शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

वर्ध्यात कडूनिंबाच्या तीन रोपट्यांवर होतेय संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 16:49 IST

वातावरणातील बदलाचा प्रत्येक प्राणीमात्रावर थोडा का होईना, परिणाम होत असल्याचे वास्तव आहे. असेच काहीसे बदल वर्धा जिल्ह्यातील कडूनिंबाच्या झाडावर आढळून आले आहेत.

ठळक मुद्देदेशातील पहिला प्रयोगबदल आढळल्यानंतर तज्ज्ञ करताय शहानिशा

महेश सायखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वातावरणातील बदलाचा प्रत्येक प्राणीमात्रावर थोडा का होईना, परिणाम होत असल्याचे वास्तव आहे. असेच काहीसे बदल वर्धा जिल्ह्यातील कडूनिंबाच्या झाडावर आढळून आले आहेत. त्या झाडाच्या फळातून तीन रोपटे तयार करण्यात आले असून त्या रोपट्यांवर सध्या संशोधन केले जात आहे. कडूनिंब हे औषधी वृक्ष असून त्यात काही बदल तर झाले नाही ना, याची पडताळणी सध्या तज्ज्ञांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे, हा देशातील पहिला प्रयोग असल्याचे सांगण्यात आले.प्राप्त माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील कडूनिंबाच्या काही झाडांवर वातावरणाच्या बदलाचे परिणाम झाल्याचे वन विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आढळून आले. ही बाब लक्षात येताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. सदर माहिती मिळताच फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट देहरादूनचे प्लान्ट जिनेस्टिक तथा शास्त्रज्ञ डॉ. रमाकांत यांनी वर्धा गाठले. सुमारे दोन दिवस त्यांनी वर्धा येथे थांबून वातावरणातील बदलाचे परिणाम दिसून आलेल्या झाडांची पाहणी केली. शिवाय काही मार्गदर्शक सूचनाही वनविभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. त्यानंतर याच बदल दिसलेल्या कडूनिंबाच्या झाडाच्या फळापासून तीन रोप तयार करण्यात आले. त्याचे डीएनए नमुनेही त्यांनी तपासणीसाठी नेले आहे. डीएनए चाचणीतून सदर कडूनिंबाच्या झाडातील औषधी गुणधर्मात काही बदल झाला काय, याची पडताळणी केली जाणार आहे. इतकेच नव्हे, तर अधिकची माहिती जाणून घेतली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

वन विभागाच्या कार्यालय परिसरात लावले रोपटे१५ मे ला गोळा केलेले बी ७ जून रोजी लावण्यात आले. त्यानंतर योग्य पद्धतीने निगा घेतल्यानंतर बीजही अंकुरले. शिवाय रोपट्याची वाढही बºयापैकी झाली. हेच तीन रोपटे वन विभागाच्या वर्धा कार्यालयाच्या आवारात उपवनसंरक्षक सुनील शर्मा, वन्य जीव प्रतिपालक कौशल मिश्र यांच्या मार्गदर्शनात वन परिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड यांच्या प्रमुख उपस्थितीत लावण्यात आले आहे. केवळ रोपटे लावून वर्धा विभाग थांबला नसून त्या रोपट्याचे संगोपनही त्यांच्याकडून केले जात आहे.

टॅग्स :environmentपर्यावरण