शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
6
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
7
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
8
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
9
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
10
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
11
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
12
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

१०४ गावांमध्ये जाणार पुनर्जागरण यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2015 02:22 IST

शासनाच्या योजनांबाबत नागरिकांत जनजागृती करण्यासाठी नेहरू युवा केंद्राच्या मार्फत आठही तालुक्यातील एकूण १०४ गावांमध्ये पुनर्जागरण यात्रा काढण्यात येणार आहे.

योजनांची जनजागृती : जिल्हाधिकाऱ्यांकडून नियोजनाचा आढावावर्धा : शासनाच्या योजनांबाबत नागरिकांत जनजागृती करण्यासाठी नेहरू युवा केंद्राच्या मार्फत आठही तालुक्यातील एकूण १०४ गावांमध्ये पुनर्जागरण यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेतून नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. युवकांनी यात उत्स्फूर्तपणे सहभागी होत योजनांचा प्रत्यक्ष लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिल्यात.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष रेवतकर, समाज कल्याण सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.यावेळी जिल्हाधिकारी सलील यांनी आठही तालुक्यातील प्रत्येकी १३ गावामध्ये पुनर्जागरण यात्रा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. संबंधित गावातील ग्रामसेवक, आरोग्य सेवकांसह गटविकास अधिकारी यांनी विशेष लक्ष देऊन हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुढाकार घ्यावा, असे सांगितले. या कार्यक्रमांतर्गत प्रधानमंत्री जन-धन योजना, संसद आदर्श गाव योजना, स्वच्छ भारत अभियान, निर्मल गाव योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ आदी योजनांसह राज्य शासनाच्या योजनांचीही पथनाट्याद्वारे जागृती करण्यात येणार आहे. याकरिता कॉर्नर बैठक, ग्रामपंचायत चर्चा, श्रमदान, नुक्कड नाटक, युवा संसद या माध्यमातून ग्रामीण स्तरावर कार्यक्रम राबविणार आहे. प्रत्येक विभागाने शासकीय योजनांची माहितीपत्रके, घडीपुस्तिका नेहरू युवा केंद्रांना उपलब्ध करुन द्यावी, योजनांची माहिती तळागळातील लोकांपर्यंत पोहचविण्यास मदत होईल, असेही सलील यावेळी म्हणाले. नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा समन्वयक ज्योती मोहिते यांनी पुनर्जागरण यात्रा कार्यक्रमाबाबत सविस्तर सादरीकरण केले. (स्थानिक प्रतिनिधी)