शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
2
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
3
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
5
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
6
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
7
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
9
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
10
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
11
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
12
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
13
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
14
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
15
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
16
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
17
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
18
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
19
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
20
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   

अहिंसेच्या दूताला आदरांजली

By admin | Updated: October 3, 2016 00:38 IST

येथील ऐतिहासिक सेवाग्राम आश्रमात रविवारी भरगच्च कार्यक्रमांनी शांती दूताला आदरांजली अर्पण करण्यात आली.

सेवाग्राम आश्रमात पर्यटकांची गर्दी : सायंकाळपर्यंत ३३ हजार मीटर सूत कताईसेवाग्राम : येथील ऐतिहासिक सेवाग्राम आश्रमात रविवारी भरगच्च कार्यक्रमांनी शांती दूताला आदरांजली अर्पण करण्यात आली. पहाटे सामूहिक प्रार्थनेने सुरू झालेल्या कार्यक्रमात दिवसभर सूतकताई, अतिथींचे मार्गदर्शन व शासनाच्या चित्रपट महोत्सवाचा समारोप झाला. सकाळपासून राबविण्यात आलेल्या सूतकताई यज्ञात सायंकाळपर्यंत ३३ हजार मिटर सूत कातण्यात आले. सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने महात्मा गांधी यांच्या १४७ व्या जयंतीदिनी आश्रमात एका विशेष कार्र्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यावरण तज्ज्ञ डॉ. विश्वंबर चौधरी यांची उपस्थिती होती. अतिथी म्हणून खा. रामदास तडस, शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, गांधी विचार परिषदचे डॉ. भरत महोदय, आश्रमचे मंत्री प्रा. डॉ. श्रीराम जाधव व माजी अध्यक्ष अ‍ॅड. मा. म. गडकरी उपस्थित होते. मान्यवरांचे सूतमाळेने स्वागत करून डॉ. अनिल काकोडकर व डॉ. विश्वंबर चौधरी यांना खादीची शाल, पुस्तक व चरखा भेट देण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. काकोडकर म्हणाले, गांधी आश्रमात आल्यानंतर नवीन काही तरी मिळते. तीन वर्षानंतर गांधीजींच्या १५० व्या जयंतीला आपण सामोरे जाणार आहो. देशभर नवीन कार्यक्रम, उपक्रम आणि यातून जनजागृती होण्यासह देशातील समस्यांची उकल करण्यासाठी गांधी विचारांचा आढावा घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. याच ठिकाणावरून सबंध देशाला जागृत करून स्वातंत्र्य चळवळ गांधीजींची प्रभावशाली केली. यामुळे गांधीजींची विचारसरणी आणि शांतीच्या मार्गानेच देशातील प्रश्न सुटणार असल्याचा विश्वास डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केला.अध्यक्षीय भाषणातून डॉ. विश्वंबर चौधरी यांनी महात्मा गांधी यांनी जसा विकासात शेवटच्या व्यक्तीचा विचार केला तसाच शासनाने करावा असे विचार व्यक्त केले. प्रास्ताविक जयवंत मठकर यांनी केले. संचालन डॉ. श्रीराम जाधव यांनी केले. आभार भरत महोदय यांनी मानले. कार्यक्रमाचा प्रारंभ वैष्णव जन तो या भजनाने झाला. बापू कुटी सेवाग्राम आश्रम भाग १ ते २ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आयोजित संपूर्ण कार्यक्रमात आश्रमाचे अधीक्षक भावेश चव्हाण, अशोक गिरी, बाबा खैरकार, शंकर बगाडे, गजानन अंबुलकर, नामदेव ढोले, सुधाकर झाडे, सागर कोल्हे, अरूण लेले, भैय्या मशानकर, प्रदीप उगले, ज्ञानेश्वर रेंगे, अनिल देवतळे, नामदेव पाटील, जालंधर नाथ, अतुल शर्मा, हनुमान पिसुर्डे, सुचित्रा झाडे, संगिता चव्हाण, बघेल, माधुरी भोंगे, प्रभू शहाणे, भावना डगवार, प्रशांत ताकसांडे, आकाश लोखंडे, सिद्धेश्वर कंबरकर, सचिन हुडे इत्यादीसह शाळा महाविद्यालय विद्यार्थी व मोठ्या संख्येने नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.(वार्ताहर)पालकमंत्र्यांनी केली चरख्यांची पाहणीगांधी जयंतीदिनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सेवाग्राम आश्रमात हजेरी लावली. प्रार्थना करीत बापूंना आदरांजली अर्पण केली. त्यांच्या उपस्थितीत नई तालीम परिसरात सुरू असलेल्या चित्रपट महोत्सवाचा समारोप करण्यात आला. प्रार्थनेच्यावेळी ना. मुनगंटीवार यांच्यासह हिंगणघाट - समुद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार, आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी व आश्रमातील साधकांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी आश्रमात सुरू असलेल्या कताईदरम्यान चरख्यांची माहिती घेतली.