शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा संकल्प

By admin | Updated: August 17, 2015 02:11 IST

केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात धान्याचे वितरण, सौर ऊर्जा पंपाच्या माध्यमातून सिंचनाचा लाभ तसेच जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून ....

अनेकांचा सत्कार : मुख्य समारंभात जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते ध्वजारोहणवर्धा : केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात धान्याचे वितरण, सौर ऊर्जा पंपाच्या माध्यमातून सिंचनाचा लाभ तसेच जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून शेतीला संबंधीत सिंचनाचा लाभ अगदी योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचा संकल्प जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी स्वातंत्र्यदिनी सोडला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणावर भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभात ध्वजारोहण नंतर ते बोलत होते. जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य करणारे उद्योजक, विविध शैक्षणिक उपक्रमात प्राविण्य मिळणारे विद्यार्थी तसेच वनसंवर्धनासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तीचा त्यासोबतच सिंदी (रेल्वे) येथील पुरात वाहून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीवाची परवा न करता प्राण वाचविल्याबद्दल वैभव रामेश्वर घंगारे याला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मिणा, अपर जिल्हाधिकारी संजय भागवत उपस्थित होते. राज्यातील १४ जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनापासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्य पुरवठा तसेच आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याच्या योजनेच्या प्रसिद्धी अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवाई, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर व महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता शंकर कांबळे यांची उपस्थिती होती.जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी ध्वजारोहण करून सलामी दिली. त्यानंतर सशस्त्र पोलीस दलाची मानवंदना स्विकारली. या कार्यक्रमात लघु उद्योजकांना जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत हिंगणघाट तालुक्यातील आजंती येथील आर.के. इंडस्ट्रीजला रोख १५ हजार शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह देवून प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. तर वर्धा येथील प्रसून इंडस्ट्रीजला रोख रक्कम १० हजार, श्रीफळ आणि मानचिन्ह देवून द्वितीय पुरस्काराने गौरविण्यात आले. वनविभागातील सन २०१४-१५ या आर्थिक वर्षातील जिल्हास्तरावरील संत तुकाराम वनग्राम योजनेंतर्गत खरांगणा आणि आष्टी वनपरिक्षेत्रातील अनुक्रमे बोरगाव व टुमनी यांना विभागून प्रथम पुरस्कार ५१ हजार व प्रमाणपत्र, तळेगाव वनपरिक्षेत्रातील इंदरमारी समितीस द्वितीय पुरस्कार ३१ हजार रुपये प्रमाणपत्र, तृतीय पुरस्कार खरांगणा व समुद्रपूर वनपरिक्षेत्रातील लादगड व दसोडा समितीस ११ हजार रुपये व प्रमाणपत्र देऊन जिल्हाधिकारी यांच्याहस्ते गौरविण्यात आले.माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परिक्षेत राज्यस्तरावरील गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करणाऱ्या सावंगीच्या स्कूल आॅफ स्कॉलर शाळेचे श्लोक राजेश इंगळे व ऋषी दिनेश असोपा यांनाही प्रशस्तीपत्र देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी गौरविले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अजय येते व ज्योती भगत यांनी केले.(प्रतिनिधी)सिंदी (रेल्वे) च्या युवकाचा सत्कारसिंदी (रेल्वे) येथील पुरात वाहून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीवाची परवा न करता प्राण वाचविल्याबद्दल वैभव रामेश्वर घंगारे याला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमात लघु उद्योजकांना जिल्हा पुरस्कार देण्यात आले आहे.वनविभागातील सन २०१४-१५ या आर्थिक वर्षातील जिल्हास्तरावरील संत तुकाराम वनग्राम योजनेंतर्गत खरांगणा आणि आष्टी वनपरिक्षेत्रातील अनुक्रमे बोरगाव व टुमनी यांना विभागून प्रथम पुरस्कार ५१ हजार व प्रमाणपत्र, तळेगाव वनपरिक्षेत्रातील इंदरमारी समितीस द्वितीय पुरस्कार ३१ हजार रुपये प्रमाणपत्र, तृतीय पुरस्कार खरांगणा व समुद्रपूर वनपरिक्षेत्रातील लादगड व दसोडा समितीस ११ हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात आला.