शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

टायर जाळून नोंदविला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 23:31 IST

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने सिव्हील लाईन भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आला असता आंदोलनकर्त्यांनी टायर जाळून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला.

ठळक मुद्देप्रहारचे जेलभरो आंदोलन : मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने सिव्हील लाईन भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आला असता आंदोलनकर्त्यांनी टायर जाळून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनकर्त्यांनी स्वत:ला अटक करून घेतली.शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी. पीक विम्याची रक्कम तातडीने द्यावी. शेतकºयांची फसवणूक करणाºया बियाणे कंपनीवर कार्यवाही करून नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत देण्यात यावी. शेतीच्या पेरणी ते कापणीपर्यंत कामांचा समावेश मनरेगा अंतर्गत करावा. घोषित झालेल्या दुष्काळग्रस्तांना दुष्काळी अनुदान द्यावे. शिवाय त्या भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे. ओबीसीसाठी स्वतंत्र घरकूल योजना करून आर्थिक तरतूद करावी. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह निर्माण करावे. आदिवासींचे प्रलंबित वनहक्क, जमीन पट्टे त्वरित वाटप करावे. स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत शेतमजूर व कामगारांचा समावेश करण्यात यावा. कांदा, तूर, ऊस उत्पादकांना जाहीर केलेले अनुदान तातडीने देण्यात यावे. नुकसानग्रस्त फळ उत्पादक शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यात यावी. दुबार पेरणीधारकांना तातडीने बियाणे खते, किटकनाशके व आर्थिक मदत द्यावी. प्रकल्पग्रस्तांना पूनर्वसन मोबदला व नौकरी द्यावी. निराधार, विधवांना दहा हजार रुपये देण्यात यावे आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चा न्यायालयाच्या मुख्य द्वारासमोर आला असता आंदोलकर्त्यांनी टायर जाळून शासनाच्या दुर्लक्षीत धोरणांचा निषेध नोंदविला. यावेळी जोरदार नारेबाजीही करण्यात आली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले. या आंदोलनाचे नेतृत्त्व आ. बच्चू कडू, प्रहारचे जिल्हा प्रमुख विकास दांडगे, रसूलाबादचे सरपंच राजेश सावरकर यांनी केले. आंदोलनात प्रितम कातकिडे, रेवत इंगळे, दिनेश पोपळकर, मिलिंद गव्हाणे, भुषण येलेकार, आदित्या कोकडवार, हनुमंत झोटींग, धनराज घुमे आदी सहभागी झाले होते.उपजिल्हाधिकाऱ्यांना धरले धारेवरवर्धा जिल्ह्यातील किती गाव, किती महसूल मंडळ दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहे. शिवाय त्यासाठी किती निधीची मागणी असून तसा प्रस्ताव सरकारला पाठविण्यात आला काय, अशी विचारणा करीत आ. बच्चू कडू यांनी निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांना चांगलेच धारेवर धरले होते. ज्यानंतर बनकर यांनी तातडीने संबंधित अधिकारी अतुल रासपायले यांना बोलाविले. त्यांनीही वेळीच कार्यवाही न केल्याचे लक्षात येताच आ. कडू यांनी त्यांचीही कानउघाडणी केली.

टॅग्स :Morchaमोर्चा