शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

टायर जाळून नोंदविला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 23:31 IST

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने सिव्हील लाईन भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आला असता आंदोलनकर्त्यांनी टायर जाळून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला.

ठळक मुद्देप्रहारचे जेलभरो आंदोलन : मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने सिव्हील लाईन भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आला असता आंदोलनकर्त्यांनी टायर जाळून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनकर्त्यांनी स्वत:ला अटक करून घेतली.शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी. पीक विम्याची रक्कम तातडीने द्यावी. शेतकºयांची फसवणूक करणाºया बियाणे कंपनीवर कार्यवाही करून नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत देण्यात यावी. शेतीच्या पेरणी ते कापणीपर्यंत कामांचा समावेश मनरेगा अंतर्गत करावा. घोषित झालेल्या दुष्काळग्रस्तांना दुष्काळी अनुदान द्यावे. शिवाय त्या भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे. ओबीसीसाठी स्वतंत्र घरकूल योजना करून आर्थिक तरतूद करावी. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह निर्माण करावे. आदिवासींचे प्रलंबित वनहक्क, जमीन पट्टे त्वरित वाटप करावे. स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत शेतमजूर व कामगारांचा समावेश करण्यात यावा. कांदा, तूर, ऊस उत्पादकांना जाहीर केलेले अनुदान तातडीने देण्यात यावे. नुकसानग्रस्त फळ उत्पादक शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यात यावी. दुबार पेरणीधारकांना तातडीने बियाणे खते, किटकनाशके व आर्थिक मदत द्यावी. प्रकल्पग्रस्तांना पूनर्वसन मोबदला व नौकरी द्यावी. निराधार, विधवांना दहा हजार रुपये देण्यात यावे आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चा न्यायालयाच्या मुख्य द्वारासमोर आला असता आंदोलकर्त्यांनी टायर जाळून शासनाच्या दुर्लक्षीत धोरणांचा निषेध नोंदविला. यावेळी जोरदार नारेबाजीही करण्यात आली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले. या आंदोलनाचे नेतृत्त्व आ. बच्चू कडू, प्रहारचे जिल्हा प्रमुख विकास दांडगे, रसूलाबादचे सरपंच राजेश सावरकर यांनी केले. आंदोलनात प्रितम कातकिडे, रेवत इंगळे, दिनेश पोपळकर, मिलिंद गव्हाणे, भुषण येलेकार, आदित्या कोकडवार, हनुमंत झोटींग, धनराज घुमे आदी सहभागी झाले होते.उपजिल्हाधिकाऱ्यांना धरले धारेवरवर्धा जिल्ह्यातील किती गाव, किती महसूल मंडळ दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहे. शिवाय त्यासाठी किती निधीची मागणी असून तसा प्रस्ताव सरकारला पाठविण्यात आला काय, अशी विचारणा करीत आ. बच्चू कडू यांनी निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांना चांगलेच धारेवर धरले होते. ज्यानंतर बनकर यांनी तातडीने संबंधित अधिकारी अतुल रासपायले यांना बोलाविले. त्यांनीही वेळीच कार्यवाही न केल्याचे लक्षात येताच आ. कडू यांनी त्यांचीही कानउघाडणी केली.

टॅग्स :Morchaमोर्चा