शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
3
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
4
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
5
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
6
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
7
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
8
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
9
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
10
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
11
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
12
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
13
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
14
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
15
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
17
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
18
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
19
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
20
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
Daily Top 2Weekly Top 5

जलाशय हाऊसफुल्ल, उत्साह हवा; पण उन्माद नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:03 IST

वरुणराजाने उशिरा का होईना कृपादृष्टी ठेवल्याने सध्या जलाशयाची पाणीपातळी चांगलीच वाढली आहे. काही फुल्ल झाले असून सांडव्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे अनेकांमध्ये उत्साह संचारला असून सेल्फी काढून सोशल मिडीयावर पोस्ट करीत आहे. पण, या पाण्याचा उन्माद न करता काटकसरीने वापर करण्याची गरज व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देधाम प्रकल्प ओव्हरफ्लो : जलसंकट टळले तरी बचतीसाठी पुढाकार घेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गेल्यावर्षीच्या अल्प पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा चांगल्याच तीव्र झाल्या होत्या. जलाशयातील मृतसाठाही संपुष्ठात आला होता. पण, वरुणराजाने उशिरा का होईना कृपादृष्टी ठेवल्याने सध्या जलाशयाची पाणीपातळी चांगलीच वाढली आहे. काही फुल्ल झाले असून सांडव्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे अनेकांमध्ये उत्साह संचारला असून सेल्फी काढून सोशल मिडीयावर पोस्ट करीत आहे. पण, या पाण्याचा उन्माद न करता काटकसरीने वापर करण्याची गरज व्यक्त होत आहे.जिल्ह्यात मोठे व मध्यम असे एकूण ११ जलाशय आहेत. गेल्यावर्षी या सर्व जलाशयामध्ये आजच्या दिवसापर्यंत २००.४७ दलघमी जलसाठा उपलब्ध होता.परंतु, यावर्षी या सर्व जलाशयामध्ये ३१२. ८८ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. यावरुन मागच्या वर्षीपेक्षा यंदा उशिरा का होईना पण, जलसाठ्यात बऱ्यापैकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. धाम प्रकल्प हा सर्वात महत्वाचा असून या प्रकल्पातून वर्ध्यासह तेरा गावांना पाणीपुरवठा होतो. तसेच रेल्वे प्रशासन, उद्योग व सेवाग्राम एमआयडीसीलाही पाणीपुरवठा केल्या जातो. मागील वर्षी अल्प पर्जन्यमानामुळे या प्रकल्पात केवळ ५५ टक्केच पाणी उपलब्ध होते. त्यामुळे उन्हाळ्यात सर्व गावांनाच पाण्याचा फटका बसला. शहरासह गावांना आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. या जलाशातील मृतसाठाही उपसण्यापर्यंत भीषणता निर्माण झाली होती.वैद्यकीय जनजागृती मंचासह नगरपालिकेनेही पुढाकार घेत नागरिकांना पाणी बचतीसाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. बऱ्याच नागरिकांनी व सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत उपाययोजनाही केल्यात. अशातच दमदार पावसामुळे धामप्रकल्प शंभर टक्के भरला असून ओव्हर फ्लो होत आहे. यासोबतच पोथरा प्रकल्प, पंचधारा, डोंगरगाव प्रकल्प,मदन उन्नई प्रकल्प, वर्धा कारनदी प्रकल्प व सुकळी लघू प्रकल्पही फुल्ल झाला असून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जलशय भरुन पाण्याचा होणारा विसर्ग पाहण्याकरिता नागरिकांची गर्दी होत आहे.सध्याची पाण्याची स्थिती मागील वर्षीपेक्षा भक्कम असल्याने पाणी बचतीकडे पाठ फिरवून पाण्याचे वारेमाप उधळपट्टी करु नये. यावर्षी सहन केलेल्या त्रासाचा विचार करुन ‘जल है तो कल है’ हीच मानसिकता पुढेही कायम ठेवण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Damधरण