शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

‘डेंग्यू’ काढतोय डोके वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 22:19 IST

पावसाळ्याच्या दिवसात ठिकठिकाणी पाणी साचत असल्याने डासांच्या उत्पत्तीत झपाट्याने वाढ होते. त्यामुळे कीटकजन्य आजारांची लागण अनेकांना होत असल्याचे वास्तव आहे. यंदाच्या वर्षी आरोग्य विभागाने जुलै अखेरपर्यंत डेंग्यू सदृश्य आजाराची लागण झालेल्या ५७ रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतले.

ठळक मुद्देतीन रुग्ण आढळले : आरोग्य विभागाने घेतले ५७ व्यक्तींच्या रक्ताचे नमुने

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाळ्याच्या दिवसात ठिकठिकाणी पाणी साचत असल्याने डासांच्या उत्पत्तीत झपाट्याने वाढ होते. त्यामुळे कीटकजन्य आजारांची लागण अनेकांना होत असल्याचे वास्तव आहे. यंदाच्या वर्षी आरोग्य विभागाने जुलै अखेरपर्यंत डेंग्यू सदृश्य आजाराची लागण झालेल्या ५७ रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतले. त्यापैकी तीन व्यक्तींना डेंग्यूची लागण झाल्याचे पुढे आले आहे. ते उपचार घेतल्याने सध्या बरे झाल्याचे सांगण्यात येत असून नागरिकांनी दक्ष राहण्याची गरज आहे.डेंग्यू हा विषाणूजन्य आजार आहे. तो किटकजन्य आजारात मोडत असून एडिस एजिप्टाय डासाच्या मादीच्या चाव्यामुळे होतो. डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णाने वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने वेळीच योग्य उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकत असला तरी रुग्णाने आपल्या आरोग्याची निगा घेताना थोडेजरी दुर्लक्ष केल्यास या आजारामुळे रुग्णाला आपला प्राणही गमवावा लागू शकत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे नागरिकांनी किटकजन्य आजार टाळण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळणे गरजेचे आहे.रक्तजल नमुना तपासण्याची सुविधा सेवाग्रामातडेंग्यू सदृष्य आजाराची लागण झालेल्या रुग्णाच्या रक्ताचे नमुने गोळा करून ते तपासणी करीता सेवाग्राम येथील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत पाठविले जातात. हे रक्त नमूने जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या मार्फत पाठविण्यात येत असून यंदा जुलै अखेरपर्यंत डेंग्यू सदृष्य आजाराची लागण झालेल्या ५७ रुग्णांच्या रक्ताचे नमुने या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी ३ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ही रुग्ण सध्या बरी झाल्याचे सांगण्यात येते.स्वच्छ पाण्यात वाढतो डेंग्यूचा डासडेंग्यू या आजाराची लागण एडिस इजिप्टाय डासाच्या मादीच्या चाव्यामुळे होते. या डासाची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होत असून डेंग्यूचा डास स्वच्छ पाण्यातच अंडी घालतो. डेंग्यूचा डास हा दिवसा चावणारा असल्यामुळे संपूर्ण अंग झाकेल असेच कपडे घातले पाहिजे. शिवाय या आजाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा, असे तज्ज्ञ सांगतात.मच्छरदाणीचा वापर ठरतो फायद्याचाकिटकजन्य आजार टाळण्यासाठी नागरिकांनी पावसाचे पाणी घराच्या आवारात साचू देऊ नये. शिवाय सांडपाणी वाहते करावे. तर वापरण्यासाठी साठविलेले पाणी नेहमी झाकून ठेवावे. इतकेच नव्हे तर आठवड्यातून एक दिवस घरातील पाण्याची सर्व भांडी रिकामी करून कोरडा दिवस पाळावा. असे केल्यास किटकजन्य आजाराच्या प्रादुर्भावाला अटकाव घालता येतो.तसेच नागरिकांनी झोपताना मच्छरदाणीचा वापर केल्यास ते फायद्याचे ठरत असल्याचे सांगण्यात आले. ताप आल्यास कुठलाही घरगुती उपाय न करता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे गरजेचे आहे.गत तीन वर्षांच्या तुलनेत यंदा डेंग्यू आजाराला अटकाव करण्यात आरोग्य विभागाला बऱ्यापैकी यश आले आहे. यंदा जिल्ह्यात डेंग्यूचे तीन रुग्ण आढळले असून वेळीच योग्य उपचार त्यांना मिळाल्याने ते बरे झाले आहेत. किटकजन्य आजार टाळण्यासाठी नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. शिवाय डेंग्यूची लक्षणे आढळल्यास रुग्णाने नजीकच्या शासकीय रुग्णालयात जावून वैद्यकीय अधिकाºयांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा.- अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

टॅग्स :dengueडेंग्यूHealthआरोग्य