शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

जलयुक्त शिवारातून कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा

By admin | Updated: September 16, 2015 02:54 IST

स्थानिक मंडळ कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत २०१४-१५ मध्ये वासी, कोरा, खापरी, गांगापूर, पिंपरी, गिरड, साखरा, ...

२५८० टीसीएम पाणीसाठा शक्य : तीन योजनांच्या माध्यमातून करण्यात आली कामेगिरड : स्थानिक मंडळ कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत २०१४-१५ मध्ये वासी, कोरा, खापरी, गांगापूर, पिंपरी, गिरड, साखरा, केसलापूर, रासा, मोहगाव तावी, शिवणफळ, उंदीरगाव, फरीदपूर, सावरी, चोरविहिरी आदी शेतशिवारात विविध योजनांतून मृद व जलसंधारणाची कामे करण्यात आली. यात १ हजार ५०० हेक्टरवर ढाळीचे बांध, अकरा शेततळे, १ हजार ७०० मिटर नाला खोलीकरण, चार सिमेंट नाला बांध तसेच महात्मा फुले तुट-फूट दुरूस्ती अंतर्गत १३ सिमेंट नाला बांधाची दुरूस्ती करण्यात आली. या कामांमुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.कृषी विभागाने केलेल्या या कामांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण झाला आहे. ढाळीच्या बांधामुळे ६७५ टीसीएम, शेततळ्यांमुळे २५ टीसीएम तर नाला खोलीकरण १२० टीसीएम व सिमेंट नाला बांधामुळे ४० टीसीएम असा एकूण १६० टीसीएम साठा एकावेळी होतो. एका हंगामात सदर पाणीसाठा तीनवेळा निर्माल्य होत असल्याने एकूण २ हजार ५८० टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. सदर मृद व जलसंधारण कामांमुळे परिसरातील विहिरीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. सिंचन क्षेत्रात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. पावसामध्ये खंड पडल्यास मृद व जलसंधाण कामांमुळे पिकांची वाढ होऊन उत्पादनही वाढणार आहे. नाला खोलीकरण, शेततळे व सिमेंट नाला बांधामुळे पाणीसाठा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना ओलिताची सोय झाली आहे. सदर कामे एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, जलयुक्त शिवार अभियान, कोरडवाहू शेती अभियान, क्षतिग्रस्त पाणलोट विकास कार्यक्रम आदींतून करण्यात आली. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन ही कामे शेत परिस्थितीनुसार केल्याने याचा लाभ दीर्घकाळ होणार आहे. जलशिवार बांधाचे उद्घाटन आ. समीर कुणावार, पं.स. सदस्य छाया निमजे, जि.प. सदस्य मंदा चौधरी, मोहन गिरडे यांच्या हस्ते झाले. मान्यवरांनी या कामांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला असून पुढेही ही कामे मोठ्या प्रमाणावर केले जातील व शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल, असे सांगितले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी व कृषी सहायक उपस्थित होते.(वार्ताहर)