शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

समन्वय व संवादातून ग्राहकांच्या समस्या सोडवा

By admin | Updated: September 21, 2015 01:59 IST

ग्राहकांच्या हिताचे, समस्यांचे निराकरण समन्वय आणि संवादामधून तात्काळ करण्यात यावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी केले.

संजय भागवत : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठकवर्धा : ग्राहकांच्या हिताचे, समस्यांचे निराकरण समन्वय आणि संवादामधून तात्काळ करण्यात यावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी केले. भागवत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात पार पडली. बैठकीला ज्ञानेश्वर ढगे, सुरेश ठाकरे, अ‍ॅड. संध्या पुरेकर, किशोर मुटे, अजय भोयर, विलास कांबळे, श्याम अमनेरकर, डॉ. ना. ना. बेहरे, प्रणव जोशी, संजय बाळबुधे यांच्यासह वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता शंकर कांबळे उपस्थित होते. बैठकीला सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकार यांनी इतिवृत्ताचे वाचन केले. त्यावर सर्व सदस्यांनी विविध विषयांवर त्यांची मते मांडली. महापारेषण संबंधातील विविध प्रश्नांवर अधीक्षक अभियंता यांनी अशासकीय सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देवून करावयाच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने विभागातील अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले.जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी विभागातील डॉक्टरांच्या रिक्त पदांबाबत माहिती देऊन पुढील काळात या दिशेने कार्यवाही होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने मागील कार्यकाळात केलेल्या कार्यवाहीबाबत सभासदांना अवगत केले. कृषी विभागाशी संबंधित विषयावर पुढील सभेत सादरीकरण करण्यात येणार आहे. दरमहा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक घेण्याचेही निर्देश अपर जिल्हाधिकारी यांनी दिले. सर्वच विभाग प्रमुखांनी चर्चेस आलेल्या मुद्यांवर अनुपालन अहवाल सादर करावा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी दिले. वर्धा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद ग्राहकांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा करून समन्वयातून तोडगा काढण्याचे व्यासपीठ असल्याने जिल्ह्यातील पोलीस, जिल्हा परिषद, अन्न व औषध प्रशासन विभाग, दूरसंचार, परिवहन विभाग व जिल्हा माहिती कार्यालयातील कार्यालयीन प्रमुखांचा समावेश आहे. एकूण २७ अशासकीय सदस्यांची नियुक्ती पूर्ण करण्यात आली आहे. आभार जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवाई यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)