शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

‘डेंग्यू’ काढतोय डोके वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 22:19 IST

पावसाळ्याच्या दिवसात ठिकठिकाणी पाणी साचत असल्याने डासांच्या उत्पत्तीत झपाट्याने वाढ होते. त्यामुळे कीटकजन्य आजारांची लागण अनेकांना होत असल्याचे वास्तव आहे. यंदाच्या वर्षी आरोग्य विभागाने जुलै अखेरपर्यंत डेंग्यू सदृश्य आजाराची लागण झालेल्या ५७ रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतले.

ठळक मुद्देतीन रुग्ण आढळले : आरोग्य विभागाने घेतले ५७ व्यक्तींच्या रक्ताचे नमुने

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाळ्याच्या दिवसात ठिकठिकाणी पाणी साचत असल्याने डासांच्या उत्पत्तीत झपाट्याने वाढ होते. त्यामुळे कीटकजन्य आजारांची लागण अनेकांना होत असल्याचे वास्तव आहे. यंदाच्या वर्षी आरोग्य विभागाने जुलै अखेरपर्यंत डेंग्यू सदृश्य आजाराची लागण झालेल्या ५७ रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतले. त्यापैकी तीन व्यक्तींना डेंग्यूची लागण झाल्याचे पुढे आले आहे. ते उपचार घेतल्याने सध्या बरे झाल्याचे सांगण्यात येत असून नागरिकांनी दक्ष राहण्याची गरज आहे.डेंग्यू हा विषाणूजन्य आजार आहे. तो किटकजन्य आजारात मोडत असून एडिस एजिप्टाय डासाच्या मादीच्या चाव्यामुळे होतो. डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णाने वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने वेळीच योग्य उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकत असला तरी रुग्णाने आपल्या आरोग्याची निगा घेताना थोडेजरी दुर्लक्ष केल्यास या आजारामुळे रुग्णाला आपला प्राणही गमवावा लागू शकत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे नागरिकांनी किटकजन्य आजार टाळण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळणे गरजेचे आहे.रक्तजल नमुना तपासण्याची सुविधा सेवाग्रामातडेंग्यू सदृष्य आजाराची लागण झालेल्या रुग्णाच्या रक्ताचे नमुने गोळा करून ते तपासणी करीता सेवाग्राम येथील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत पाठविले जातात. हे रक्त नमूने जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या मार्फत पाठविण्यात येत असून यंदा जुलै अखेरपर्यंत डेंग्यू सदृष्य आजाराची लागण झालेल्या ५७ रुग्णांच्या रक्ताचे नमुने या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी ३ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ही रुग्ण सध्या बरी झाल्याचे सांगण्यात येते.स्वच्छ पाण्यात वाढतो डेंग्यूचा डासडेंग्यू या आजाराची लागण एडिस इजिप्टाय डासाच्या मादीच्या चाव्यामुळे होते. या डासाची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होत असून डेंग्यूचा डास स्वच्छ पाण्यातच अंडी घालतो. डेंग्यूचा डास हा दिवसा चावणारा असल्यामुळे संपूर्ण अंग झाकेल असेच कपडे घातले पाहिजे. शिवाय या आजाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा, असे तज्ज्ञ सांगतात.मच्छरदाणीचा वापर ठरतो फायद्याचाकिटकजन्य आजार टाळण्यासाठी नागरिकांनी पावसाचे पाणी घराच्या आवारात साचू देऊ नये. शिवाय सांडपाणी वाहते करावे. तर वापरण्यासाठी साठविलेले पाणी नेहमी झाकून ठेवावे. इतकेच नव्हे तर आठवड्यातून एक दिवस घरातील पाण्याची सर्व भांडी रिकामी करून कोरडा दिवस पाळावा. असे केल्यास किटकजन्य आजाराच्या प्रादुर्भावाला अटकाव घालता येतो.तसेच नागरिकांनी झोपताना मच्छरदाणीचा वापर केल्यास ते फायद्याचे ठरत असल्याचे सांगण्यात आले. ताप आल्यास कुठलाही घरगुती उपाय न करता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे गरजेचे आहे.गत तीन वर्षांच्या तुलनेत यंदा डेंग्यू आजाराला अटकाव करण्यात आरोग्य विभागाला बऱ्यापैकी यश आले आहे. यंदा जिल्ह्यात डेंग्यूचे तीन रुग्ण आढळले असून वेळीच योग्य उपचार त्यांना मिळाल्याने ते बरे झाले आहेत. किटकजन्य आजार टाळण्यासाठी नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. शिवाय डेंग्यूची लक्षणे आढळल्यास रुग्णाने नजीकच्या शासकीय रुग्णालयात जावून वैद्यकीय अधिकाºयांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा.- अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

टॅग्स :dengueडेंग्यूHealthआरोग्य