शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जलाशय हाऊसफुल्ल, उत्साह हवा; पण उन्माद नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:03 IST

वरुणराजाने उशिरा का होईना कृपादृष्टी ठेवल्याने सध्या जलाशयाची पाणीपातळी चांगलीच वाढली आहे. काही फुल्ल झाले असून सांडव्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे अनेकांमध्ये उत्साह संचारला असून सेल्फी काढून सोशल मिडीयावर पोस्ट करीत आहे. पण, या पाण्याचा उन्माद न करता काटकसरीने वापर करण्याची गरज व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देधाम प्रकल्प ओव्हरफ्लो : जलसंकट टळले तरी बचतीसाठी पुढाकार घेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गेल्यावर्षीच्या अल्प पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा चांगल्याच तीव्र झाल्या होत्या. जलाशयातील मृतसाठाही संपुष्ठात आला होता. पण, वरुणराजाने उशिरा का होईना कृपादृष्टी ठेवल्याने सध्या जलाशयाची पाणीपातळी चांगलीच वाढली आहे. काही फुल्ल झाले असून सांडव्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे अनेकांमध्ये उत्साह संचारला असून सेल्फी काढून सोशल मिडीयावर पोस्ट करीत आहे. पण, या पाण्याचा उन्माद न करता काटकसरीने वापर करण्याची गरज व्यक्त होत आहे.जिल्ह्यात मोठे व मध्यम असे एकूण ११ जलाशय आहेत. गेल्यावर्षी या सर्व जलाशयामध्ये आजच्या दिवसापर्यंत २००.४७ दलघमी जलसाठा उपलब्ध होता.परंतु, यावर्षी या सर्व जलाशयामध्ये ३१२. ८८ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. यावरुन मागच्या वर्षीपेक्षा यंदा उशिरा का होईना पण, जलसाठ्यात बऱ्यापैकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. धाम प्रकल्प हा सर्वात महत्वाचा असून या प्रकल्पातून वर्ध्यासह तेरा गावांना पाणीपुरवठा होतो. तसेच रेल्वे प्रशासन, उद्योग व सेवाग्राम एमआयडीसीलाही पाणीपुरवठा केल्या जातो. मागील वर्षी अल्प पर्जन्यमानामुळे या प्रकल्पात केवळ ५५ टक्केच पाणी उपलब्ध होते. त्यामुळे उन्हाळ्यात सर्व गावांनाच पाण्याचा फटका बसला. शहरासह गावांना आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. या जलाशातील मृतसाठाही उपसण्यापर्यंत भीषणता निर्माण झाली होती.वैद्यकीय जनजागृती मंचासह नगरपालिकेनेही पुढाकार घेत नागरिकांना पाणी बचतीसाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. बऱ्याच नागरिकांनी व सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत उपाययोजनाही केल्यात. अशातच दमदार पावसामुळे धामप्रकल्प शंभर टक्के भरला असून ओव्हर फ्लो होत आहे. यासोबतच पोथरा प्रकल्प, पंचधारा, डोंगरगाव प्रकल्प,मदन उन्नई प्रकल्प, वर्धा कारनदी प्रकल्प व सुकळी लघू प्रकल्पही फुल्ल झाला असून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जलशय भरुन पाण्याचा होणारा विसर्ग पाहण्याकरिता नागरिकांची गर्दी होत आहे.सध्याची पाण्याची स्थिती मागील वर्षीपेक्षा भक्कम असल्याने पाणी बचतीकडे पाठ फिरवून पाण्याचे वारेमाप उधळपट्टी करु नये. यावर्षी सहन केलेल्या त्रासाचा विचार करुन ‘जल है तो कल है’ हीच मानसिकता पुढेही कायम ठेवण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Damधरण