शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

साहित्यिकांवर देश व समाज वाचविण्याची जबाबदारी

By admin | Updated: January 2, 2016 08:35 IST

पराक्रमी राजांचा इतिहास आपण अनेकदा वाचला आहे. पण या इतिहासात सामान्य माणसं कुठेही आढळत नाहीत. केवळ

वर्धा : पराक्रमी राजांचा इतिहास आपण अनेकदा वाचला आहे. पण या इतिहासात सामान्य माणसं कुठेही आढळत नाहीत. केवळ एखाद्या पराक्रमी राजाच्या राज्यात त्याची प्रजा सुखी होती, असेच उल्लेख वारंवार येतात. साहित्यामध्ये सामान्यांचे प्रतिबिंब उमटणे आवश्यक आहे. तसेच देश आणि समाज एकसंघ ठेवण्याची जबाबदारी साहित्यिकांनी घेणे आवश्यक आहे, मत व्यास पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ साहित्यिक चित्रा मद्गल यांनी व्यक्त केले. राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धाच्या वतीने ‘साहित्यकार का दायित्व’ या विषयावर आयोजित व्याख्यान कार्यक्रमात मुख्य वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला राष्ट्रभाषा प्रचार समितीचे प्रधानमंत्री प्रा. अनंतराम त्रिपाठी, कोषाध्यक्ष नवरतन नाहर, डॉ. हेमचंद वैद्य, यशोधरा मिश्र, छाया पाटील, डॉ. सूर्यभान रनसुभे आदींची उपस्थिती होती. यावेळी अरूणा देशमुख, कुसूम त्रिपाठी, अर्जून गायगोल, अशोक शुक्ला, नरेंद्र दंडारे, जयश्री पतकी, वामन कामडी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. मुद्गल म्हणाल्या, आज आपण परिवर्तनाच्या काळातून जात आहो. हा काळ कौटुंबिक समाज उद्ध्वस्त करणारा आहे. हीच परिस्थिती राहिल्यास देशाचे अंतर्गत तुकडे होण्यास वेळ लागणार नाही. अशा परिस्थितीत देशाला एकसंघ बनविण्यासाठी लेखकांनी पुढे येणे गरजेचे आहे. यानंतर ‘मिलीये रचनाकार से’ या कार्यक्रमात डॉ. हेमचंद्र वैद्य यांनी चित्रा मुदगल यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत सामाजिक प्रश्न आणि लेखकाची जबाबदारी यावर चर्चा झाली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. वैद्य यांनी केले. आभार नरेंद्र दंडारे यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. एस. कुमार काशिनाथ गावंडे, सुनिती बेंदुर, संजीवनी शुक्ला, वर्षा पुनवटकर, प्रा. शेख हाशम, प्राचार्य अशोक मेहरे आदी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)