शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

पोषण आहाराच्या चवीतून मुख्याध्यापकाची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 22:19 IST

शाळेत अध्यापनापेक्षा पोषण आहाराचीच अधिक काळजी वाहणाऱ्या मुख्याध्यापकांची आता शालेय पोषण आहार योजनेच्या जबाबदारीतून मुक्तता करण्यात आली आहे. यापुढे पोषण आहाराची चव घेऊन ते तपासण्याची जबाबदारी मुख्याध्यापक किंवा शिक्षकांची राहणार नाही.

ठळक मुद्देशिक्षण विभागाचे शुद्धीपत्रक : ताण कमी करण्याच्या दृष्टीने घेतला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : शाळेत अध्यापनापेक्षा पोषण आहाराचीच अधिक काळजी वाहणाऱ्या मुख्याध्यापकांची आता शालेय पोषण आहार योजनेच्या जबाबदारीतून मुक्तता करण्यात आली आहे. यापुढे पोषण आहाराची चव घेऊन ते तपासण्याची जबाबदारी मुख्याध्यापक किंवा शिक्षकांची राहणार नाही. याबाबत शिक्षण विभागाने शुद्धी काढल्याने शिक्षकांचा खुप मोठा ताण हलका झाला आहे.शालेय पोषण आहारासंदर्भातील २६ फेब्रुवारी २०१४ च्या परिपत्रकानुसार आहाराची चव प्रथम आहार तयार करणारा स्वयंपाकी नंतर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य किंवा त्यांचे प्रतिनिधी त्यानंतर मुख्याध्यापक किंवा योजनेशी संबधित शिक्षक या तीन स्तरावर घेऊन त्याची नोंद चव नोंद वहींमध्ये घेण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. आता यामध्ये नव्याने सुधारणा करून शासनाच्या शालेय व क्रीडा विभागाने आहाराची चव शाळा व्यवस्थापन समिती सदस्य किंवा त्यांचे प्रतिनिधी, मुख्याधापक किंवा योजनेशी संबधित शिक्षक यापैकी एकाने घ्यावी व त्याप्रमाणे चव नोंद वहीमध्ये घेण्यात यावी, अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहे. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी होणार असल्याने आता मुख्याध्यापक व शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष देण्यासाठी जास्त वेळ मिळणार आहे. परिणामी शैक्षणिक गुणवत्ताही वाढीस लागणार.जबाबदारी निश्चित करावीपोषण आहारासंदर्भात काढलेल्या शिक्षण विभागाच्या शुद्धिपत्रकामुळे फार काही बदल होत नसले तरी फक्त मानसिक समाधान मुख्याध्यापकांना मिळेल. त्यामुळे अशी जबाबदारी कमी न करता ती निश्चित केली गेली तर खऱ्या अर्थाने मुख्याध्यापकांची यातून सुटका होईल आणि शाळेतील इतर कामांमध्ये वेळ मिळू शकेल, अशा प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.विषबाधा झाल्यास जबाबदार कोण?विद्यार्थ्यांची शारिरीक व बौद्धीक क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने शासनाने शालेय पोषण आहार योजना अंमलात आणली. ही योजना राबवितांना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते. या योजनेच्या तपासणीतून सध्या मुख्याध्यापक व शिक्षकांवरील भार कमी करण्याचा प्रयत्न केला असला तरी पोषण आहारातून विषबाधा झाल्यास नेमके कोणाला जबाबदार धरायचे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Schoolशाळा