शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रेतीघाट लिलावाविरूद्ध ग्रामसभेत ठराव

By admin | Updated: January 18, 2015 23:16 IST

वडगाव (पांडे) येथील ग्रामस्थांनी वर्धा नदीवरील वडगाव, दिघी, सायखेडा परिसरातील चार रेतीघाटांचे लिलाव करू नये, अशी मागणी ग्रामसभेच्या ठरावासह निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

रोहणा : वडगाव (पांडे) येथील ग्रामस्थांनी वर्धा नदीवरील वडगाव, दिघी, सायखेडा परिसरातील चार रेतीघाटांचे लिलाव करू नये, अशी मागणी ग्रामसभेच्या ठरावासह निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. असे असताना या घाटांचे लिलाव २० जानेवारी रोजी होणार असल्याचे समजल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे़ वडगाव (पांडे) या गावाजवळून वर्धा नदी वाहते. या परिसरात नदीवर वडगाव, दिघी, सायखेडा व रिठगाव असे चार रेतीघाट आहेत. गावाच्या वरच्या भागाला निम्न व ऊर्ध्व वर्धा, अशी दोन धरणे आहेत. दरवर्षी सदर घाटांचे लिलाव होत असून रेती उत्खननामुळे नदीचे पात्र खोल झाले आहे. नदीची गावालगतची थडीही अत्यंत कमकुवत झाली आहे. पूर परिस्थितीत धरणातील पाणी नदी पात्रात सोडल्यास नदी पात्र बदलून गावात शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय रेतीच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीने गावातील मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावरून वाहने तर दूरच शाळकरी मुले व वृद्धांना पायी चालणेही कठिण झाले आहे. सदर घाटांचा लिलाव होऊ नये म्हणून वडगाव पांडे ग्रा़पं़ ने १५ आॅगस्ट २०१४ रोजी ग्रामसभेत ठराव पारित केला. २३ नोव्हेंबर २०१४ रोजी उपविभागीय अधिकारी आर्वी यांनी घेतलेल्या विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी पुन्हा घाटांचे लिलाव करू नये, असा ठराव मंजूर केला. यात रेती उपस्यामुळे नदी खोल होऊन परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी खोल गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना सिंचन करणे कठिण झाल्याचे नमूद आहे़ पावसाळ्यात गावात पाणी शिरल्यास अनर्थ होण्याची भीती व्यक्त केली असताना लिलाव होत असल्याने रोष व्यक्त होत आहे़(वार्ताहर)