची मेजवानी आहे. अशातच सरकारने कोरोना निर्बंध हटविले असल्याने सर्वकाही पूर्वीसारखे झाले आहे. मात्र, सण, उत्सव साजरे करताना मास्क लावायचा विसर पडू देऊ नका.अन्यथा लागण होण्याचा धोका आहे.

जिल्ह्यात ९३ टक्के लसीकरणजिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला वेग आला असून ९३.३३ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला असून ६८.९८ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच आतापर्यंत ८.२५ टक्के लोकांनी बूस्टर डोस घेतल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त झाली आहे. अजूनही लसीकरण सुरुच आहे.

महसूल, पालिकेची कारवाई थंडावलीकोरोना विषाणूचा वाढता उद्रेक पाहता मागील दोन वर्ष महसूल विभागासह पालिकेच्या विविध पथकांनी तसेच पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग, विनामास्क तसेच कोरोना नियमांचे पालन करणाऱ्यांवर कारवाई करीत दंड ठोठावला. मात्र, आता कोरोना नियंत्रणात आल्याने पुन्हा विनामास्क वावर वाढला असताना कारवाई होताना दिसून येत नाही.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या