शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

जलाशय हाऊसफुल्ल, उत्साह हवा; पण उन्माद नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:03 IST

वरुणराजाने उशिरा का होईना कृपादृष्टी ठेवल्याने सध्या जलाशयाची पाणीपातळी चांगलीच वाढली आहे. काही फुल्ल झाले असून सांडव्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे अनेकांमध्ये उत्साह संचारला असून सेल्फी काढून सोशल मिडीयावर पोस्ट करीत आहे. पण, या पाण्याचा उन्माद न करता काटकसरीने वापर करण्याची गरज व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देधाम प्रकल्प ओव्हरफ्लो : जलसंकट टळले तरी बचतीसाठी पुढाकार घेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गेल्यावर्षीच्या अल्प पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा चांगल्याच तीव्र झाल्या होत्या. जलाशयातील मृतसाठाही संपुष्ठात आला होता. पण, वरुणराजाने उशिरा का होईना कृपादृष्टी ठेवल्याने सध्या जलाशयाची पाणीपातळी चांगलीच वाढली आहे. काही फुल्ल झाले असून सांडव्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे अनेकांमध्ये उत्साह संचारला असून सेल्फी काढून सोशल मिडीयावर पोस्ट करीत आहे. पण, या पाण्याचा उन्माद न करता काटकसरीने वापर करण्याची गरज व्यक्त होत आहे.जिल्ह्यात मोठे व मध्यम असे एकूण ११ जलाशय आहेत. गेल्यावर्षी या सर्व जलाशयामध्ये आजच्या दिवसापर्यंत २००.४७ दलघमी जलसाठा उपलब्ध होता.परंतु, यावर्षी या सर्व जलाशयामध्ये ३१२. ८८ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. यावरुन मागच्या वर्षीपेक्षा यंदा उशिरा का होईना पण, जलसाठ्यात बऱ्यापैकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. धाम प्रकल्प हा सर्वात महत्वाचा असून या प्रकल्पातून वर्ध्यासह तेरा गावांना पाणीपुरवठा होतो. तसेच रेल्वे प्रशासन, उद्योग व सेवाग्राम एमआयडीसीलाही पाणीपुरवठा केल्या जातो. मागील वर्षी अल्प पर्जन्यमानामुळे या प्रकल्पात केवळ ५५ टक्केच पाणी उपलब्ध होते. त्यामुळे उन्हाळ्यात सर्व गावांनाच पाण्याचा फटका बसला. शहरासह गावांना आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. या जलाशातील मृतसाठाही उपसण्यापर्यंत भीषणता निर्माण झाली होती.वैद्यकीय जनजागृती मंचासह नगरपालिकेनेही पुढाकार घेत नागरिकांना पाणी बचतीसाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. बऱ्याच नागरिकांनी व सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत उपाययोजनाही केल्यात. अशातच दमदार पावसामुळे धामप्रकल्प शंभर टक्के भरला असून ओव्हर फ्लो होत आहे. यासोबतच पोथरा प्रकल्प, पंचधारा, डोंगरगाव प्रकल्प,मदन उन्नई प्रकल्प, वर्धा कारनदी प्रकल्प व सुकळी लघू प्रकल्पही फुल्ल झाला असून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जलशय भरुन पाण्याचा होणारा विसर्ग पाहण्याकरिता नागरिकांची गर्दी होत आहे.सध्याची पाण्याची स्थिती मागील वर्षीपेक्षा भक्कम असल्याने पाणी बचतीकडे पाठ फिरवून पाण्याचे वारेमाप उधळपट्टी करु नये. यावर्षी सहन केलेल्या त्रासाचा विचार करुन ‘जल है तो कल है’ हीच मानसिकता पुढेही कायम ठेवण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Damधरण