शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

वर्ध्यात कडूनिंबाच्या तीन रोपट्यांवर होतेय संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 16:49 IST

वातावरणातील बदलाचा प्रत्येक प्राणीमात्रावर थोडा का होईना, परिणाम होत असल्याचे वास्तव आहे. असेच काहीसे बदल वर्धा जिल्ह्यातील कडूनिंबाच्या झाडावर आढळून आले आहेत.

ठळक मुद्देदेशातील पहिला प्रयोगबदल आढळल्यानंतर तज्ज्ञ करताय शहानिशा

महेश सायखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वातावरणातील बदलाचा प्रत्येक प्राणीमात्रावर थोडा का होईना, परिणाम होत असल्याचे वास्तव आहे. असेच काहीसे बदल वर्धा जिल्ह्यातील कडूनिंबाच्या झाडावर आढळून आले आहेत. त्या झाडाच्या फळातून तीन रोपटे तयार करण्यात आले असून त्या रोपट्यांवर सध्या संशोधन केले जात आहे. कडूनिंब हे औषधी वृक्ष असून त्यात काही बदल तर झाले नाही ना, याची पडताळणी सध्या तज्ज्ञांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे, हा देशातील पहिला प्रयोग असल्याचे सांगण्यात आले.प्राप्त माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील कडूनिंबाच्या काही झाडांवर वातावरणाच्या बदलाचे परिणाम झाल्याचे वन विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आढळून आले. ही बाब लक्षात येताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. सदर माहिती मिळताच फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट देहरादूनचे प्लान्ट जिनेस्टिक तथा शास्त्रज्ञ डॉ. रमाकांत यांनी वर्धा गाठले. सुमारे दोन दिवस त्यांनी वर्धा येथे थांबून वातावरणातील बदलाचे परिणाम दिसून आलेल्या झाडांची पाहणी केली. शिवाय काही मार्गदर्शक सूचनाही वनविभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. त्यानंतर याच बदल दिसलेल्या कडूनिंबाच्या झाडाच्या फळापासून तीन रोप तयार करण्यात आले. त्याचे डीएनए नमुनेही त्यांनी तपासणीसाठी नेले आहे. डीएनए चाचणीतून सदर कडूनिंबाच्या झाडातील औषधी गुणधर्मात काही बदल झाला काय, याची पडताळणी केली जाणार आहे. इतकेच नव्हे, तर अधिकची माहिती जाणून घेतली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

वन विभागाच्या कार्यालय परिसरात लावले रोपटे१५ मे ला गोळा केलेले बी ७ जून रोजी लावण्यात आले. त्यानंतर योग्य पद्धतीने निगा घेतल्यानंतर बीजही अंकुरले. शिवाय रोपट्याची वाढही बºयापैकी झाली. हेच तीन रोपटे वन विभागाच्या वर्धा कार्यालयाच्या आवारात उपवनसंरक्षक सुनील शर्मा, वन्य जीव प्रतिपालक कौशल मिश्र यांच्या मार्गदर्शनात वन परिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड यांच्या प्रमुख उपस्थितीत लावण्यात आले आहे. केवळ रोपटे लावून वर्धा विभाग थांबला नसून त्या रोपट्याचे संगोपनही त्यांच्याकडून केले जात आहे.

टॅग्स :environmentपर्यावरण