शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

सेवाग्रामात बापू दप्तरच्या नूतनीकरणाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 06:00 IST

बापू कुटीच्या बाजूलाच आणि हाकेच्या अंतरावर बापूंचे दप्तर आहे. वास्तवात ही कुटी मीरा बहन यांनी स्वत:साठी बनविली होती. त्या तिथे राहून महिलांसाठी कार्य करीत असे. मात्र, फार काही राहण्याचे भाग्य त्यांना मिळाले नाही. बापूंचे कार्य वाढल्याने त्यांना स्वतंत्र कार्यालयाची गरज भासू लागली. एवढेच नव्हे, तर तत्कालीन व्हाईसराय यांना आणि अन्य लोकांना बापूंशी बोलता यावे यासाठी टेलिफोन लावण्यात आला, जो याच दप्तरमध्ये होता.

ठळक मुद्दे८२ वर्षांनंतर दुरूस्तीचा आला योग : दर्शनार्थ्यांना प्रवेश असणार निषिद्ध

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशातच नव्हे, तर जगात सेवाग्राम आश्रमातील बापू दप्तरचे महत्त्व कायम आहे. स्वातंत्र्य चळवळ आणि रचनात्मक कार्याला उभारी देण्याचे काम बापू दप्तरमधून होत होते. अशा महत्त्वाच्या आणि इतिहासाचा साक्षीदार असलेल्या बापू दप्तरचे तब्बल ८२ वर्षांनी नूतनीकरणाचा योग आला आहे आणि प्रारंभसुद्धा झालेला आहे.बापू कुटीच्या बाजूलाच आणि हाकेच्या अंतरावर बापूंचे दप्तर आहे. वास्तवात ही कुटी मीरा बहन यांनी स्वत:साठी बनविली होती. त्या तिथे राहून महिलांसाठी कार्य करीत असे. मात्र, फार काही राहण्याचे भाग्य त्यांना मिळाले नाही. बापूंचे कार्य वाढल्याने त्यांना स्वतंत्र कार्यालयाची गरज भासू लागली. एवढेच नव्हे, तर तत्कालीन व्हाईसराय यांना आणि अन्य लोकांना बापूंशी बोलता यावे यासाठी टेलिफोन लावण्यात आला, जो याच दप्तरमध्ये होता. या ठिकाणी बापूंचे सचिव महादेवभाई देसाई, प्यारेलालजी, किशोरभाई मश्रुवाला, राजकुमारी अमृताकौर आणि अन्य संबंधित बसून आपापली कामे करीत. हरिजन साप्ताहिकाचे कार्य याच दप्तरमधून चालत असे. बापूंच्या हाकेच्या अंतरावर असल्याने कामकाजाकरिता सुविधा झाली होती.मीरा बहन यांनी अत्यंत साधी आणि अत्यल्प खर्चात झोपडी बनविली होती. विटा, बल्ली, फाटे, बांबू, बोरा, कमच्या यासह कुडसुध्दा कमच्याचे दिसून येत. बांबूच्या नी साध्या खिडक्या आहेत. एका श्रीमंत घरातील मुलगी मीरा बहन बनून अत्यंत साधे जीवन जगल्या, जे आश्रमासाठी आदर्श आणि बापूंच्या तत्त्वाशी सुसंगत होते.तब्बल ८२ वर्षांनी नूतनीकरणाचा योग आला. नव्या बल्ली, फाटे, कमच्या, बोरा लावण्यात येणार असून लिपाई, जुडाई करण्यात येईल. पण यात जसेच्या तसेच असल्याने सावधगिरी बाळगत काम सुरू आहे. सध्या बल्ली गाडायचे काम सुरू झाले. टप्प्याटप्प्याटप्प्याने काम करण्यात येणार असल्याने बिघडण्याची शक्यता सुतराम नाही, हे मात्र खरे! आश्रम जगासाठी आदर्श आहे. अहिंसेच्या माध्यमातून ब्रिटिशांशी लढा उभारला. कार्यकर्त्यांना दिशा देण्याचे काम आश्रमातून झाल्याने येथील प्रत्येक वास्तू आणि वस्तूचे महत्त्व अबाधित असणे आवश्यक आहे. हा इतिहास नव्या पिढीला प्रेरणा देणारा असल्याने यांचे आयुष्य वाढणे आणि राखणे आवश्यक आहे. कामात व्यत्यय येऊ नये यासाठी हिरवी जाळी लावून ‘दर्शनार्थीयों के लिए बंद, प्रवेश निषिद्ध असे फलक लावल्याचे दिसून येत आहेत.

टॅग्स :Sewagramसेवाग्रामBapu Kutiबापू कुटी