शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

१०४ गावांमध्ये जाणार पुनर्जागरण यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2015 02:22 IST

शासनाच्या योजनांबाबत नागरिकांत जनजागृती करण्यासाठी नेहरू युवा केंद्राच्या मार्फत आठही तालुक्यातील एकूण १०४ गावांमध्ये पुनर्जागरण यात्रा काढण्यात येणार आहे.

योजनांची जनजागृती : जिल्हाधिकाऱ्यांकडून नियोजनाचा आढावावर्धा : शासनाच्या योजनांबाबत नागरिकांत जनजागृती करण्यासाठी नेहरू युवा केंद्राच्या मार्फत आठही तालुक्यातील एकूण १०४ गावांमध्ये पुनर्जागरण यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेतून नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. युवकांनी यात उत्स्फूर्तपणे सहभागी होत योजनांचा प्रत्यक्ष लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिल्यात.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष रेवतकर, समाज कल्याण सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.यावेळी जिल्हाधिकारी सलील यांनी आठही तालुक्यातील प्रत्येकी १३ गावामध्ये पुनर्जागरण यात्रा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. संबंधित गावातील ग्रामसेवक, आरोग्य सेवकांसह गटविकास अधिकारी यांनी विशेष लक्ष देऊन हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुढाकार घ्यावा, असे सांगितले. या कार्यक्रमांतर्गत प्रधानमंत्री जन-धन योजना, संसद आदर्श गाव योजना, स्वच्छ भारत अभियान, निर्मल गाव योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ आदी योजनांसह राज्य शासनाच्या योजनांचीही पथनाट्याद्वारे जागृती करण्यात येणार आहे. याकरिता कॉर्नर बैठक, ग्रामपंचायत चर्चा, श्रमदान, नुक्कड नाटक, युवा संसद या माध्यमातून ग्रामीण स्तरावर कार्यक्रम राबविणार आहे. प्रत्येक विभागाने शासकीय योजनांची माहितीपत्रके, घडीपुस्तिका नेहरू युवा केंद्रांना उपलब्ध करुन द्यावी, योजनांची माहिती तळागळातील लोकांपर्यंत पोहचविण्यास मदत होईल, असेही सलील यावेळी म्हणाले. नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा समन्वयक ज्योती मोहिते यांनी पुनर्जागरण यात्रा कार्यक्रमाबाबत सविस्तर सादरीकरण केले. (स्थानिक प्रतिनिधी)