शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यिकांवर देश व समाज वाचविण्याची जबाबदारी

By admin | Updated: January 2, 2016 08:35 IST

पराक्रमी राजांचा इतिहास आपण अनेकदा वाचला आहे. पण या इतिहासात सामान्य माणसं कुठेही आढळत नाहीत. केवळ

वर्धा : पराक्रमी राजांचा इतिहास आपण अनेकदा वाचला आहे. पण या इतिहासात सामान्य माणसं कुठेही आढळत नाहीत. केवळ एखाद्या पराक्रमी राजाच्या राज्यात त्याची प्रजा सुखी होती, असेच उल्लेख वारंवार येतात. साहित्यामध्ये सामान्यांचे प्रतिबिंब उमटणे आवश्यक आहे. तसेच देश आणि समाज एकसंघ ठेवण्याची जबाबदारी साहित्यिकांनी घेणे आवश्यक आहे, मत व्यास पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ साहित्यिक चित्रा मद्गल यांनी व्यक्त केले. राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धाच्या वतीने ‘साहित्यकार का दायित्व’ या विषयावर आयोजित व्याख्यान कार्यक्रमात मुख्य वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला राष्ट्रभाषा प्रचार समितीचे प्रधानमंत्री प्रा. अनंतराम त्रिपाठी, कोषाध्यक्ष नवरतन नाहर, डॉ. हेमचंद वैद्य, यशोधरा मिश्र, छाया पाटील, डॉ. सूर्यभान रनसुभे आदींची उपस्थिती होती. यावेळी अरूणा देशमुख, कुसूम त्रिपाठी, अर्जून गायगोल, अशोक शुक्ला, नरेंद्र दंडारे, जयश्री पतकी, वामन कामडी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. मुद्गल म्हणाल्या, आज आपण परिवर्तनाच्या काळातून जात आहो. हा काळ कौटुंबिक समाज उद्ध्वस्त करणारा आहे. हीच परिस्थिती राहिल्यास देशाचे अंतर्गत तुकडे होण्यास वेळ लागणार नाही. अशा परिस्थितीत देशाला एकसंघ बनविण्यासाठी लेखकांनी पुढे येणे गरजेचे आहे. यानंतर ‘मिलीये रचनाकार से’ या कार्यक्रमात डॉ. हेमचंद्र वैद्य यांनी चित्रा मुदगल यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत सामाजिक प्रश्न आणि लेखकाची जबाबदारी यावर चर्चा झाली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. वैद्य यांनी केले. आभार नरेंद्र दंडारे यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. एस. कुमार काशिनाथ गावंडे, सुनिती बेंदुर, संजीवनी शुक्ला, वर्षा पुनवटकर, प्रा. शेख हाशम, प्राचार्य अशोक मेहरे आदी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)