शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

सेवाग्रामात बापू दप्तरच्या नूतनीकरणाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 06:00 IST

बापू कुटीच्या बाजूलाच आणि हाकेच्या अंतरावर बापूंचे दप्तर आहे. वास्तवात ही कुटी मीरा बहन यांनी स्वत:साठी बनविली होती. त्या तिथे राहून महिलांसाठी कार्य करीत असे. मात्र, फार काही राहण्याचे भाग्य त्यांना मिळाले नाही. बापूंचे कार्य वाढल्याने त्यांना स्वतंत्र कार्यालयाची गरज भासू लागली. एवढेच नव्हे, तर तत्कालीन व्हाईसराय यांना आणि अन्य लोकांना बापूंशी बोलता यावे यासाठी टेलिफोन लावण्यात आला, जो याच दप्तरमध्ये होता.

ठळक मुद्दे८२ वर्षांनंतर दुरूस्तीचा आला योग : दर्शनार्थ्यांना प्रवेश असणार निषिद्ध

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशातच नव्हे, तर जगात सेवाग्राम आश्रमातील बापू दप्तरचे महत्त्व कायम आहे. स्वातंत्र्य चळवळ आणि रचनात्मक कार्याला उभारी देण्याचे काम बापू दप्तरमधून होत होते. अशा महत्त्वाच्या आणि इतिहासाचा साक्षीदार असलेल्या बापू दप्तरचे तब्बल ८२ वर्षांनी नूतनीकरणाचा योग आला आहे आणि प्रारंभसुद्धा झालेला आहे.बापू कुटीच्या बाजूलाच आणि हाकेच्या अंतरावर बापूंचे दप्तर आहे. वास्तवात ही कुटी मीरा बहन यांनी स्वत:साठी बनविली होती. त्या तिथे राहून महिलांसाठी कार्य करीत असे. मात्र, फार काही राहण्याचे भाग्य त्यांना मिळाले नाही. बापूंचे कार्य वाढल्याने त्यांना स्वतंत्र कार्यालयाची गरज भासू लागली. एवढेच नव्हे, तर तत्कालीन व्हाईसराय यांना आणि अन्य लोकांना बापूंशी बोलता यावे यासाठी टेलिफोन लावण्यात आला, जो याच दप्तरमध्ये होता. या ठिकाणी बापूंचे सचिव महादेवभाई देसाई, प्यारेलालजी, किशोरभाई मश्रुवाला, राजकुमारी अमृताकौर आणि अन्य संबंधित बसून आपापली कामे करीत. हरिजन साप्ताहिकाचे कार्य याच दप्तरमधून चालत असे. बापूंच्या हाकेच्या अंतरावर असल्याने कामकाजाकरिता सुविधा झाली होती.मीरा बहन यांनी अत्यंत साधी आणि अत्यल्प खर्चात झोपडी बनविली होती. विटा, बल्ली, फाटे, बांबू, बोरा, कमच्या यासह कुडसुध्दा कमच्याचे दिसून येत. बांबूच्या नी साध्या खिडक्या आहेत. एका श्रीमंत घरातील मुलगी मीरा बहन बनून अत्यंत साधे जीवन जगल्या, जे आश्रमासाठी आदर्श आणि बापूंच्या तत्त्वाशी सुसंगत होते.तब्बल ८२ वर्षांनी नूतनीकरणाचा योग आला. नव्या बल्ली, फाटे, कमच्या, बोरा लावण्यात येणार असून लिपाई, जुडाई करण्यात येईल. पण यात जसेच्या तसेच असल्याने सावधगिरी बाळगत काम सुरू आहे. सध्या बल्ली गाडायचे काम सुरू झाले. टप्प्याटप्प्याटप्प्याने काम करण्यात येणार असल्याने बिघडण्याची शक्यता सुतराम नाही, हे मात्र खरे! आश्रम जगासाठी आदर्श आहे. अहिंसेच्या माध्यमातून ब्रिटिशांशी लढा उभारला. कार्यकर्त्यांना दिशा देण्याचे काम आश्रमातून झाल्याने येथील प्रत्येक वास्तू आणि वस्तूचे महत्त्व अबाधित असणे आवश्यक आहे. हा इतिहास नव्या पिढीला प्रेरणा देणारा असल्याने यांचे आयुष्य वाढणे आणि राखणे आवश्यक आहे. कामात व्यत्यय येऊ नये यासाठी हिरवी जाळी लावून ‘दर्शनार्थीयों के लिए बंद, प्रवेश निषिद्ध असे फलक लावल्याचे दिसून येत आहेत.

टॅग्स :Sewagramसेवाग्रामBapu Kutiबापू कुटी