शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

फलक उरला नावापुरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 22:39 IST

राज्य सरकारने लोकसहभागातून ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला. याच कार्यक्रमांतर्गत गाव-शहरातील मोकळ्या मैदानात आॅक्सिजन पार्कच्या निर्मितीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हिंगणघाट तालुक्यातील सावली (वाघ) या गावातही आॅक्सिजन पार्क असा मोठा फलक लावण्यात आला.

ठळक मुद्देवृक्षलागवड उद्दिष्टपूर्तीचे तीनतेरा : प्रशासकीय अधिकाऱ्यांची सारवासारव

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : राज्य सरकारने लोकसहभागातून ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला. याच कार्यक्रमांतर्गत गाव-शहरातील मोकळ्या मैदानात आॅक्सिजन पार्कच्या निर्मितीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हिंगणघाट तालुक्यातील सावली (वाघ) या गावातही आॅक्सिजन पार्क असा मोठा फलक लावण्यात आला. परंतु, गंमत अशी की, या ठिकाणी केवळ फलकच आहे.झाडे कुठेही नाही. पर्यावरण संवर्धन संस्थेचे गौरव जामुनकर यांच्या निदर्शनास ही बाब येताच संस्थेचे अध्यक्ष आशिष भोयर व गौरव जामुनकर यांनी या जागेची पाहणी केली. तेव्हा ६.८८ क्षेत्रफळात ४७० झाडे लावण्याचे उद्दिष्ट असल्याचे समजले. सत्यता जाणून घेण्याकरिता सरपंच कापसे यांची भेट घेतली. याविषयी कुठलीच माहिती नसल्याने ग्रामपंचायतीमध्ये जाण्यास सांगितले. तिथेही सगळे कर्मचारी अनभिज्ञ होते. त्या जागेवर गिट्टी खदान आहे, वरून तार गेलेली आहे, अशी कारणे सांगितली. परंतु ही जागा झुडपी जंगल क्षेत्राकरिता अधिसूचित करण्यात आलेली असताना अशा अडचणी का येत आहे, अशी विचारणा केली असता कर्मचाºयांकडे उत्तर नव्हते. त्यांनी पंचायत समितीकडे विचारणा करण्यास सांगितले. आमदारांशी चर्चा केली असता त्यांनी गटविकास अधिकारी यांना भेटण्यास सांगितले. पंचायत समिती कर्मचारी सायंकार यांना माहिती विचारली तेव्हा त्यांनाही कुठलीच कल्पना नसल्याचे समजले. प्रत्येक विभागाने हा विषय दुसºया विभागावर ढकलण्याचे काम केले. हा फलक कुणी लावला, हे ग्रामपंचायत, पंचायत समिती, वनविभाग कुणालाही माहीत नव्हते.दोन दिवसांत याविषयी सविस्तर माहिती देऊ, असे सचिव भोमले यांनी सांगितले. परंतु, या फलकावर गटविकास अधिकारी पंचायत समिती असे नाव असल्याने त्यांच्या सांगण्यावरून किंवा परवानगीने लावण्यात आला असावा. परंतु, या विभागाने ही जबाबदारी नाकारली. या आॅक्सिजन पार्कचा पाठपुरावा घेत राहू, असे संस्थेचे आशिष भोयर यांनी सांगितले. ५० कोटी वृक्ष हा आकडा थोडाथोडका नाही. परंतु, अशाप्रकारच्या भोंगळ कारभारामुळेच झाडे केवळ फलकांवर व कागदावरच लावली जातात आणि उद्दिष्टपूतीर्ची घोषणा केली जाते. मागीलवर्षी १३ कोटी, तर यावर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. झाडे केवळ फलकांवरच लावण्यात येणार असल्यास हेही उद्दिष्ट नक्कीच पूर्ण होणार, यात शंका नाही. मात्र, अशा कोट्यवधी वृक्षलागवडीचे तीनतेरा झाले असताना विकासाच्या नावावर सुरू असलेली कोटी वृक्षांची वारेमाप कत्तल बघता जीवसृष्टीला मोठा धोका निर्माण होत आहे.हा फलक पंचायत समितीने लावलेला नसून तो वनविभागाने लावला असावा, अद्याप आॅक्सिजन पार्कला मंजुरी मिळालेली नसून प्रकल्प प्रक्रियेमध्ये आहे.- अशोक खाडे,गटविकास अधिकारी,

टॅग्स :forest departmentवनविभाग