शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पुन्हा नको दारूगोळा भंडारातील ‘त्या’ काळरात्रीचे स्मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 23:06 IST

येथे दोन वर्षांपूर्वी भयानक अग्निस्फोटात दारूगोळा भांडारातील अधिकाऱ्यांसह १९ जवानांनी या अग्निस्फोटात आपल्या प्राणाची आहूती दिली. लाखो लोकांचे प्राण वाचविले. आज या घटनेला दोन वर्षांचा काळ लोटला. परंतु, त्या घटनेतील जखमा आजही ताज्या आहेत. पुन्हा त्या काळरात्रीचे स्मरण नको म्हणून शहर व परिसरातील हजारो नागरिकांनी अश्रू टिपत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून शहीदांचे स्मरण केले.

ठळक मुद्देदिन विशेष : शहिदांना देशभक्तीपर गीतातून भावपूर्ण श्रद्धांजली

प्रभाकर शहाकार।लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : येथे दोन वर्षांपूर्वी भयानक अग्निस्फोटात दारूगोळा भांडारातील अधिकाऱ्यांसह १९ जवानांनी या अग्निस्फोटात आपल्या प्राणाची आहूती दिली. लाखो लोकांचे प्राण वाचविले. आज या घटनेला दोन वर्षांचा काळ लोटला. परंतु, त्या घटनेतील जखमा आजही ताज्या आहेत. पुन्हा त्या काळरात्रीचे स्मरण नको म्हणून शहर व परिसरातील हजारो नागरिकांनी अश्रू टिपत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून शहीदांचे स्मरण केले.घटनेच्या दिवशी लागोपाठ होणारे बॉम्ब स्फोटाचे आवाज आकाशाला भिडणाºया आगीच्या ज्वाळा धुराचे डोंबर पहात शहर व परिसरातील रस्त्याने सैरावैरा धावत होते. दारूगोळा भांडाराला लागून असणारे पिंपरी (खराबे), आगरगाव, नागझरी, एसगाव, मुरदगाव, सोनेगाव येथील ग्रामस्थ घरदार सोडून रस्त्यावर आले. अखेर भयभीत झालेल्या ग्रामस्थांना खा. रामदास तडस यांनी मिळेल. त्या वाहनाने देवळी, नाचणगाव येथे हलविले. बॉम्ब स्फोटाचे कर्णभेद आवाज व ग्रामस्थांचा हलकल्लोळ अशा द्विधा मनस्थितीत असताना त्यांनी नागरिकांना धीर दिला. ग्रामस्थांची देवळी व नाचणगाव येथे राहण्याची व्यवस्था केली. शहर व ग्रामीण भागात धावपळ सुरू असतानाच दारू गोळा भांडारातील लष्करी, निर्मलष्करी व अग्निशमक दलातील कर्मचारी जीव मुठीत घेवून या भयावह अग्निस्फोटाचा सामना करीत होते. भांडारातील वीर जवान भयानक अग्निस्फोट व कर्णभेदी आवाजातही भांडारातील इतर ठिकाणचा दारूगोळा या घटनास्थळापासून सुरक्षित स्थळी हलवून शहर व परिसरातील ग्रामस्थ कसे सुरक्षित राहील याचा विचार करून अग्निस्फोटावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत होते; पण भयंकर शक्तीशाली स्फोट व वाºयामुळे पसरणारी आग यामुळे अग्निशामक दलाच्या दोन गाड्या कर्मचाºयासह फुटबॉल सारख्या उडाल्या. तरीही दारूगोळा भांडारातील अधिकारी व वीर जवानांनी देशभक्ती व आपल्या कर्तव्यदक्षतेचा परिचय देत आपल्या प्राणाची आहूती देत अनेकांचे प्राण वाचविले. या अग्निस्फोटात लष्करी अधिकाºयासह अग्निशमन दलातील १९ जवानांनी बलिदान दिले. १९४२ साली सुरू झालेल्या या केंद्रीय दारू गोळा भांडारात शहर व परिसरातील कर्मचाºयांचे मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्यामुळे बॉम्बस्फोट झाल्यापासून शहरवासियांची शोधाशोध व विचारणा सुरू झाली. अग्निस्फोटाने संपूर्ण सैनिकी प्रशासन हादरून गेले होते. सगळ्यांच लक्ष एकच, अग्निस्फोटावर नियंत्रण मिळविणे. दिवस निघता निघता अग्निस्फोटावर नियंत्रण तर मिळविले. परंतु ‘गड आला पण सिंह गेला’ म्हणत दोन सैनिकी अधिकाऱ्यांसह १९ कर्तबगार जवानांना वीरगती प्राप्त झाली. साºया देशाने या घटनेची नोंद घेतली. आजही त्या आठवणी जाग्या झाल्यावर भयानक दृष्य डोळयासमोर उभे राहते. पुन्हा अशी घटना घडू नये अशीच प्रार्थना या घटनेनंतर साºया समाजाने नोंदविली. अनेक जण आजही बोलता बोलता सहज म्हणतात ‘नको त्या काळ रात्रीची आठवण’.