शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

फलक उरला नावापुरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 22:39 IST

राज्य सरकारने लोकसहभागातून ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला. याच कार्यक्रमांतर्गत गाव-शहरातील मोकळ्या मैदानात आॅक्सिजन पार्कच्या निर्मितीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हिंगणघाट तालुक्यातील सावली (वाघ) या गावातही आॅक्सिजन पार्क असा मोठा फलक लावण्यात आला.

ठळक मुद्देवृक्षलागवड उद्दिष्टपूर्तीचे तीनतेरा : प्रशासकीय अधिकाऱ्यांची सारवासारव

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : राज्य सरकारने लोकसहभागातून ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला. याच कार्यक्रमांतर्गत गाव-शहरातील मोकळ्या मैदानात आॅक्सिजन पार्कच्या निर्मितीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हिंगणघाट तालुक्यातील सावली (वाघ) या गावातही आॅक्सिजन पार्क असा मोठा फलक लावण्यात आला. परंतु, गंमत अशी की, या ठिकाणी केवळ फलकच आहे.झाडे कुठेही नाही. पर्यावरण संवर्धन संस्थेचे गौरव जामुनकर यांच्या निदर्शनास ही बाब येताच संस्थेचे अध्यक्ष आशिष भोयर व गौरव जामुनकर यांनी या जागेची पाहणी केली. तेव्हा ६.८८ क्षेत्रफळात ४७० झाडे लावण्याचे उद्दिष्ट असल्याचे समजले. सत्यता जाणून घेण्याकरिता सरपंच कापसे यांची भेट घेतली. याविषयी कुठलीच माहिती नसल्याने ग्रामपंचायतीमध्ये जाण्यास सांगितले. तिथेही सगळे कर्मचारी अनभिज्ञ होते. त्या जागेवर गिट्टी खदान आहे, वरून तार गेलेली आहे, अशी कारणे सांगितली. परंतु ही जागा झुडपी जंगल क्षेत्राकरिता अधिसूचित करण्यात आलेली असताना अशा अडचणी का येत आहे, अशी विचारणा केली असता कर्मचाºयांकडे उत्तर नव्हते. त्यांनी पंचायत समितीकडे विचारणा करण्यास सांगितले. आमदारांशी चर्चा केली असता त्यांनी गटविकास अधिकारी यांना भेटण्यास सांगितले. पंचायत समिती कर्मचारी सायंकार यांना माहिती विचारली तेव्हा त्यांनाही कुठलीच कल्पना नसल्याचे समजले. प्रत्येक विभागाने हा विषय दुसºया विभागावर ढकलण्याचे काम केले. हा फलक कुणी लावला, हे ग्रामपंचायत, पंचायत समिती, वनविभाग कुणालाही माहीत नव्हते.दोन दिवसांत याविषयी सविस्तर माहिती देऊ, असे सचिव भोमले यांनी सांगितले. परंतु, या फलकावर गटविकास अधिकारी पंचायत समिती असे नाव असल्याने त्यांच्या सांगण्यावरून किंवा परवानगीने लावण्यात आला असावा. परंतु, या विभागाने ही जबाबदारी नाकारली. या आॅक्सिजन पार्कचा पाठपुरावा घेत राहू, असे संस्थेचे आशिष भोयर यांनी सांगितले. ५० कोटी वृक्ष हा आकडा थोडाथोडका नाही. परंतु, अशाप्रकारच्या भोंगळ कारभारामुळेच झाडे केवळ फलकांवर व कागदावरच लावली जातात आणि उद्दिष्टपूतीर्ची घोषणा केली जाते. मागीलवर्षी १३ कोटी, तर यावर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. झाडे केवळ फलकांवरच लावण्यात येणार असल्यास हेही उद्दिष्ट नक्कीच पूर्ण होणार, यात शंका नाही. मात्र, अशा कोट्यवधी वृक्षलागवडीचे तीनतेरा झाले असताना विकासाच्या नावावर सुरू असलेली कोटी वृक्षांची वारेमाप कत्तल बघता जीवसृष्टीला मोठा धोका निर्माण होत आहे.हा फलक पंचायत समितीने लावलेला नसून तो वनविभागाने लावला असावा, अद्याप आॅक्सिजन पार्कला मंजुरी मिळालेली नसून प्रकल्प प्रक्रियेमध्ये आहे.- अशोक खाडे,गटविकास अधिकारी,

टॅग्स :forest departmentवनविभाग