शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

फलक उरला नावापुरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 22:39 IST

राज्य सरकारने लोकसहभागातून ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला. याच कार्यक्रमांतर्गत गाव-शहरातील मोकळ्या मैदानात आॅक्सिजन पार्कच्या निर्मितीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हिंगणघाट तालुक्यातील सावली (वाघ) या गावातही आॅक्सिजन पार्क असा मोठा फलक लावण्यात आला.

ठळक मुद्देवृक्षलागवड उद्दिष्टपूर्तीचे तीनतेरा : प्रशासकीय अधिकाऱ्यांची सारवासारव

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : राज्य सरकारने लोकसहभागातून ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला. याच कार्यक्रमांतर्गत गाव-शहरातील मोकळ्या मैदानात आॅक्सिजन पार्कच्या निर्मितीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हिंगणघाट तालुक्यातील सावली (वाघ) या गावातही आॅक्सिजन पार्क असा मोठा फलक लावण्यात आला. परंतु, गंमत अशी की, या ठिकाणी केवळ फलकच आहे.झाडे कुठेही नाही. पर्यावरण संवर्धन संस्थेचे गौरव जामुनकर यांच्या निदर्शनास ही बाब येताच संस्थेचे अध्यक्ष आशिष भोयर व गौरव जामुनकर यांनी या जागेची पाहणी केली. तेव्हा ६.८८ क्षेत्रफळात ४७० झाडे लावण्याचे उद्दिष्ट असल्याचे समजले. सत्यता जाणून घेण्याकरिता सरपंच कापसे यांची भेट घेतली. याविषयी कुठलीच माहिती नसल्याने ग्रामपंचायतीमध्ये जाण्यास सांगितले. तिथेही सगळे कर्मचारी अनभिज्ञ होते. त्या जागेवर गिट्टी खदान आहे, वरून तार गेलेली आहे, अशी कारणे सांगितली. परंतु ही जागा झुडपी जंगल क्षेत्राकरिता अधिसूचित करण्यात आलेली असताना अशा अडचणी का येत आहे, अशी विचारणा केली असता कर्मचाºयांकडे उत्तर नव्हते. त्यांनी पंचायत समितीकडे विचारणा करण्यास सांगितले. आमदारांशी चर्चा केली असता त्यांनी गटविकास अधिकारी यांना भेटण्यास सांगितले. पंचायत समिती कर्मचारी सायंकार यांना माहिती विचारली तेव्हा त्यांनाही कुठलीच कल्पना नसल्याचे समजले. प्रत्येक विभागाने हा विषय दुसºया विभागावर ढकलण्याचे काम केले. हा फलक कुणी लावला, हे ग्रामपंचायत, पंचायत समिती, वनविभाग कुणालाही माहीत नव्हते.दोन दिवसांत याविषयी सविस्तर माहिती देऊ, असे सचिव भोमले यांनी सांगितले. परंतु, या फलकावर गटविकास अधिकारी पंचायत समिती असे नाव असल्याने त्यांच्या सांगण्यावरून किंवा परवानगीने लावण्यात आला असावा. परंतु, या विभागाने ही जबाबदारी नाकारली. या आॅक्सिजन पार्कचा पाठपुरावा घेत राहू, असे संस्थेचे आशिष भोयर यांनी सांगितले. ५० कोटी वृक्ष हा आकडा थोडाथोडका नाही. परंतु, अशाप्रकारच्या भोंगळ कारभारामुळेच झाडे केवळ फलकांवर व कागदावरच लावली जातात आणि उद्दिष्टपूतीर्ची घोषणा केली जाते. मागीलवर्षी १३ कोटी, तर यावर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. झाडे केवळ फलकांवरच लावण्यात येणार असल्यास हेही उद्दिष्ट नक्कीच पूर्ण होणार, यात शंका नाही. मात्र, अशा कोट्यवधी वृक्षलागवडीचे तीनतेरा झाले असताना विकासाच्या नावावर सुरू असलेली कोटी वृक्षांची वारेमाप कत्तल बघता जीवसृष्टीला मोठा धोका निर्माण होत आहे.हा फलक पंचायत समितीने लावलेला नसून तो वनविभागाने लावला असावा, अद्याप आॅक्सिजन पार्कला मंजुरी मिळालेली नसून प्रकल्प प्रक्रियेमध्ये आहे.- अशोक खाडे,गटविकास अधिकारी,

टॅग्स :forest departmentवनविभाग