शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

सेवाग्रामात बापू दप्तरच्या नूतनीकरणाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 06:00 IST

बापू कुटीच्या बाजूलाच आणि हाकेच्या अंतरावर बापूंचे दप्तर आहे. वास्तवात ही कुटी मीरा बहन यांनी स्वत:साठी बनविली होती. त्या तिथे राहून महिलांसाठी कार्य करीत असे. मात्र, फार काही राहण्याचे भाग्य त्यांना मिळाले नाही. बापूंचे कार्य वाढल्याने त्यांना स्वतंत्र कार्यालयाची गरज भासू लागली. एवढेच नव्हे, तर तत्कालीन व्हाईसराय यांना आणि अन्य लोकांना बापूंशी बोलता यावे यासाठी टेलिफोन लावण्यात आला, जो याच दप्तरमध्ये होता.

ठळक मुद्दे८२ वर्षांनंतर दुरूस्तीचा आला योग : दर्शनार्थ्यांना प्रवेश असणार निषिद्ध

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशातच नव्हे, तर जगात सेवाग्राम आश्रमातील बापू दप्तरचे महत्त्व कायम आहे. स्वातंत्र्य चळवळ आणि रचनात्मक कार्याला उभारी देण्याचे काम बापू दप्तरमधून होत होते. अशा महत्त्वाच्या आणि इतिहासाचा साक्षीदार असलेल्या बापू दप्तरचे तब्बल ८२ वर्षांनी नूतनीकरणाचा योग आला आहे आणि प्रारंभसुद्धा झालेला आहे.बापू कुटीच्या बाजूलाच आणि हाकेच्या अंतरावर बापूंचे दप्तर आहे. वास्तवात ही कुटी मीरा बहन यांनी स्वत:साठी बनविली होती. त्या तिथे राहून महिलांसाठी कार्य करीत असे. मात्र, फार काही राहण्याचे भाग्य त्यांना मिळाले नाही. बापूंचे कार्य वाढल्याने त्यांना स्वतंत्र कार्यालयाची गरज भासू लागली. एवढेच नव्हे, तर तत्कालीन व्हाईसराय यांना आणि अन्य लोकांना बापूंशी बोलता यावे यासाठी टेलिफोन लावण्यात आला, जो याच दप्तरमध्ये होता. या ठिकाणी बापूंचे सचिव महादेवभाई देसाई, प्यारेलालजी, किशोरभाई मश्रुवाला, राजकुमारी अमृताकौर आणि अन्य संबंधित बसून आपापली कामे करीत. हरिजन साप्ताहिकाचे कार्य याच दप्तरमधून चालत असे. बापूंच्या हाकेच्या अंतरावर असल्याने कामकाजाकरिता सुविधा झाली होती.मीरा बहन यांनी अत्यंत साधी आणि अत्यल्प खर्चात झोपडी बनविली होती. विटा, बल्ली, फाटे, बांबू, बोरा, कमच्या यासह कुडसुध्दा कमच्याचे दिसून येत. बांबूच्या नी साध्या खिडक्या आहेत. एका श्रीमंत घरातील मुलगी मीरा बहन बनून अत्यंत साधे जीवन जगल्या, जे आश्रमासाठी आदर्श आणि बापूंच्या तत्त्वाशी सुसंगत होते.तब्बल ८२ वर्षांनी नूतनीकरणाचा योग आला. नव्या बल्ली, फाटे, कमच्या, बोरा लावण्यात येणार असून लिपाई, जुडाई करण्यात येईल. पण यात जसेच्या तसेच असल्याने सावधगिरी बाळगत काम सुरू आहे. सध्या बल्ली गाडायचे काम सुरू झाले. टप्प्याटप्प्याटप्प्याने काम करण्यात येणार असल्याने बिघडण्याची शक्यता सुतराम नाही, हे मात्र खरे! आश्रम जगासाठी आदर्श आहे. अहिंसेच्या माध्यमातून ब्रिटिशांशी लढा उभारला. कार्यकर्त्यांना दिशा देण्याचे काम आश्रमातून झाल्याने येथील प्रत्येक वास्तू आणि वस्तूचे महत्त्व अबाधित असणे आवश्यक आहे. हा इतिहास नव्या पिढीला प्रेरणा देणारा असल्याने यांचे आयुष्य वाढणे आणि राखणे आवश्यक आहे. कामात व्यत्यय येऊ नये यासाठी हिरवी जाळी लावून ‘दर्शनार्थीयों के लिए बंद, प्रवेश निषिद्ध असे फलक लावल्याचे दिसून येत आहेत.

टॅग्स :Sewagramसेवाग्रामBapu Kutiबापू कुटी