शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

रेमडीसिवीर औषध कोरोनावरील उपचारासाठी प्रभावशाली नाही - डॉ. कलंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 21:10 IST

रेमडीसीवर रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी फारसे उपयोगी नाही, रुग्णांच्या नातेवाईकांनी रेमडीसिविर औषधासाठी आग्रह धरू नये. डॉ कलंत्री यांचे हायड्रोक्लोरोक्वीन औषधावरील संशोधन सुद्धा लँसेट मासिकात प्रकाशित

ठळक मुद्देडॉ कलंत्री यांचे हायड्रोक्लोरोक्वीन औषधावरील संशोधन सुद्धा लँसेट मासिकात प्रकाशित

वर्धा : राज्यासह देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून रेमेडिसीवीर हे या आजारावरील एकमेव रामबाण औषध आहे असा समज जनता आणि वैद्यकीय क्षेत्रात पसरलेला आहे. मात्र, सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयाचे मेडिसिन विभागाचे प्रोफेसर आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. पी. कलंत्री यांच्या म्हणण्यानुसार रेमडीसीविर या इंजेक्शनमुळे रुग्ण बरा होतो, गंभीर रुग्णांचा मृत्यू होत नाही किंवा फुफ्फुसातील संसर्ग कमी करतो, हा जनतेमधील समज चुकीचा आहे. त्यामुळे, नागरिकांनी या औषधासाठी अट्टहास करू नये, वैद्यकीय क्षेत्रात इतरही औषधे यापेक्षा उपयुक्त ठरत आहेत, त्यामुळे नागरिकांनी  रेमडीसीविर मिळत नाही म्हणून भयभीत होऊ नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.

डॉ कलंत्री हे 40 वर्षांपासून सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात मेडिसीन विभागात कार्यरत आहेत. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात हायड्रोक्लोरोक्वीन या औषधाचा कोरोनासाठी उपयोग होत नाही, यावर त्यांचा संशोधनपर निबंध लँसेट या सुप्रसिद्ध मासिकात प्रकाशित झाला आहे. आता, त्यांनी पुन्हा रेमेडिसीवीर या इंजेक्शनचा सुद्धा कोरोना रुग्णांचा मृत्युदर कमी करणे, रुग्णाला व्हेंटिलेटर लागण्यापासून वाचविणे, किंवा आय सी यु मधील रुग्णाचे दिवस कमी करणे, फुफ्फुसातील संसर्ग थांबविणे यापैकी कोणत्याही कारणासाठी उपयुक्त ठरत नसल्याचे संशोधनाअंती म्हटले आहे.  

जगातल्या 28 देशांमध्ये झालेल्या संशोधानातून जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा रेमडिसीविर उपयुक्त नसल्याचे म्हटले आहे. डब्लू एच ओ ने 28 देशातल्या 7433 कोरोना बधितांवर संशोधन केले. यातील काही रुग्णांना रेमडीसीविर दिले आणि काही रुग्णांवर इतर औषधांनी उपचार केले असता रेमेडिसीविर औषधाचा फारसा उपयोग होत नसल्याचे सिद्ध झाले असल्याचेही कलंत्री यांनी सांगितले. मात्र, सोशल मीडियाने या औषधाबद्दल समाजात एक प्रकारचा गैरसमज पसरविला आहे. एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला आणि रेमडीसीविर मिळत नाही म्हणजे आता मृत्यू अटळ आहे हा भ्रम लोकांमध्ये तयार होणे हे भीतीदायक आहे. त्यामुळे रुग्णाचे नातेवाईक डॉक्टरांवर रेमडीसीविर देण्यासाठी दबाव आणतात. कोणत्याही परिस्तितीत उपयुक्त न ठरणाऱ्या अशा औषधाचा आग्रह धरणे शास्त्रीय दृष्टिकोनातून चुकीचे आहे, असेही त्यांनी सांगितले. 

रेमडीसीविर शिवाय डॉक्टरांकडे अशी अनेक औषधे आहेत, ज्यामुळे कोविड रुग्ण पूर्ण बरा होतो. सेवाग्राम रुग्णालयात अनेक वृद्ध रुग्णसुद्धा रेमडीसीविरचा उपयोग न करता पूर्णपणे बरे केले आहेत. डॉक्टरांना त्यांच्या ज्ञानाचा, वैद्यकीय संशोधनाचा आणि वैद्यकीय कौशल्याचा उपयोग करून काम करू द्यावे, अशी कळकळीची विनंतीही त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याwardha-acवर्धाhospitalहॉस्पिटल