शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

अहिंसेच्या दूताला आदरांजली

By admin | Updated: October 3, 2016 00:38 IST

येथील ऐतिहासिक सेवाग्राम आश्रमात रविवारी भरगच्च कार्यक्रमांनी शांती दूताला आदरांजली अर्पण करण्यात आली.

सेवाग्राम आश्रमात पर्यटकांची गर्दी : सायंकाळपर्यंत ३३ हजार मीटर सूत कताईसेवाग्राम : येथील ऐतिहासिक सेवाग्राम आश्रमात रविवारी भरगच्च कार्यक्रमांनी शांती दूताला आदरांजली अर्पण करण्यात आली. पहाटे सामूहिक प्रार्थनेने सुरू झालेल्या कार्यक्रमात दिवसभर सूतकताई, अतिथींचे मार्गदर्शन व शासनाच्या चित्रपट महोत्सवाचा समारोप झाला. सकाळपासून राबविण्यात आलेल्या सूतकताई यज्ञात सायंकाळपर्यंत ३३ हजार मिटर सूत कातण्यात आले. सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने महात्मा गांधी यांच्या १४७ व्या जयंतीदिनी आश्रमात एका विशेष कार्र्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यावरण तज्ज्ञ डॉ. विश्वंबर चौधरी यांची उपस्थिती होती. अतिथी म्हणून खा. रामदास तडस, शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, गांधी विचार परिषदचे डॉ. भरत महोदय, आश्रमचे मंत्री प्रा. डॉ. श्रीराम जाधव व माजी अध्यक्ष अ‍ॅड. मा. म. गडकरी उपस्थित होते. मान्यवरांचे सूतमाळेने स्वागत करून डॉ. अनिल काकोडकर व डॉ. विश्वंबर चौधरी यांना खादीची शाल, पुस्तक व चरखा भेट देण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. काकोडकर म्हणाले, गांधी आश्रमात आल्यानंतर नवीन काही तरी मिळते. तीन वर्षानंतर गांधीजींच्या १५० व्या जयंतीला आपण सामोरे जाणार आहो. देशभर नवीन कार्यक्रम, उपक्रम आणि यातून जनजागृती होण्यासह देशातील समस्यांची उकल करण्यासाठी गांधी विचारांचा आढावा घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. याच ठिकाणावरून सबंध देशाला जागृत करून स्वातंत्र्य चळवळ गांधीजींची प्रभावशाली केली. यामुळे गांधीजींची विचारसरणी आणि शांतीच्या मार्गानेच देशातील प्रश्न सुटणार असल्याचा विश्वास डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केला.अध्यक्षीय भाषणातून डॉ. विश्वंबर चौधरी यांनी महात्मा गांधी यांनी जसा विकासात शेवटच्या व्यक्तीचा विचार केला तसाच शासनाने करावा असे विचार व्यक्त केले. प्रास्ताविक जयवंत मठकर यांनी केले. संचालन डॉ. श्रीराम जाधव यांनी केले. आभार भरत महोदय यांनी मानले. कार्यक्रमाचा प्रारंभ वैष्णव जन तो या भजनाने झाला. बापू कुटी सेवाग्राम आश्रम भाग १ ते २ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आयोजित संपूर्ण कार्यक्रमात आश्रमाचे अधीक्षक भावेश चव्हाण, अशोक गिरी, बाबा खैरकार, शंकर बगाडे, गजानन अंबुलकर, नामदेव ढोले, सुधाकर झाडे, सागर कोल्हे, अरूण लेले, भैय्या मशानकर, प्रदीप उगले, ज्ञानेश्वर रेंगे, अनिल देवतळे, नामदेव पाटील, जालंधर नाथ, अतुल शर्मा, हनुमान पिसुर्डे, सुचित्रा झाडे, संगिता चव्हाण, बघेल, माधुरी भोंगे, प्रभू शहाणे, भावना डगवार, प्रशांत ताकसांडे, आकाश लोखंडे, सिद्धेश्वर कंबरकर, सचिन हुडे इत्यादीसह शाळा महाविद्यालय विद्यार्थी व मोठ्या संख्येने नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.(वार्ताहर)पालकमंत्र्यांनी केली चरख्यांची पाहणीगांधी जयंतीदिनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सेवाग्राम आश्रमात हजेरी लावली. प्रार्थना करीत बापूंना आदरांजली अर्पण केली. त्यांच्या उपस्थितीत नई तालीम परिसरात सुरू असलेल्या चित्रपट महोत्सवाचा समारोप करण्यात आला. प्रार्थनेच्यावेळी ना. मुनगंटीवार यांच्यासह हिंगणघाट - समुद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार, आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी व आश्रमातील साधकांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी आश्रमात सुरू असलेल्या कताईदरम्यान चरख्यांची माहिती घेतली.