शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अतिक्रमणाची तक्रार करा अन् विसरा; चार महिन्यांत तक्रारी २१, धडक कारवाया केवळ १२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 05:00 IST

शहरात हळूहळू का होईना पण पाय पसरविणारे हे अतिक्रमण एखाद्या मोठ्या अनुचित घटनेला निमंत्रण देणारे असल्याने काही नागरिक थेट नगरपालिका प्रशासनाला याची तोंडी व लेखी माहिती देतात. त्यावर नगरपालिका प्रशासन धडक कारवाईही करीत असले तरी मागील चार महिन्यात केवळ शहरातील केवळ १२ परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आल्याचे वास्तव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  सुमारे दीड लाख लोकसंख्या असलेल्या वर्धा शहरातील प्रमुख मार्गांवर काही ठिकाणी छोट्या तर काही ठिकाणी मोठ्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने रस्तेच अरुंद झाले आहेत. शहरात हळूहळू का होईना पण पाय पसरविणारे हे अतिक्रमण एखाद्या मोठ्या अनुचित घटनेला निमंत्रण देणारे असल्याने काही नागरिक थेट नगरपालिका प्रशासनाला याची तोंडी व लेखी माहिती देतात. त्यावर नगरपालिका प्रशासन धडक कारवाईही करीत असले तरी मागील चार महिन्यात केवळ शहरातील केवळ १२ परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे मागील चार महिन्यांच्या काळात वर्धा नगरपालिका प्रशासनाला अतिक्रमणाबाबत २१ तक्रारी प्राप्त झाल्या असून उर्वरित अर्जांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वेळीच धडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

१२ ठिकाणी कारवाया, नऊचे काय?पालिका प्रशासनाने धडक मोहीम राबवून शहरातील १२ भागातील अतिक्रमण काढले असले तरी अजूनही अतिक्रमणाबाबतच्या नऊ तक्रारी प्रलंबित आहेत. अल्प मनुष्यबळ कारवाईला बहुदा ब्रेक लावते.

अतिक्रमण हटविण्यासाठी उसने कर्मचारीवर्धा नगरपालिका प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहिमेचे नियोजन करताना आरोग्य, बांधकाम, मिळकतकर आदी विभागातून अधिकारी व कर्मचारी घ्यावे लागत असल्याचे वास्तव आहे. 

तक्रार कशी व  कुठे करायची?अतिक्रमणाबाबत नगरपालिका प्रशासनाकडे थेट लेखी तक्रार करता येते. लेखी तक्रार ही मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने देणे क्रमप्राप्त असून तक्रार प्राप्त होताच  शहानिशा करून कार्यवाही होते.

या भागातील अतिक्रमणाकडे लक्ष कोण देणार?शहरातील रामनगर भागातील विविध परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. शहरातील मुख्य मार्गावर अनेक मोठ्या व्यावसायिकांनी त्यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठानांसमोर टिनचे शेड उभारून अतिक्रमण केल्याचे बघावयास मिळते. शहराचे हृदयस्थान असलेल्या गोंड प्लॉट भागात काही ठिकाणी अतिक्रमण करण्यात आल्याने रस्तेच अरुंद झाले आहेत.

चार महिन्यांत अतिक्रमणाबाबत २१ तक्रारी प्राप्त झाल्या. प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने १२ ठिकाणी अतिक्रमण काढण्यात आले. उर्वरित ठिकाणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण काढण्यात येणार आहे.- निखिल लोहवे, सहा. व्यवस्थापक, मिळकत, न.प. वर्धा.

अतिक्रमणाबाबत चार महिन्यात २१ तक्रारी- मागील चार महिन्यांच्या काळात वर्धा नगरपालिका प्रशासनाला अतिक्रमणाबाबत एकूण २१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.- अतिक्रमणाच्या तक्रारींची दखल घेत शहरातील १२ विविध भागांतील अतिक्रमण धडक मोहीम राबवून हटविण्यात आले असून यात आर्वी नाका परिसराचा समावेश आहे.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण